शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बालपणापासून मुलांना संस्कारक्षम बनवा

By admin | Updated: October 7, 2015 01:49 IST

बाळ जन्माला आल्यानंतर त्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. मात्र त्या बाळात संस्कार घडविले जात आहेत की नाही याची काळजी घेतली जात नाही.

स्वामी नरेंद्राचार्य महाराज : ४० हजार अनुयायांनी घेतला दर्शनाचा लाभसंजय साठवणे साकोलीबाळ जन्माला आल्यानंतर त्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. मात्र त्या बाळात संस्कार घडविले जात आहेत की नाही याची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे लहानपणापासून मुलांना संस्कारक्षम बनविणे गरजेचे आहे. ही जबाबदारी आईवडीलांची जशी असते तसेच समाजाला संस्कारक्षम बनविण्याची जबाबदारी संतांची आहे, असे मत जगतगुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी दार्शनिक प्रवचनातून व्यक्त केले. साकोली येथील जिल्हा परिषद हायस्कुलच्या प्रांगणात आयोजित नरेंद्रचार्य महाराज यांचे प्रवचन व साधक दीक्षा सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार, खा.पटोले यांच्या सहचारिणी मंगला पटोले, सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी विनोद पटोले, सत्यवान हुकरे, विहीपचे जिल्हाध्यक्ष डॉ.संजय एकापुरे, राहुल चव्हाण, गीता कापगते उपस्थित होते. यावेळी खा.पटोले यांनी महाराजांचे सपत्नीक स्वागत केले. तत्पूर्वी महाराजांचे स्वागतगीताने स्वागत करण्यात आले. सामाजिक उपक्रमातंर्गत अपंग बांधवांना ट्रायसिकल तर शेतकऱ्यांना पिकांवर औषधी फवारणीचे यंत्र अतिथींच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी नरेंद्राचार्य महाराज म्हणाले, संत आणि आईमध्ये जास्त फरक नसतो. म्हणूनच संतांना मायबाप म्हणतात. आई मुलांचे लाड करते तर वडील मुलांना शिकवून वळण लावतात. आजच्या युगात महिलांची कुचंबणा होत आहे. समाजात मातृत्त्वाबद्दल जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. धर्मांमधील भेदाभेद वाढत आहे. स्त्रीभू्रूण हत्या हा मानव जातीवरील कलंक आहे. विज्ञाननिष्ठ युग बनत असले तरी मानवाची मानसिकता आजही संकुचित आहे. ‘जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या’ हा धर्म सर्वांनी जपला पाहिजे. तेव्हाच समाजाचे पर्यायाने राष्ट्राचे कल्याण होते.साकोलीला आले यात्रेचे स्वरुपनरेंद्राचार्य महाराज येणार असल्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी साकोलीत कालपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. रस्त्यावर विविध दुकाने थाटण्यात आलेली होती. प्रवचन व दीक्षा सोहळ्यामुळे साकोलीला यात्रेचे स्वरुप आले होते. आजच्या या दर्शन सोहळ्यासाठी भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातून भाविक आले होते.पोलिसांचा चोख बंदोबस्तनरेंद्रचार्य महाराज यांच्या दर्शन सोहळ्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. १०० अतिरिक्त पोलीस कर्मचारी जिल्हाभरातून पोलीस प्रशासनाने तैनात केले होते.