शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जातीय सलोखा कायम राखा

By admin | Updated: September 19, 2015 00:45 IST

गणेशाचे आगमन पावसाने झाले असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

जातीय सलोखा समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादनभंडारा : गणेशाचे आगमन पावसाने झाले असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. अशा या वातावरणात जनतेने सर्व धर्माप्रती मानवतावादी दृष्टिकोन ठेवून उत्सव आनंद व उल्हासात साजरा करण्यासाठी शांतता व जातीय सलोखा कायम राखावा, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. जातीय सलोखा समितीची बैठक पोलीस मिटींग सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, पोलीस उपअधीक्षक पी.पी. धरमशी, पुरवठा अधिकारी मिलींद बनसोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आडे, तहसिलदार सुशांत बनसोडे, भंडारा नगर परिषद मुख्याधिकारी रविद्र देवतळे उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, जनता व प्रशासन यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जनतेने सर्व धर्माप्रती मानवता दृष्टीकोन ठेवला पाहिजे. माझा धर्म मोठा अशी भावना बाळगायला नको, सहिष्णूता राखली पाहिजे. आपल्या देशात युवकांचे प्रमाण ५० टक्के असतांना अशा घटना होत असतील तर त्यासाठी सदविवेक बुध्दीची आवश्यकता आहे. या देशात गरीबी, कुपोषण असे अनेक प्रश्न असतांना जाती धर्माच्या नावावर वाद घालणे योग्य नाही. या सामाजिक समस्येवर मात करण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकत आहे. गणेशोत्सव मंडळानी सामाजिक समस्या, मुलींच्या शिक्षणावर आधारित दृष्ये गणेशोत्सवाचे ठिकाणी सादर करावीत. यामुळे जनजागृती होऊन देशाच्या विकासात भर पडेल. गणेशाची विटंबना होणार नाही. याची दक्षता गणेश मंडळानी घ्यावी. मंडळाचे काम सचोटीपूर्ण असावे. दारु पिऊन नागरिकांना तसेच महिलांना त्रास होईल असे कृत्य करु नये व इतरांना त्याठिकाणी दारु पिऊन येण्यास मज्जाव करावा. अभद्र व्यवहार करु नये. गणेशोत्सवात अवैध विद्युत पुरवठा घेऊ नये. या कारणांमुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशाची घटना महत्वाची असून कायद्यापुढे सर्व धर्म समान आहेत याचेही नागरिकांनी भान ठेवावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्ह्यात सकारात्मक विचारधारा दिसून येत आहे. त्यानुसार कोणाचेही अहित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. विसर्जनाच्या दिवशी वेळेचे, सुरक्षिततेचे तसेच पोलीस विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. गणेशोत्सवानंतर शहरातील अतिक्रमणाची कार्यवाही त्वरीत करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.गणेशोत्सव व बकरी ईद या सणांदरम्यान काही असामाजिक तत्व प्रशासनाच्या चुका शोधून त्याचे भांडवल करतात. चुकीच्या सामाजिक व धार्मिक बाबींविरुध्द जनतेने उभे राहून चांगले काम करण्याचा प्रयत्न करावा. या गणेशोत्सवा दरम्यान ५० सार्वजनिक गणेश मंडळ असून जिल्हयात एक गाव एक गणपती या नुसार २५७ गणेश मंडळाची नोंद घेण्यात आली आहे. तसेच जिल्हयात अंदाजे २२०८ खाजगी गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली असल्याचे पोलीस अधिक्षकांनी सांगितले. संयम व शांततेने सर्व सण साजरे करावे व जिल्हयातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झलके यांनी केले. अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी प्रास्ताविकातून जनता व प्रशासन यांच्यात जातीय सलोखा राखण्याविषयी समितीची भूमिका विषद केली. संचालन पोलीस निरीक्षक कोलवटकर यांनी केले तर परिविक्षाधीन पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. बैठकीला जिल्ह्यातील शांतता समितीचे सदस्य, उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा, पवनी, साकोली तसेच पोलीस अधिकारी, इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)