शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र वीज भारनियमन मुक्तच आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : सध्या राज्यात शेतकºयांना आठ तास आणि ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा केला जात आहे. ...

ठळक मुद्देविश्वास पाठक : शेतकऱ्यांना आठ तास वीज पुरेशी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सध्या राज्यात शेतकºयांना आठ तास आणि ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा केला जात आहे. शेतकºयांना आठ तास वीज पुरेशी असून त्यापेक्षा अधिक वीज दिली तर भुगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य भारनियमन मुक्तच आहे, असे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.गत चार वर्षात ऊर्जा विभागाने केलेल्या विकास कामाचा आढावा घेत त्यांनी शासनाचा विविध योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, भारनियमन होत असल्याची ओरड सर्वत्र आहे. परंतु शेतकºयांना आठ तास आणि ग्राहकांना २४ तास वीज देण्याचा नियम आहे. त्यापेक्षा कमी वीज दिली तर भारनियमन म्हणता येईल. सध्या शेतकºयांना रात्री वीज दिली जाते. त्यामुळे त्यांच्यापुढे विविध समस्या आहेत. दिवशी वीज पुरवठा कशा केला जाईल, यावर उपाययोजना सुरु असून अटल सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून दिवसा वीज देण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी सांगितले. वीज वितरण कंपनीने सेंट्रलाईज बिलींग सिस्टम आणली असून २ कोटी २५ लाख ग्राहक तंत्रज्ञानाचा वापर करतात. तर १ कोटी ४० लाख ग्राहक मोबाईलशी जोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात तंत्रज्ञानाचा वापर वाढविला जाणार असून ग्राहकांना ई-मेलवरच बिल पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे वीज वितरणचे प्रत्येक बिलामागे दहा रुपये वाचतिल. त्याचा अप्रत्यक्ष फायदा ग्राहकांनाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात प्रत्येक गावात व घरात वीज पोहचविली जात असून गडचिरोली व नंदूरबार जिल्हा वगळताच सर्वच गावात वीज पोहचल्याचा दावा त्यांनी केला. वीजेचे अपघात टाळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात असून ५० वर्षावरील कर्मचाºयांच्या मदतीला हेल्पर देण्यात आले आहे. तसेच लवकरच २३ हजार ग्रामविद्युत सेवक नियुक्त केले जातील असेही पाठक यांनी सांगितले.जिल्ह्यात वीज दुरुस्ती कामांसाठी ४६ कोटीवीज वितरण कंपनीचे गावागावत असलेले खांब वाकले आहेत. तार लोंबकळत आहेत. त्यामुळे अपघाताची भीती वाढली आहे. या कामांच्या दुरुस्तीसाठी भंडारा जिल्ह्यात ४६ कोटी रुपये मंजूर आहे. अलीकडेच ११ कोटी ५० लाख रुपयांचे टेंडर काढण्यात आले असून वर्षभरात ही कामे पुर्ण होतील असे विश्वास पाठक यांनी सांगितले.

टॅग्स :electricityवीज