शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

‘मधुमक्षिका’ देईल शेतकऱ्यांना आर्थिक आधार

By admin | Updated: December 27, 2014 22:45 IST

जगातील सर्व मधमाशा नष्ट झाल्यास केवळ चार वर्षांत जगाचा नायनाट होईल, असे भाकित २० व्या शतकातील महान वैज्ञानिक अलबर्ट आईनस्टाईन यांनी केले होते. हे किती खरे आहे

भंडारा : जगातील सर्व मधमाशा नष्ट झाल्यास केवळ चार वर्षांत जगाचा नायनाट होईल, असे भाकित २० व्या शतकातील महान वैज्ञानिक अलबर्ट आईनस्टाईन यांनी केले होते. हे किती खरे आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे़ परंतु मधमाशी पालनाने शेतकरी स्वयंपूर्ण होऊ शकतो, असा निष्कर्ष पवनी येथील विज्ञान महाविद्यायाचे प्रा. डॉ. संजय घुगल व प्रा. डॉ. बी.एस. राहिले यांनी नोंदविला आहे. मधमाशा व पिके एकमेकांना पूरकभारत अन्नधान्याच्या उत्पादनात जगात पाचव्या स्थानी आहे. मात्र महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची स्थिती फारशी चांगली नाही. अल्पभूधारक शेतकरी आजही शेतीला योग्य पूरक व्यवसायाच्या शोधात आहे. ‘मधुमक्षिका’ पालन हा त्याच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो़ पृथ्वीवरील जीवांच्या उत्क्रांती प्रक्रियेत प्राणी जीवन निर्माण होण्यापूर्वी फुलणाऱ्या वनस्पतीवर खाद्यासाठी पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या मधमाश्यांचा जन्म झाला. शेतातील पिके, वनस्पती व मधमाशा हे एकमेकांना पूरक आहेत. शेतपिकापैकी गळिताची धान्ये, कडधान्ये, चाऱ्याची पिके, मसाल्यांची पिके, बियाण्याची पिके व फळफळावळ यासारखी पिके परागभवनासाठी मधमाशांसारख्या किटकावर अवलंबून असतात. मधमाशांना परागफलन केल्याने या पिकांची प्रत वाढत असल्याचे निष्कर्ष नोंदविण्यात आले आहेत. मधमाश्यांअभावी चांगले उत्पादन होऊ शकत नाही असा निष्कर्षही या संशोधकांनी काढला आहे. इतर कोणत्याही कीटकांपेक्षा पराग फलनासाठी मधमाशा कार्यक्षम आहेत. मधमाशी पालनातील अडचणीमधमाश्यांच्या एका वसाहतीत सुमारे ५ ते १० हजार मधमाशा असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात परागसिंचन करण्याची क्षमता दुसऱ्या कोणत्याही किटकांत नसते. या मधमाशा फुलातील मकरंद गोळा करून मधाची निर्मिती करतात. त्यांचे हे कार्य निरंतर सुरू असते. पाळीव मधमाश्यांच्या वसाहतीच्या माध्यमातून हमखास परागफलन करता येते. महाराष्ट्रात सुमारे २१० लाख हेक्टर क्षेत्र निरनिराळ्या पिकांच्या लागवडीखाली आहे. तृणधान्य व भुईमूग वगळता सर्वच गळितांच्या पिकांच्या फुलोऱ्यापासून मधनिर्मिती केली जाते. मात्र मधमाशी पालनात काही अडचणी आहेत. खरीप व रबी हंगाम वगळता अन्य हंगामात त्यांना पुरेसे खाद्य मिळत नाही. कीटकनाशकांचा अती वापर हा मधमाशांसाठी हानीकारक ठरला आहे.स्वयंरोजगार प्रदान करणारा व्यवसाय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या यासाठी शासनाने डॉ. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्यांनी आपल्या अहवालात शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी अशी शिफारस केली आहे. मधमाशी पालनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो असा निष्कर्ष डॉ.घुगल व डॉ. राहिले यांनीही आपल्या अभ्यासात नोंदविला आहे. मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना एकरी पिक वाढीस मदत मिळू शकते. फुलात सुकून वाया जाणारा मकरंद व पराग मधमाशांच्या माध्यमातून गोळा करून कोट्यवधी रुपये किमतीच्या मधाची व मेनाची निर्मिती केली जाऊ शकते. मधमाशी पालन हा व्यवसाय स्वयंरोजगार प्रदान करणारा ठरू शकतो. यासोबतच या व्यवसायाला लागणारे पूरक व्यवसाय देखील गावांत निर्मित केले जाऊ शकतात. एका शेतकऱ्याने ८ ते १० वसाहती पाळल्यास त्याला चांगला मोबदला मिळू शकतो. (जिल्हा प्रतिनिधी)