शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

पाणीसाठ्याचा योग्य विनियोग करा

By admin | Updated: August 17, 2016 00:13 IST

शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा सकारात्मक परिणाम जिल्हयात दिसून येत असून ...

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण : दीपक सावंत यांचे प्रतिपादनभंडारा : शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा सकारात्मक परिणाम जिल्हयात दिसून येत असून जलयुक्त शिवारमुळे जिल्हयात ११ हजार टिसीएम पाणीसाठी निर्माण झाला आहे. या पाण्याचा वापर शेतकऱ्यांनी योग्य पध्दतीने करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले, ते स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदिपकुमार डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर उपस्थित होते. सन २०१५ मध्ये जलयुक्त शिवार अभियानामधील कामावर प्रत्यक्षात ११ हजार ६६२ टिसीएम पाणीसाठानिर्माण झाला आहे. या कामामुळे जिल्हयात १२ हजार ३०२ हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता तयार झाली असून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. खरीप हंगाम २०१६-१७ करीता जिल्हयात एकूण ३७ हजार ६५० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली. त्यापैकी ३९ हजार ८४१ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. खरीप हंगामासाठी जिल्हयात ७४ हजार ४०० मेट्रीकटन खतांचे आवंटन मंजूर असून जिल्हयात ४० हजार मेट्रीकटन खत उपलब्ध झाले आहे. जिल्हयात बियाणे व खताची उपलब्धतामुबलक असून याचा काळाबाजार होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेने २८८ कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. या वर्षी दुष्काळ घोषित केलेल्या ३७१ गावांमधील ५ हजार ५९४ शेतकऱ्यांच्या २३ कोटी ९८ लाख रूपयांच्या कजार्चे रुपांतरण करण्यात आले आहे. तसेच यातील ४ हजार ६६ शेतकऱ्यांना १७ कोटी २२ लक्ष रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत २०१५-१६ मध्ये ५७ धान खरेदी केंद्रांना मंजूरी मिळाली होती. त्यानुसार मुदतीत धान खरेदी झाली आहे. जिल्हयात एकूण २७ हजार ९७४ शेतकऱ्यांकडून १० लाख ६० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली. त्यासाठी १७० कोटी ८० लाखांचे चुकारे अदा केले आहेत. खरेदी केलेल्या धानापैकी ९ लाख १४ हजार क्विंटल धानाची भरडाई झाली आहे. या वर्षात भंडारा जिल्हयाला १५७१ कृषी पंपांना विज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट होते. मार्च २०१६ अखेर२ हजार ६९९ कृषी पंपांना विद्युत पुरवठा करण्यात आलेला आहे. या वर्षी १ते ७ आॅगस्ट या दरम्यान जिल्हयात महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानात महिलांची तसेच जनतेची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी उपविभागीयस्तरावर ३ व ग्रामस्तरावर १४६ महिला मेळावे आयोजित करण्यात आले. या मेळाव्यातून महिलांना शासकीय योजनांच्या माहिती सोबतच २ हजार ३५१ विविध दाखले वितरित करण्यात आले. या सोबतच इंदिरा गांधी निराधार योजनेचे ४९ तर कौटूंबिक अर्थसहाय्य योजनेचे १४९ धनादेश वाटप करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरातमध्ये राबविण्यात येणा?्या चिरंजीव योजनेच्या धर्तीवर राज्यातही चिरंजीव योजना राबविण्यात येणार आहे. राज्यातील ज्या जिल्हयामध्ये माता मृत्यु आणि अर्भक मृत्युंचे प्रमाण जास्त आहे. तेथे ही योजना प्राधान्याने राबविण्यात येणार आहे.महिलांची प्रसुती करणाऱ्या डॉक्टरांना दर १०० प्रसुतीमागे ४ लाख रुपये देण्यात येणार असून ही योजना सध्या प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. राजीव गांधी जिवनदायी योजनेतील करार नोव्हेंबर २०१६ मध्ये संपुष्टात येणार असून त्यानंतर ही योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना म्हणून ओळखली जाणार आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये ४ हजार ८०० लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून आतापर्यत १हजार ८८५ रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यासाठी आतापर्यंत ३ कोटी २७ लाख रुपये संबंधीत रूग्णालयांना शासनाकडून वितरित करण्यात आले आहेत. मरणोपरांत अवयवदानासाठी स्वंयस्फूतीर्ने नोंदणीे जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये करावे, असे आवाहन त्यांनी केले. जननी सुरक्षा योजना याअंतर्गत सन २०१५-१६ मध्ये ५ हजार ३७८ मातांना लाभ देण्यात आला आहे. त्याचबरोबर जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमातंर्गत माता व नवजात अर्भकांना शासकिय रुग्णालयातून वाहन व्यवस्था, औषधोपचार, तसेच प्रयोगशाळेतील तपासण्या विना शुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिल्हा परिषद मार्फत सुध्दा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जननी सुरक्षा योजना शहरी व ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविली जात असून २०१५-१६ या वर्षाकरीता ७ हजार ७९५ लाभार्थ्यांना १ कोटी ८ लाखाचे वाटप करण्यात आले आहे. या पुढेही या योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांना देण्यात येईल. सन २०१५-१६ मध्ये प्रसुती मातांना दवाखान्यात आणि प्रसुतीनंतर त्यांच्या घरी सेवा देण्यात आाली आहे. भंडारा जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून या वर्षाअखेर जिल्हयात ५९ हजार वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या १५१ ग्रामपंचायती हांगणदारीमुक्त झाल्या असून ८ हजार ८०० वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. गोसेखुर्द प्रकल्पातील ११ हजार ४०० लाभार्थ्यांना ३४२ कोटीचे गोसेखुर्द विशेष पॅकेज अंतर्गत वाटप करण्यात आले आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पातील १२८ वाढीव कुटूंबांना ३ कोटी ७१ लाखांचे वाटप करण्यात आले आहे. चालु आर्थिक वर्षात १ लक्ष ९१ हजार मजूरांना काम उपलब्ध करुन देण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले आहे. यासाठी ८० कोटी २ लक्ष रुपये मंजूरी देण्यात आली आहे. यावेळी विभागाचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)