शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

आरोग्य जोपासणे हीच आपल्या जीवनाची खरी संपत्ती

By admin | Updated: March 26, 2017 00:24 IST

आरोग्यम् धनसंपदा या वचनाप्रमाणे आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. आरोग्य उत्तम असेल ....

रवीशेखर धकाते यांचे प्रतिपादन : क्षयरोग दिनाचा कार्यक्रमभंडारा : आरोग्यम् धनसंपदा या वचनाप्रमाणे आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. आरोग्य उत्तम असेल तर आपण अर्थार्जन करण्यास अधिक सक्षम राहू. प्रत्येक नागरिकाने सकस आहार, नियमित व्यायाम, आवश्यक विश्रांती, रोगाचे उपचार आदींचा नियमित उपयोग करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक रवीशेखर धकाते यांनी व्यक्त केले. क्षयरोग जनजागृती चित्ररथ काढून जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य वाघाये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, हिवराज उके, आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. सीमा कावरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, हिवराज उके, केमीस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय खत्री , दिपक फुलबांधे, विलास केजरकर, आठवले समाज कार्य महाविद्यालय च्या प्रा. ज्योती नाकतोडे, सारथी कल्याणकारी संस्थेच्या समन्वयक राजकन्या रामटेके, अति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिता बढे आदी उपस्थित होते.यांनी रिबीन कापून व हिरवी झेंडी दाखवून पथसंचलनास सुरुवात केली. यावेळी धकाते यांनी, शालेय विद्यार्थ्यांना संबोधित करताना आजचे विद्यार्थी भावी काळात देशाचे आधारस्तंत व ब्रँड एंबेसेडर आहेत. कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे आरोग्य शिक्षण, क्षयरोगाबाबतची माहिती विद्यार्थ्यांनी कुटुंबातील इतर सदस्य व लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहावे. सर्वजण मिळून टीबी संपवूया या घोषवाक्याप्रमाणे दैनंदिन जीवनात अंमलबजावणी करावी. त्यामुळे भंडारा जिल्हा क्षयरोगमुक्त करणे हे साध्य करता येईल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.२४ मार्च २०१७ रोजी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून क्षयरोग जनजागृती कार्यक्रमाचा मुख्य समारंभ सामान्य रुग्णालय भंडारा येथे संपन्न झाला. पथसंचालन मुस्लिम लायब्ररी वाचनालय चौकात थांबून आठवले समाजकार्य महाविद्यालय विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून जनसमुदायाला क्षयरोगाबाबतची माहिती दिली. पथसंचालनामध्ये शासकीय नर्सिंग कॉलेज, एरोमिरा नर्सिंग कॉलेज, पूजा नर्सिंग कॉलेज, के.एल. पटेल नर्सिंग कॉलेज, सारथी कल्याणकारी संस्था व जिल्हा क्षयरोग केंद्रातील कर्मचारीवृंद सहभागी झालेले होते.सामान्य रुग्णालय भंडारा येथे रॅलीचे समारोप करून मुख्य कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी क्षयरोगाबाबत संक्षिप्त माहिती प्रास्ताविकेमध्ये उपस्थित प्रेक्षकांना सांगितली. जसे दोन आठवड्याचा खोकला, वजनात घट होणे, भूक मंदावणे आदी लक्षणे आढळल्यास दोन थुंकी नमुने जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत येथे तपासणी करून घ्यावी. जिल्हा क्षयरोग केंद्रात सीबीनॅट मशिन उपलब्ध झालेली आहे. त्यामध्ये अवघ्या दोन तासात क्षयरोगाचे निदान करता येते. चाचण्या व टीबीची औषधे सर्व शासकीय आरोग्य संस्थेत मोफत उपलब्ध आहेत. याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले. डॉ. सीमा कावरे यांनी, क्षयरोगापासून मुक्तीच्या मार्गाकडे जाण्याकरिता शासकीय यंत्रणेला सर्व जनतेनी सहकार्य करणे आजच्या काळाची गरज निर्माण झालेली आहे. जेणेकरून सन २०२५ पर्यंत भंडारा जिल्हा क्षयरोगमुक्त ही संकल्पना नक्कीच साध्य करता येईल. याकरिता खासगी वैद्यकीय चिकित्सकांचा वेळोवेळी सहकार्य लाभेल असे प्रतिपादन केले.याप्रसंगी सारथी जनकल्याण संस्थेद्वारे टीबी कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वानखेडे यांना मानचिन्ह व गौरवपत्र तसेच शेंडे, बुराडे, करंडे, अलका रंगारी, रोशनी चौरसिया, बाबूराव रामटेके, माने, बुरडे, कुरैशी यांना गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले. शालेय विद्यार्यांनी रॅलीमध्ये घोषवाक्याद्वारे सर्वसामान्यांपर्यंत क्षयरोगाचा संदेश पोहचविण्यात आला. संचालन शिवशंकर शेंडे यांनी केले. तर आभार सुशील बन्सोड यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)