शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

झिरो अटेंडन्सला खो

By admin | Updated: June 2, 2017 00:21 IST

यंदाचा बारावीचा निकाल अपेक्षेप्रमाणे बरा लागला. यात बहुतांश विद्यार्थी शालेय शिक्षणासोबतच शिकवणी वर्गाचाही साथ घेत होती.

लोकमत शुभवर्तमान : दहावीच्या निकालानंतर वाढणार लगबग लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यंदाचा बारावीचा निकाल अपेक्षेप्रमाणे बरा लागला. यात बहुतांश विद्यार्थी शालेय शिक्षणासोबतच शिकवणी वर्गाचाही साथ घेत होती. परंतु काळानुरुप शाळेत नोंदणी करून फक्त शिकवणी वर्गाला जायचे हा फंडा या वर्षी विद्यार्थ्यांनीच मोडून काढल्याचे दिसत आहे. झिरो अटेंडन्स ही मनोप्रवृत्ती बदलत असल्याने येणाऱ्या काळात याचे चांगले प्रतिसाद पाहायला मिळतील यात दुमत नाही.इयत्ता दहावीचा निकाल लागला ही कुजबूज सुरु होते, ती इयत्ता अकरावीमध्ये प्रवेशासाठी. काही विद्यार्थी अकरावीला प्रवेश न घेता अन्यत्र व्यवसायीक अभ्यासक्रमाकडेही वळतात. अकरावीत आपल्या आवडत्या शाळेत किंवा महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर शिक्षणाला किंवा त्या सत्राला सुरुवात होते. परंतु बऱ्याच पालकांचा किंबहुना विद्यार्थ्यांचा कल अशा शाळांमध्ये असतो की जिथे झिरो अटेंडन्सला प्राधान्य दिले जात असते. मात्र या वर्षीच्या बारावीच्या निकालात ज्या शाळांमध्ये नियमित इयत्ता १२ वी चे वर्ग झाले, अभ्यासक्रम पूर्ण झाला व सराव परीक्षा यशस्वीपणे पार पडली. अशा शाळांचा निकालही उत्कृष्ट लागल्याचे दिसून आले. शाळेमध्ये प्रवेश घेऊन शाळेच्या तासिकेला, प्रात्यक्षिकांना गैरहजर राहणे, शाळेच्या विविध स्पर्धांपासून दूर राहून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होऊ शकतो ही धारणाच विद्यार्थ्यांनीच झिडकारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. एकीकडे शासन जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून सर्वांगिण शिक्षण ही मुलभूत संकल्पना रूजू करीत आहे. यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक विकासावरही भर देत आहे. अशा स्थितीत झिरो अटेंडन्स या संस्कृतीला खतपाणी घालणे म्हणजे भविष्यातील पिढीला संकटात घालण्यासारखे आहे. हीच बाब हेरून प्राचार्यांसह काही उमद्या शिक्षकांनीही झिरो अटेंडन्सला विरोध करून पालकांमध्ये जागृतीचे कार्य अविरत सुरु केले आहे. येणाऱ्या शैक्षणिक सत्रातही शाळेत प्रवेश घेऊन अन्यत्र शिक्षणाला किंवा शिकवणी वर्गाला जाणाऱ्या प्रवृत्तीला आळा बसविता येईल असे वाटत आहे.झिरो अटेंडन्स ही मनोप्रवृत्ती हळूहळू नष्ट झाली पाहिजे. विद्यार्थ्यांचा विकास शिकवणी वर्गातून नव्हे तर शाळेतूनच झाला पाहिजे. विद्यार्थ्यांचे मनोबल व शिक्षणाकडे त्यांचा कल शाळेतील उपस्थितीमुळे वाढला आहे. लालबहादूर शास्त्री विद्यालयातही झिरो अटेंडन्स या उपक्रमाला प्राधान्य देण्यात येत आहे.- डी.व्ही. देशमुख, प्राचार्य, शास्त्री विद्यालय, भंडारा.