शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: August 10, 2015 00:20 IST

भंडारा जिल्ह्यात तीन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला असून सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झाला आहे.

व्यथा धान उत्पादक शेतकऱ्यांची : होमराज कापगते यांची मागणीसाकोली : भंडारा जिल्ह्यात तीन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला असून सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झाला आहे. गेल्या खरीप हंगामाच्या पडलेल्या धानाच्या भावामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी सावकार व बँकांकडून कर्ज घेतले. खरीप हंगामात सुगीचे दिवस येतील असे स्वप्न बाळगून पेरणी केली. परंतु पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले. यामुळे शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य होमराज कापगते यांनी केली आहे.शेतकऱ्यांनी महागडी बियाणे खरेदी करून पिकांची पेरणी केली. पण पावसाचा थांगपत्ता नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. सध्याच्या स्थितीत धान, तूर हे पीक पाण्याअभावी करपताना दिसून येत आहेत. काही शेतकऱ्यांनी केलेली रोवणी वाळण्याच्या तयारीत असून काहींची रोवणीही झाली नाही. सानगडी परिसरात दिवसभर भारनियमन सुरु करण्यात आले व विद्युत पुरवठा रात्री १२ वाजता सुरु करण्यात येतो. ही एक समस्या शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे यावर्षी तरी वीज वितरण कंपनीने तालुक्यातील सर्वच गावातील भारनियमन बंद करून शेतीसाठी २४ तास विद्युत पुरवठा सुरु ठेवावा.साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, वीज बील माफ करावे व हेक्टरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते यांनी केली आहे. अन्यथा काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा कापगते यांनी दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)