शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

महाराष्ट्र वीज भारनियमन मुक्तच आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : सध्या राज्यात शेतकºयांना आठ तास आणि ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा केला जात आहे. ...

ठळक मुद्देविश्वास पाठक : शेतकऱ्यांना आठ तास वीज पुरेशी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सध्या राज्यात शेतकºयांना आठ तास आणि ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा केला जात आहे. शेतकºयांना आठ तास वीज पुरेशी असून त्यापेक्षा अधिक वीज दिली तर भुगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य भारनियमन मुक्तच आहे, असे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.गत चार वर्षात ऊर्जा विभागाने केलेल्या विकास कामाचा आढावा घेत त्यांनी शासनाचा विविध योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, भारनियमन होत असल्याची ओरड सर्वत्र आहे. परंतु शेतकºयांना आठ तास आणि ग्राहकांना २४ तास वीज देण्याचा नियम आहे. त्यापेक्षा कमी वीज दिली तर भारनियमन म्हणता येईल. सध्या शेतकºयांना रात्री वीज दिली जाते. त्यामुळे त्यांच्यापुढे विविध समस्या आहेत. दिवशी वीज पुरवठा कशा केला जाईल, यावर उपाययोजना सुरु असून अटल सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून दिवसा वीज देण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी सांगितले. वीज वितरण कंपनीने सेंट्रलाईज बिलींग सिस्टम आणली असून २ कोटी २५ लाख ग्राहक तंत्रज्ञानाचा वापर करतात. तर १ कोटी ४० लाख ग्राहक मोबाईलशी जोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात तंत्रज्ञानाचा वापर वाढविला जाणार असून ग्राहकांना ई-मेलवरच बिल पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे वीज वितरणचे प्रत्येक बिलामागे दहा रुपये वाचतिल. त्याचा अप्रत्यक्ष फायदा ग्राहकांनाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात प्रत्येक गावात व घरात वीज पोहचविली जात असून गडचिरोली व नंदूरबार जिल्हा वगळताच सर्वच गावात वीज पोहचल्याचा दावा त्यांनी केला. वीजेचे अपघात टाळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात असून ५० वर्षावरील कर्मचाºयांच्या मदतीला हेल्पर देण्यात आले आहे. तसेच लवकरच २३ हजार ग्रामविद्युत सेवक नियुक्त केले जातील असेही पाठक यांनी सांगितले.जिल्ह्यात वीज दुरुस्ती कामांसाठी ४६ कोटीवीज वितरण कंपनीचे गावागावत असलेले खांब वाकले आहेत. तार लोंबकळत आहेत. त्यामुळे अपघाताची भीती वाढली आहे. या कामांच्या दुरुस्तीसाठी भंडारा जिल्ह्यात ४६ कोटी रुपये मंजूर आहे. अलीकडेच ११ कोटी ५० लाख रुपयांचे टेंडर काढण्यात आले असून वर्षभरात ही कामे पुर्ण होतील असे विश्वास पाठक यांनी सांगितले.

टॅग्स :electricityवीज