शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; निवडणुकीचा ज्वर चढला, गावागावांत रंगले गप्पांचे फड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 06:00 IST

ग्रामपंचायतीची असो की लोकसभेची. त्यावर गावात चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. गावपुढारी राजकीय विश्लेषकाच्या भूमिकेत दिसत आहे. आपल्या मतदारसंघासोबतच राज्याच्या कानाकोपऱ्यातील निवडणुकीवर चर्चा झडत आहे. नेत्यांच्या भाषणावरही गावागावांत विश्लेषन करणारी मंडळी कमी नाही.

ठळक मुद्देप्रचाराची रणधुमाळी : हॉटेल, टपरी, चावडीत एकच चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विधानसभा निवडणुकीचा ज्वर ग्रामीण भागात चढला असून हॉटेल, टपरी, चावडी असो की खासगी बैठक सर्वत्र एकच चर्चा दिसत आहे. उमेदवारांच्या आघाडीसोबत जातीय समीकरणांवर प्रत्येकजण तावातावाने बोलताना गावागावांत दिसत आहे. राजकीय नेत्यांच्या प्रचार सभांनी ग्रामीण वातावरण ढवळून निघत असून आता चर्चेचा केवळ एकच विषय तो म्हणजे विधानसभा निवडणूक़यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा बोलबाला दिसत असला तरी चार जण एकत्र आले की, निवडणुकीवरच गप्पा रंगताना दिसत आहे. भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. निवडणूक हा विषय ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक आहे.ग्रामपंचायतीची असो की लोकसभेची. त्यावर गावात चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. गावपुढारी राजकीय विश्लेषकाच्या भूमिकेत दिसत आहे. आपल्या मतदारसंघासोबतच राज्याच्या कानाकोपऱ्यातील निवडणुकीवर चर्चा झडत आहे. नेत्यांच्या भाषणावरही गावागावांत विश्लेषन करणारी मंडळी कमी नाही. कोणत्याही हॉटेल, पानटपरीवर आता दोन व्यक्ती समोर आले की काय म्हणजे निवडणूक अशीच विचारणा केली जाते.प्रत्येकजण तटस्थपणे निवडणुकीचे विश्लेषन करण्याचा प्रयत्न असला तरी त्यात उमेदवाराची महती सांगून कुणालातरी पुढे करण्याचा प्रयत्न केला जातो.कुणाकडे पाहुणा आला की त्याचाही विषय निवडणूक हाच असतो. तुमच्या मतदारसंघात नेमकी काय स्थिती आहे, याचा अंदाज घेतला जातो. राजकारणाशी काडीमात्र संबंध नसणारेही आता एखाद्या वाहिणीवरील राजकीय विश्लेषकासारखे चर्चा करताना दिसून येते.या चर्चांचा उद्देश कोणताच नसला तरी ग्रामीण जीवनात राजकीय गप्पा विरंगुळा झाले आहे.ग्रामीण भागात जातीय समीकरणांची मोठी पकड असते. उमेदवार कोणत्या समाजाचा आहे येथपासून कोणता समाज कुणाच्या पाठीमागे राहील. ऐन वेळेवर कोण कसा दगा देईल, यावरही ठामपणे मत मांडणारे दिसतात. यात मात्र माझेच खरे असे म्हणणारे आहे.जातीय समीकरणाला निवडणुकीत झाला नसला तरी उमेदवार असो की कार्यकर्ते निवडणुकीत जातीचाच आधार घेतात हे आजपर्यंतच्या निवडणुकांवरून सिद्ध झाले. याही निवडणुकीत तेच दिसत आहे.गावपुढाऱ्यांची दिवाळीविधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गावपुढाºयांची दिवाळीपुर्वीच दिवाळी सुरू झाली आहे. गावात प्रभाव असणारे अनेकजण आता नेत्यांच्या मागेपुढे फिरताना दिसत आहे. दुचाकीवर कायम असणारे गावपुढारी सध्या अलिशान वाहनाशिवाय फिरताना दिसत नाही. रात्री घरचे जेवणही त्यांना गोड लागेनाशी झाले आहे. गावानजीकच्या किंवा शहरातील हॉटेलमध्ये गावपुढाºयांची गर्दी वाढू लागली आहे. हेच पंधरा दिवस आहे. नंतर आपल्याला कोण विचारतो, असे म्हणत गावपुढारी दिवाळी साजरी करीत आहे.भाऊ आम्ही तुमचेच...प्रचारासाठी प्रत्येक पक्षाचे उमेदवार, पुढारी, कार्यकर्ते गावागावांत जात आहे. हात जोडून मतांचा जोगवा मागत आहे. दारापुढे येणाºया प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला भाऊ आम्ही तुमचेच, असे म्हणत वेळ मारून नेली जात आहे. कुणाला आताच नाराज कशाला करायचे. वेळ आल्यावर मत कुणाला द्यायचे हे ठरवू, असे चित्र ग्रामीण भागात सध्या तरी दिसत आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडारा