शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र ही संत, शूर वीरांची भूमी आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:23 IST

प्राणहंस मेश्राम : महाप्रज्ञा बुद्धविहारात शिवाजी महाराज जयंती लाखनी : शिवाजीराजे हे लहानपणापासूनच आई जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली होते. त्यांनी परकियांची ...

प्राणहंस मेश्राम : महाप्रज्ञा बुद्धविहारात शिवाजी महाराज जयंती

लाखनी : शिवाजीराजे हे लहानपणापासूनच आई जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली होते. त्यांनी परकियांची गुलामगिरी पाहिली. ती असह्य झाल्याने बाळ शिवबाला स्वराज्यनिर्मितीसाठी सज्ज केले. जिजाऊंच्या संस्कारांत वाढलेल्या शिवबाने अठरापगड जातींतील लोकांना संघटित करून परकीय शत्रूला धूळ चारली व स्वराज्याची पताका रोवली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजे शिवाजी यांनी ही अशक्य कामगिरी तडीस नेली. महाराष्ट्र ही संतांची व शूरवीरांची भूमी आहे, असे प्रतिपादन प्राणहंस मेश्राम यांनी केले.

लाखनी येथील स्थानिक महाप्रज्ञा बुद्धविहाराच्या सभागृहात महाराष्ट्र कास्ट्राईब शिक्षक संघटना, शाखा लाखनीच्या वतीने राजे शिवछत्रपती यांची जयंती साजरी करण्यात आली. महाप्रज्ञा बुद्धविहाराचे सचिव प्राणहंस मेश्राम हे शिवजयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष होते; तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे, सतीश भोवते, मनोज बारसागडे व सुनील करवाडे हे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे म्हणाले, शिवाजी महाराजांसारखा लढवय्या व नैतिक गुणसंपन्न राजा महाराष्ट्राच्या भूमीत जन्मास आला, ही राज्यासाठीच नाही तर भारत देशासाठीसुद्धा भूषणावह बाब आहे. शत्रूंच्या लेकीबाळींना आई-बहिणीसमान लेखून त्यांना सन्मान देणारा राजा या भारतभूमीवर मला आजतागायत सापडलेला नाही. रयतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन, त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करून स्वराज्याच्या भूमीवर स्वर्ग निर्माण करणारा तो एकमेव रयतेचा राजा आहे.

यावेळी महाराष्ट्र कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सतीश भोवते आपल्या उद्बोधनात म्हणाले की, राजे शिवाजी हे एक प्रभावी व उच्च प्रतीचे रणनीतिज्ञ होते. त्यांनी आपल्या रणकौशल्याने अनेक कठीण प्रसंगांतील लढाया जिंकल्या. त्यांच्या प्रत्येक मावळ्यात स्वराज्यप्राप्तीची ओढ होती. स्वराज्यरक्षणासाठी त्यांनी अभेद्य आरमाराची निर्मिती केली होत, हे त्यांच्या संरक्षणकौशल्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. सुनील करवाडे यांनी संचालन केले, तर मनोज बारसागडे यांनी आभार मानले.