शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

‘स्वच्छ भारत’ला खो

By admin | Updated: July 13, 2015 00:51 IST

उघड्यावर होत असलेल्या शौचामुळे अनेक आजार जडत असल्याचे पुढे आल्याने गावागावात स्वच्छ भारत अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

गाव सीमेवरील दुर्गंधी कायम : शासनाच्या योजना ठरताहेत कुचकामीतुमसर : उघड्यावर होत असलेल्या शौचामुळे अनेक आजार जडत असल्याचे पुढे आल्याने गावागावात स्वच्छ भारत अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यात शासकीय अनुदानावर शौचालय बांधण्याची योजना अंमलात आली. अनेकांनी योजनेचा लाभ घेत शौचालय बांधले, मात्र त्याचा वापर होत नसल्याचे गावाच्या शीवेवर जाताच दिसून येते. कोट्यवधी रुपये खर्च झाले तरी गाव येताच येणारी दुर्गंधी कायमच असल्याचे दिसते.यावर प्रतिबंध लावण्याकरिता उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. याकरिता पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर गुड मॉर्निंग पथक निर्माण करण्यात आले. या पथकांतर्गत कोणतीही कारवाई होत नसल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. शासनाची ही योजना राबविण्यात कर्मचारीही नाखूष असल्याने ती यशस्वी होत असल्याने ती यशस्वी होत नसल्याचे दिसून आले आहे.उघड्यावर शौच करणाऱ्यावर कारवाई करण्याकरिता विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. ग्रामपंचायत अधिनियम १९८५ च्या कलम ४९ अंतर्गत ग्रामपंचायतचे कार्य चालविण्यासाठी विविध ग्राम विकास समितीचे गठन करण्यात आले आहे. यात गावातील गणमान्य व्यक्तींचा समावेश असेल. समितीच्या सदस्यांना शौचालय उपयोगाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत व पंचायत समितीस्तरावर गुड मॉर्निंग पथकच्यावतीने गस्त घालण्याचे आदेशात म्हटले आहे.ग्रामीण क्षेत्रातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात स्मार्ट फोनचा उपयोग करीत आहेत. स्वच्छ भारत मिशनच्यावतीने वॉटसअ‍ॅपसारखे अँप तयार करुन स्वच्छतेसंबंधी माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. घाण पसरविणाऱ्यांवर काय कारवाई केली जाऊ शकते. याची माहिती तांत्रिक माध्यमाने देण्यात येणार आहे. त्याची सुरुवात अद्यापही झालेली नाही. या निर्णयावर कारवाई सुरु झाली त्यावर अंमलबजावणीची शंकाच आहे. ग्रामीण भागात शासनाच्या योजना कुचकामी ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)