शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

झालेल्या नुकसानीची भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 21:10 IST

गारपीट आणि वादळी पावसामुळे शेतातील पीक नेस्तानाबूत झाले. भंडारा जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील धानाचे पीक मातीमोल झाले. धान, गहू, हरभरा, तूर आणि इतर रब्बी पिकांची प्रचंड हानी झाली.

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी : फटका अवकाळी पावसाचा

ऑनलाईन लोकमतभंडारा : गारपीट आणि वादळी पावसामुळे शेतातील पीक नेस्तानाबूत झाले. भंडारा जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील धानाचे पीक मातीमोल झाले. धान, गहू, हरभरा, तूर आणि इतर रब्बी पिकांची प्रचंड हानी झाली. गारपिटीच्या नुकसानाचे सर्वेक्षण महसूल व कृषी विभागाने सुरू करून भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन विकासाच्या दृष्टीने विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्प मागील ३० वर्षापासून आजही पूर्ण झाले नाही. प्रकल्पग्रस्त लोकांच्या समस्याही सुटल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलन उभारण्यात येईल. प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी किंवा २५ लाख द्यावे, ३० वर्ष होऊनही प्रकल्प पूर्ण झाला नाही.मात्र या ३० वर्षात प्रकल्पग्रस्त लोकांचे कुटुंब वाढले या वाढीव कुटुंबाचे पुनर्वसन करावे, पर्यायी जमिनीसाठी प्रति एकर १० लाख रूपये देण्यात यावे.गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण झाल्यावर नागनदीचे दूषित पाणी वैनगंगा नदीच्या पात्रात विलीन होत आहे. त्याचे मानवी शरीरावर विपरीत परिणाम आहे. त्यामुळे नागनदीचे सांडपाणी थांबविण्यात यावे. यासदंर्भात उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर येथे जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्याअनुषंगाने उच्च न्यायालयाने १९ नोव्हेंबर २०१५ रोजी आदेश पारित करून पाणी दूषित करणाºया सर्व यंत्रणेला वैनगंगा नदीत येणाºया सांडपाणी शुद्ध करून सोडण्याचे आदेश निर्ममित केले. परंतु यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोपही काँग्रेसने केला आहे. निवेदनात माजी खासदार नाना पटोले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार बंडूभाऊ सावरबांधे, सेवक वाघाये, आनंदराव वंजारी, जिया पटेल, प्रमोद तितीरमारे, प्रमिलाताई कुटे, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, मधुकर लिचडे, राजकपूर राऊत, दिपक गजभिये यासह अन्य पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.