शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक भावनेतून शाळेला संस्काराचे केंद्र बनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 22:39 IST

नवीन पिढी वेगळ्या वळणावर जात आहे. भावी पिढीची सुरक्षितता धोक्यात आहे. मुले एककल्ली होत आहेत. त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या सदृढ व सशक्त झाला पाहिजे. शिक्षक हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी प्रत्येक शाळांमधून मुल्य शिक्षणाची बीजे रोवली जावी. तसेच मुख्याध्यापकांनी शाळेला संस्काराचे केंद्र बनवावे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश कोल्हे यांनी केले.

ठळक मुद्देमुख्याध्यापकांची सभा : प्रकाश कोल्हे यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नवीन पिढी वेगळ्या वळणावर जात आहे. भावी पिढीची सुरक्षितता धोक्यात आहे. मुले एककल्ली होत आहेत. त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या सदृढ व सशक्त झाला पाहिजे. शिक्षक हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी प्रत्येक शाळांमधून मुल्य शिक्षणाची बीजे रोवली जावी. तसेच मुख्याध्यापकांनी शाळेला संस्काराचे केंद्र बनवावे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश कोल्हे यांनी केले.लाल बहादूर शास्त्री विद्यालय येथे जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांची सभा घेण्यात आली. दुसऱ्या दिवशीच्या सभेत मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी कोल्हे बोलत होते. यावेळी मंचावर शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप गणवीर, विज्ञान पर्यवेक्षक शत्रुघ्न कोडवती, शिक्षण विस्तार अधिकारी देवेंद्र शेंडे यांची उपस्थिती होती. शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाला. मुख्याध्यापकांनी वेळेवर काम सोयीस्कर करावे यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती.दुसºया दिवशी साकोली, लाखनी, लाखांदूर व पवनी तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापकांची तर पहिल्या दिवशी मोहाडी, तुमसर व भंडारा येथील तालुक्यातील मुख्याध्यापकांची सभा पार पडली.या सभेत मानव विकास योजना, शाळा सिद्धी, परिवहन समिती, सुरक्षा समिती, मुल्यशिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, शालेय स्वच्छता, ग्रंथालय उपयोग, प्रयोगशाळा, शाळेच्या कर्मचाऱ्यांचे रोष्टर, लेखा परिक्षण, वेतन निश्चिती, सेवानिवृत्ती, वेतनपथक संबंधी समस्या, वृक्षारोपण आदी विषयावर चर्चा व माहिती देण्यात आली. अजुनही २६ शाळा, १० कनिष्ठ महाविद्यालयाचा वेतनेत्तर अनुदान शिक्षणाधिकारी यांच्या खात्यात पडून आहे. जुलै अखेरपर्यंत मुख्याध्यापकांनी असिसमेंट करावे. ७ तारखेपर्यंत वेतन बिल पाठवा १ तारखेला वेतन बँक खात्यात जमा करण्याची जबाबदारी आमची असेही शिक्षणाधिकारी कोल्हे यांनी सांगितले.शाळाच्या संच मान्यतेच्या दुरूस्तीचा प्रस्ताव तात्काळ दाखल करा, २ मे २०१२ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांची माहिती विभागाला कळवा, मुख्याध्यापकांच्या जागा ज्या शाळेत रिक्त आहेत तिथे पदोन्नती घ्या, प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठवा लवकरच वैद्यकीय मान्यता दिली जाईल.८० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांनी शाळा सिद्धी माहिती भरा, प्रत्येक शाळेत तक्रारपेटी लावा, शाळांनी एनटीएस, एनएमएमएस, शिष्यवृत्ती परीक्षा यात मोठा सहभाग नोंदवावा, प्रोत्साहन भत्ताची प्रकरणे निकाली काढता येण्यासाठी प्रस्ताव काळजीने पाठवा अशा सुचना सभेत देण्यात आल्या.वृक्षारोपण ही सामाजिक चळवळ आहे. यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा अशा सुचना शिक्षणाधिकारी कोल्हे यांनी दिली. मुख्याध्यापकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, यासाठी दररोज व्यायाम व योगा करावे तेच शिस्तिचेही पालन करण्याचा सल्ला शिक्षणाधिकाºयांनी दिला. विविध योजनेची माहिती शत्रुघ्न कोडवती, प्रदीप गणवीर यांनी दिली.वेतन वाढीवर मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी करावीजुलै महिन्यात मिळणाऱ्या कोणाच्याही वेतनवाढी रोखू नका. वेतन वाढीवर मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी करावी. वार्षिक वेतनवाढ दिल्याशिवाय वेतन बिल पारित केले जाणार नाहीत.६ ते ८ वर्गासाठी तीन शिक्षकांपैकी जेष्ठ शिक्षकांना माध्यमिक विभागावर दाखविता येईल. माध्यमिक स्तराची वेतन श्रेणी देता येईल. सेवाजेष्ठतासाठी सेवाशर्थी प्रमाणेच कार्यवाही करण्यात यावी.