शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
2
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
3
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
6
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
7
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
8
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
9
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
10
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
11
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
12
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
13
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
14
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
15
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
17
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
18
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
19
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
20
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार

बालपणापासून मुलांना संस्कारक्षम बनवा

By admin | Updated: October 7, 2015 01:49 IST

बाळ जन्माला आल्यानंतर त्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. मात्र त्या बाळात संस्कार घडविले जात आहेत की नाही याची काळजी घेतली जात नाही.

स्वामी नरेंद्राचार्य महाराज : ४० हजार अनुयायांनी घेतला दर्शनाचा लाभसंजय साठवणे साकोलीबाळ जन्माला आल्यानंतर त्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. मात्र त्या बाळात संस्कार घडविले जात आहेत की नाही याची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे लहानपणापासून मुलांना संस्कारक्षम बनविणे गरजेचे आहे. ही जबाबदारी आईवडीलांची जशी असते तसेच समाजाला संस्कारक्षम बनविण्याची जबाबदारी संतांची आहे, असे मत जगतगुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी दार्शनिक प्रवचनातून व्यक्त केले. साकोली येथील जिल्हा परिषद हायस्कुलच्या प्रांगणात आयोजित नरेंद्रचार्य महाराज यांचे प्रवचन व साधक दीक्षा सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार, खा.पटोले यांच्या सहचारिणी मंगला पटोले, सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी विनोद पटोले, सत्यवान हुकरे, विहीपचे जिल्हाध्यक्ष डॉ.संजय एकापुरे, राहुल चव्हाण, गीता कापगते उपस्थित होते. यावेळी खा.पटोले यांनी महाराजांचे सपत्नीक स्वागत केले. तत्पूर्वी महाराजांचे स्वागतगीताने स्वागत करण्यात आले. सामाजिक उपक्रमातंर्गत अपंग बांधवांना ट्रायसिकल तर शेतकऱ्यांना पिकांवर औषधी फवारणीचे यंत्र अतिथींच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी नरेंद्राचार्य महाराज म्हणाले, संत आणि आईमध्ये जास्त फरक नसतो. म्हणूनच संतांना मायबाप म्हणतात. आई मुलांचे लाड करते तर वडील मुलांना शिकवून वळण लावतात. आजच्या युगात महिलांची कुचंबणा होत आहे. समाजात मातृत्त्वाबद्दल जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. धर्मांमधील भेदाभेद वाढत आहे. स्त्रीभू्रूण हत्या हा मानव जातीवरील कलंक आहे. विज्ञाननिष्ठ युग बनत असले तरी मानवाची मानसिकता आजही संकुचित आहे. ‘जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या’ हा धर्म सर्वांनी जपला पाहिजे. तेव्हाच समाजाचे पर्यायाने राष्ट्राचे कल्याण होते.साकोलीला आले यात्रेचे स्वरुपनरेंद्राचार्य महाराज येणार असल्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी साकोलीत कालपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. रस्त्यावर विविध दुकाने थाटण्यात आलेली होती. प्रवचन व दीक्षा सोहळ्यामुळे साकोलीला यात्रेचे स्वरुप आले होते. आजच्या या दर्शन सोहळ्यासाठी भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातून भाविक आले होते.पोलिसांचा चोख बंदोबस्तनरेंद्रचार्य महाराज यांच्या दर्शन सोहळ्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. १०० अतिरिक्त पोलीस कर्मचारी जिल्हाभरातून पोलीस प्रशासनाने तैनात केले होते.