शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

पीक विमा योजनेबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:01 IST

बोगस बियाणांच्या कंपन्यांवर अदाखलपात्र गुन्हा दाखल करुन कारवाई झाली पाहिजे, असे धोरण आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले. नागपूर येथे कापूस खरेदी डिलर्सना पकडून त्यांचे बियाणे बॅन करण्यात आले. बोगस बियाणे धारकावर पाच केसेस दाखल करण्यात आल्या. संबंधित व्यक्ती जामिनावर सुटतात. याबाबत शासनाने जाणीवपूर्वक लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देपालकमंत्री : बोगस बियाणांच्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पीक विमा योजनेसाठी जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमून राज्यस्तरावर पीक विमा योजनेबाबत योग्य धोरण राबविण्यात यावे. अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नाही. त्यामुळे योजनेची रुपरेषा योग्य असणे गरजेचे आहे. पीक विम्याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी विनंती जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी मुख्यमंत्र्यांना केली.राज्यस्तरीय खरीपपूर्व हंगाम आढावा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री केदार बोलत होते.भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.बोगस बियाणांच्या कंपन्यांवर अदाखलपात्र गुन्हा दाखल करुन कारवाई झाली पाहिजे, असे धोरण आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले. नागपूर येथे कापूस खरेदी डिलर्सना पकडून त्यांचे बियाणे बॅन करण्यात आले. बोगस बियाणे धारकावर पाच केसेस दाखल करण्यात आल्या. संबंधित व्यक्ती जामिनावर सुटतात. याबाबत शासनाने जाणीवपूर्वक लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विमा कंपन्यांना एका जिल्ह्यात तीन वर्ष सेवा देणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे पीक विमा योजनेतील लाभार्थ्यांना कर्जाची रक्कम त्यांचेपर्यंत पोहचविणे सहज सोपे होईल.तेलंगणातील अवैध बियाण्यांच्या कारखाना बंद करण्याबाबत दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री चर्चा करुन निर्णय घेतील. तसेच अवैध बियाणे विक्रेत्यास जामीन मिळणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. चुकीच्या बियाणांचे प्रकरण राज्यस्तरावर निकाली काढण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी या घोषणेचे स्वागत केले.कृषीमंत्री दादा भुसे यांनी प्रास्ताविकात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकºयाला मार्गदर्शन, बियाणे वाटप, तसेच मदत करण्यात येत असल्याचे सांगितले. कोल्ड स्टोअरेज प्रक्रिया उद्योग, शेतकरी उत्पादक कंपनी, महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनांची माहिती त्यांनी दिली.प्रगतीशिल शेतकऱ्यांची यादी तयार करुन बँक तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. डिजिटल प्लॉटफार्मचा वापर करुन फेसबुक व सोशल मीडियाद्वारे जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगितले. कृषी सचिव यांनी प्रझेंटेशनद्वारे राज्याची माहिती दिली. यावेळी दर्जेदार बियाणे, बोगस कारखान्यांवर बंदी, उगवण क्षमता तपासणी, महाबिज, पीक विमा योजना, धान खरेदी, सोयाबीन, कापूस व तुर, खते याबाबत आढावा व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्यात आला.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा