शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

रावणवाडी जलाशयाचे मुख्य गेट तुटलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:54 IST

सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हे शासनाचे धोरण असून मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.

ठळक मुद्देपाण्याचा अपव्यय : पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हे शासनाचे धोरण असून मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. परंतु रावणवाडी जलाशयाचे मुख्य गेट तुटलेले असून या जलाशयातून पाण्याचा दररोज अपव्यय सुरू आहे. मात्र याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष अद्याप गेलेले नाही.भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी हे मुख्य पर्यटनस्थळ असून दाट वनराईने नटलेले आहे. दोन डोंगराच्या मधोमध विस्तीर्ण जलाशय असून दररोज हजारो पर्यटक रावणवाडीला भेट देत असतात. विस्तीर्ण पसरलेल्या जलाशयाला एक मुख्य गेट असून या गेटमधून रावणवाडी, वाकेश्वर, बोरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात कालव्याद्वारे पाणी दिले जाते. व याच पाण्यावर रावणवाडी परिसर सुजलाम-सुफलाम झालेला आहे. परंतु मागील वर्षापासून जलाशयाचे मुख्य गेट तुटलेले असून या जलाशयातून पाण्याचा अपव्यय होत आहे. याबाबत रावणवाडी, वाकेश्वर, बोरगाव येथील शेतकऱ्यांनी भंडारा पाटबंधारे विभागाला निवेदन दिले परंतु या विभागाने कोणतीही उपाययोजना केली नाही. सद्यस्थितीत जलसाठा कमी असल्यामुळे परिसरातील नागरिकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. या मुख्य गेटची दुरूस्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे.