शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

सिहोरा परिसरातील महाशिवरात्री यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:45 IST

राज्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव वाढत असल्याने, अनेक जिल्ह्यांत रात्रीची संचारबंदी, काही जिल्ह्यांत आठवडाभराचा लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. ...

राज्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव वाढत असल्याने, अनेक जिल्ह्यांत रात्रीची संचारबंदी, काही जिल्ह्यांत आठवडाभराचा लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले नसल्याने, दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे सांगितले जात आहेत. जिल्हा प्रशासन कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी अनेक निर्देश व उपाययोजना सांगत आहेत, परंतु नागरिक डोळेझाक करीत आहेत. यामुळे ग्रामीण भागातही कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यातील महाशिवरात्री यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. सिहोरा परिसरात आयोजित होणाऱ्या गायखुरी देवस्थान, धुटेरा देवस्थानच्या यात्रा रद्द करण्यात आलेल्या आहेत. वैनगंगा, बावणथडी नद्यांचे संगम असणाऱ्या बपेरा गावांच्या शेजारी महाशिवरात्रीनिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या संगम परिसरात गायखुरी देवस्थान आहे. नदीच्या संगमामध्ये दगडावर गाईच्या खुरी कोरल्या असल्याने गायखुरी देवस्थान अशी आस्था आहे. या देवस्थानात गोंदिया, भंडारा आणि बालाघाट जिल्ह्यातील भाविक महाशिवरात्री यात्रेत दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. आठवडाभरापासून भाविक हजेरी लावत असल्याने मंडळ सेवा आणि सुविधा उपलब्ध करीत आहेत. गावातील रस्ते व स्वच्छता करण्यात येत आहेत, परंतु यंदा मात्र या यात्रेवर कोरोना संसर्ग प्रादुर्भावाने विरजण पडले आहे. दरम्यान, भाविकांची या देवस्थानात आस्था असल्याने, महाशिवरात्रीनिमित्त दर्शनाकरिता येण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन करण्यासाठी मंडळ समित्या बैठका घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. विदर्भात कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याच्या कारणावरून मध्य प्रदेशातील सीमेवर अलर्ट घोषित करण्यात आले आहे. मोवाड सीमेवर तपासणी व निगराणी वाढविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

जिल्ह्याचे सीमा सील करा

विदर्भातील नागपूर शहरात कोरोना संसर्गबाधित रुग्ण संख्या वाढत असल्याचे वृत्त नागरिकांचे कानावर येत आहेत. ग्रामीण भागात नागपूरहून येणाऱ्या इसमाकडे संशयित नजरेने पाहिले जात आहेत. जिल्ह्यात असे रुग्ण नसले, तरी उपाययोजना म्हणून सीमा सील करण्याची ओरड सुरू झाली आहे. रुग्ण वाढण्याच्या आधीच उपाययोजना करण्यात येत नसल्याने, नंतर गाव खेड्यात जलद गतीने कोरोनाचा संसर्ग पोहोचत आहे. जिल्ह्याचे सीमेवर तपासणी वाढविण्याची मागणी होत आहे.

कार्यक्रमात बेधडक नागरिकांची गर्दी

सिहोरा परिसरातील ग्रामीण भागात अनेक कार्यक्रमाचे आयोजन सुरूच आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडत आहे. कार्यक्रमात हजेरी लावल्याचा आनंद आणि कोरोना संसर्गची भीती असे चित्र प्रत्येकाच्या मनात आहे. शासनाच्या गाइडलाइनला धाब्यावर बसविण्यात येत आहे. कुणी नियम व निर्देश पाळत नाहीत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क अनिवार्य करण्यात आले आहे, परंतु कुणी ऐकायला तयार नाहीत. यामुळे भीतिदायक चित्र असल्याचे दिसून येत आहे.