शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

झिरो अटेंडन्सला खो

By admin | Updated: June 2, 2017 00:21 IST

यंदाचा बारावीचा निकाल अपेक्षेप्रमाणे बरा लागला. यात बहुतांश विद्यार्थी शालेय शिक्षणासोबतच शिकवणी वर्गाचाही साथ घेत होती.

लोकमत शुभवर्तमान : दहावीच्या निकालानंतर वाढणार लगबग लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यंदाचा बारावीचा निकाल अपेक्षेप्रमाणे बरा लागला. यात बहुतांश विद्यार्थी शालेय शिक्षणासोबतच शिकवणी वर्गाचाही साथ घेत होती. परंतु काळानुरुप शाळेत नोंदणी करून फक्त शिकवणी वर्गाला जायचे हा फंडा या वर्षी विद्यार्थ्यांनीच मोडून काढल्याचे दिसत आहे. झिरो अटेंडन्स ही मनोप्रवृत्ती बदलत असल्याने येणाऱ्या काळात याचे चांगले प्रतिसाद पाहायला मिळतील यात दुमत नाही.इयत्ता दहावीचा निकाल लागला ही कुजबूज सुरु होते, ती इयत्ता अकरावीमध्ये प्रवेशासाठी. काही विद्यार्थी अकरावीला प्रवेश न घेता अन्यत्र व्यवसायीक अभ्यासक्रमाकडेही वळतात. अकरावीत आपल्या आवडत्या शाळेत किंवा महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर शिक्षणाला किंवा त्या सत्राला सुरुवात होते. परंतु बऱ्याच पालकांचा किंबहुना विद्यार्थ्यांचा कल अशा शाळांमध्ये असतो की जिथे झिरो अटेंडन्सला प्राधान्य दिले जात असते. मात्र या वर्षीच्या बारावीच्या निकालात ज्या शाळांमध्ये नियमित इयत्ता १२ वी चे वर्ग झाले, अभ्यासक्रम पूर्ण झाला व सराव परीक्षा यशस्वीपणे पार पडली. अशा शाळांचा निकालही उत्कृष्ट लागल्याचे दिसून आले. शाळेमध्ये प्रवेश घेऊन शाळेच्या तासिकेला, प्रात्यक्षिकांना गैरहजर राहणे, शाळेच्या विविध स्पर्धांपासून दूर राहून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होऊ शकतो ही धारणाच विद्यार्थ्यांनीच झिडकारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. एकीकडे शासन जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून सर्वांगिण शिक्षण ही मुलभूत संकल्पना रूजू करीत आहे. यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक विकासावरही भर देत आहे. अशा स्थितीत झिरो अटेंडन्स या संस्कृतीला खतपाणी घालणे म्हणजे भविष्यातील पिढीला संकटात घालण्यासारखे आहे. हीच बाब हेरून प्राचार्यांसह काही उमद्या शिक्षकांनीही झिरो अटेंडन्सला विरोध करून पालकांमध्ये जागृतीचे कार्य अविरत सुरु केले आहे. येणाऱ्या शैक्षणिक सत्रातही शाळेत प्रवेश घेऊन अन्यत्र शिक्षणाला किंवा शिकवणी वर्गाला जाणाऱ्या प्रवृत्तीला आळा बसविता येईल असे वाटत आहे.झिरो अटेंडन्स ही मनोप्रवृत्ती हळूहळू नष्ट झाली पाहिजे. विद्यार्थ्यांचा विकास शिकवणी वर्गातून नव्हे तर शाळेतूनच झाला पाहिजे. विद्यार्थ्यांचे मनोबल व शिक्षणाकडे त्यांचा कल शाळेतील उपस्थितीमुळे वाढला आहे. लालबहादूर शास्त्री विद्यालयातही झिरो अटेंडन्स या उपक्रमाला प्राधान्य देण्यात येत आहे.- डी.व्ही. देशमुख, प्राचार्य, शास्त्री विद्यालय, भंडारा.