बोधीरत्न नायक थेरो यांचे प्रतिपादन : माघ पौर्णिमा महोत्सवनिमित्त बौध्द मेळाव्यातजवाहरनगर : प्रत्येक समाजात अहंकारीक लोक आहेत. यामुळे समाजाचे नुकसान होते. पुज्यनीय लोकांचे आदर करावे. विद्या संपादन करणे, आई-वडीलांची सेवा करणे, आदर करणे, नम्रता बाळगणे, संतुष्ट राहणे आदी वेळोवेळी धम्म श्रवण करने हे उत्तम मंगल होय. यासाठी महामंगल सुत्राचे ग्रहण करणे गरजचे, असे प्रतिपादन एन. बोधीरत्न महाथेरो यांनी केले.दसबल पहाडी हत्तीडोई ट्रस्ट द्वारा वर्ल्ड पिस महोत्सव व माघ पौर्णिमा महोत्सवाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. भदंत राहुल बोधी, डॉ. धम्मदीप महाथेरो, डॉ. भदंत कारोनीको महाथेरो, धम्मज्योती महाथेरो, भदंत वक्कली महाथेरो, भदंत सम्यकबोधी, भिक्षुनी संघप्रिया थेरी, श्रमण राहुल, भिखु उत्तम बोधी, शिलभद्र, शांती बोधी, भदंत मनोरत्न, धम्मप्रिय, भिखुणी, संघशिला, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार प्रकाश गजभिये, एम. एस. मस्के, संघमित्रा मस्के, अमृत बन्सोड, वसंत हुमणे, वामन मेश्राम, शंकर मेश्राम, निर्मला गोस्वामी, महादेव मेश्राम, अविनाश कांबळे, प्रशांत गजभिये, कपूरचंद बोरकर उपस्थित होते. आमदार अवसरे म्हणाले, ज्या अंगी प्रज्ञा असेल तोच खरा बुध्दीष्ट, आईवडीलांची सेवा करा, प्रेमाने जग जिंकता येतो हे तथागत बुध्दाने सिध्द करुन दाखविले आहे. जो शिलवान तेच बलवान, आचारणात विचार करणे गरजेचे आहे. डॉ. बोधी म्हणाले, मंगल मैत्री करणे गरज आहे. आई-वडीलांचे कर्तव्य आहे. प्रास्ताविक भदन्त आर्यनाग अन्तदर्शी थेरो यांनी केले. रात्रीला समाजप्रबोधनकार अनिरुध्द बनकर व संच यांचा ‘मी वादळ वारा’ शाहिरी कार्यक्रम झाला. मेळाव्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फ्रंट फॉर सोशल जस्टीश अॅड पीस भंडारा, सरपंच मुकेश शेंद्रे, उपसरपंच नाना बांडेबुचे, ग्रामरोजगार सेवक होमदेव आकरे, शंकर मारबते, हेमदेव पडोळे, अनमोल गेडाम, लोकेश चव्हाण, ग्राम विकास अधिकारी कोडवते, मोरेश्वर गजभिये, मदनपाल गोस्वामी, शंकर घरडे व परिसरातील बुध्द विहार समितीचे पदाधिकारी, उपासक, उपासिका यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
महामंगल सूत्राचे ग्रहण करणे गरजेचे
By admin | Updated: February 23, 2016 00:24 IST