शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

मांगलीबांध जलाशय बनू शकतो पर्यटनाचा केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:01 IST

मांगली बांध आकर्षक व निसर्गरम्य वाटत आहे. बांधाच्या काठावरच श्रीरामाचे व हनुमंताचे मंदिर असून हिरवीगार वनराई डोळ्यांचे पारणे फेडते. रामनवमीला वर्षातून एकदा भव्य यात्रा भरत असते. जिल्ह्यातून भाविक, निसर्गप्रेमी या ठिकाणी गर्दी करतात. वड, चिंच, करंजी, आंबा हे विस्तीर्ण वनराई सुशोभित आकर्षक दिसत आहे. फळांची, फुलांची झाडे मंदिराच्या अगदी समोरासमोर देखण्या रूपात दिमाखात उभी आहेत.

ठळक मुद्देरात्रीला होते प्राण्यांचे दर्शन : काठावरच वसले हनुमंताचे मंदिर

मुखरू बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : निसर्गाच्या मुक्तहस्ताने उधळण ठरलेलं लाखनी तालुक्यातील मांगलीबांधचे नयनरम्य जलाशय पर्यटकांसाठी आवडते ठिकाण आहे. या परिसराच्या विकासावर अधिक भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.या तलावात उन्हाळ्याच्या दाहकतेत तरुण मंडळी पोहण्याचा आनंद घेत असतात. तलावाशेजारी टेकड्या आहेत. ४८४ एकरात या तलावातून भात शेतीच्या सिंचन केले जाते आणि दरवर्षाला एक लक्ष रुपयांची मत्स्य शेती यातून निर्मिती केली जाते. या तलावात आजही वीस फूट पाणी आहे.वन विभागाचे या निसर्गरम्य वातावरणात नियंत्रण आहे. वन्यप्राण्यांची शिकार होऊ नये याकरिता वनविभागाचे कर्मचारी कर्तव्यरत आहेत. पर्यटन क्षेत्रांतर्गत जिल्हा परिषद सदस्य विनायक बुरडे यांनी या मंदिराचा शासकीय निधी अंतर्गत कायापालट करून रुबाबदार देखणा व पर्यटनासाठी मांगली बांध पात्र ठरला आहे.मांगली बांध आकर्षक व निसर्गरम्य वाटत आहे. बांधाच्या काठावरच श्रीरामाचे व हनुमंताचे मंदिर असून हिरवीगार वनराई डोळ्यांचे पारणे फेडते. रामनवमीला वर्षातून एकदा भव्य यात्रा भरत असते. जिल्ह्यातून भाविक, निसर्गप्रेमी या ठिकाणी गर्दी करतात. वड, चिंच, करंजी, आंबा हे विस्तीर्ण वनराई सुशोभित आकर्षक दिसत आहे. फळांची, फुलांची झाडे मंदिराच्या अगदी समोरासमोर देखण्या रूपात दिमाखात उभी आहेत.सरपंच प्रशांत मासूरकर व आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली गावातीलच तीन तरूणांना या मंदिरात क्वारंटाईन केले आहे. परिसराबाबत ज्येष्ठ नागरिक गजानन मानकर यांनी अभ्यासात्मक माहिती दिली.रात्रीच्या सुमारास वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी मांगलीबांध तलावात गर्दी करतात. संपूर्ण भंडारा जिल्ह्यात मांगली बांध हे परीचीत असून पर्यटनाच्या दृष्टीने अधिक लक्ष पुरविल्यास निश्चितच भविष्यात मोठे पर्यटन क्षेत्र उदयाला येऊ शकतो, यात शंका नाही.या तलावाशेजारी जंगलात मोर, लांडोर, बगळा, विदेशी पक्षी तसेच प्राण्यात वाघ हिरण नीलगाय अस्वल रानडुक्कर रानकुत्रे अशी विविध जातीचे प्राणी मुक्त संचार करीत आहेत. या जलाशयाचे व विस्तीर्ण वनराईचे सदस्य आहेत.मांगली बांध खासगी मालकीचे जलाशय असून या ठिकाणाहून भातशेतीला सिंचन करण्यात आले. वन्यप्राण्यांसाठी हा जलाशय अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्यटन विकास अंतर्गत शासनाने व प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष घातल्यास पर्यटन स्थळाएवढे महत्त्व येऊ शकते.-प्रशांत मासूरकर,सरपंच, मांगलीबांध.

टॅग्स :tourismपर्यटन