शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जातीय सलोखा कायम राखा

By admin | Updated: September 19, 2015 00:45 IST

गणेशाचे आगमन पावसाने झाले असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

जातीय सलोखा समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादनभंडारा : गणेशाचे आगमन पावसाने झाले असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. अशा या वातावरणात जनतेने सर्व धर्माप्रती मानवतावादी दृष्टिकोन ठेवून उत्सव आनंद व उल्हासात साजरा करण्यासाठी शांतता व जातीय सलोखा कायम राखावा, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. जातीय सलोखा समितीची बैठक पोलीस मिटींग सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, पोलीस उपअधीक्षक पी.पी. धरमशी, पुरवठा अधिकारी मिलींद बनसोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आडे, तहसिलदार सुशांत बनसोडे, भंडारा नगर परिषद मुख्याधिकारी रविद्र देवतळे उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, जनता व प्रशासन यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जनतेने सर्व धर्माप्रती मानवता दृष्टीकोन ठेवला पाहिजे. माझा धर्म मोठा अशी भावना बाळगायला नको, सहिष्णूता राखली पाहिजे. आपल्या देशात युवकांचे प्रमाण ५० टक्के असतांना अशा घटना होत असतील तर त्यासाठी सदविवेक बुध्दीची आवश्यकता आहे. या देशात गरीबी, कुपोषण असे अनेक प्रश्न असतांना जाती धर्माच्या नावावर वाद घालणे योग्य नाही. या सामाजिक समस्येवर मात करण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकत आहे. गणेशोत्सव मंडळानी सामाजिक समस्या, मुलींच्या शिक्षणावर आधारित दृष्ये गणेशोत्सवाचे ठिकाणी सादर करावीत. यामुळे जनजागृती होऊन देशाच्या विकासात भर पडेल. गणेशाची विटंबना होणार नाही. याची दक्षता गणेश मंडळानी घ्यावी. मंडळाचे काम सचोटीपूर्ण असावे. दारु पिऊन नागरिकांना तसेच महिलांना त्रास होईल असे कृत्य करु नये व इतरांना त्याठिकाणी दारु पिऊन येण्यास मज्जाव करावा. अभद्र व्यवहार करु नये. गणेशोत्सवात अवैध विद्युत पुरवठा घेऊ नये. या कारणांमुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशाची घटना महत्वाची असून कायद्यापुढे सर्व धर्म समान आहेत याचेही नागरिकांनी भान ठेवावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्ह्यात सकारात्मक विचारधारा दिसून येत आहे. त्यानुसार कोणाचेही अहित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. विसर्जनाच्या दिवशी वेळेचे, सुरक्षिततेचे तसेच पोलीस विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. गणेशोत्सवानंतर शहरातील अतिक्रमणाची कार्यवाही त्वरीत करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.गणेशोत्सव व बकरी ईद या सणांदरम्यान काही असामाजिक तत्व प्रशासनाच्या चुका शोधून त्याचे भांडवल करतात. चुकीच्या सामाजिक व धार्मिक बाबींविरुध्द जनतेने उभे राहून चांगले काम करण्याचा प्रयत्न करावा. या गणेशोत्सवा दरम्यान ५० सार्वजनिक गणेश मंडळ असून जिल्हयात एक गाव एक गणपती या नुसार २५७ गणेश मंडळाची नोंद घेण्यात आली आहे. तसेच जिल्हयात अंदाजे २२०८ खाजगी गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली असल्याचे पोलीस अधिक्षकांनी सांगितले. संयम व शांततेने सर्व सण साजरे करावे व जिल्हयातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झलके यांनी केले. अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी प्रास्ताविकातून जनता व प्रशासन यांच्यात जातीय सलोखा राखण्याविषयी समितीची भूमिका विषद केली. संचालन पोलीस निरीक्षक कोलवटकर यांनी केले तर परिविक्षाधीन पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. बैठकीला जिल्ह्यातील शांतता समितीचे सदस्य, उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा, पवनी, साकोली तसेच पोलीस अधिकारी, इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)