शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

भगवान नृसिंहाचे पावनधाम पर्यटन विकासापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 21:35 IST

मोहाडी / तुमसर तालुक्याच्या सीमेवर गोंदिया राज्य मार्गावरील वैनगंगेच्या पवित्र पात्रात वसलेल्या भगवान नृसिहांचे पावनधाम पर्यटनीय विकसापासून वंचित आहे. विकासाचा निधी खेचून आणण्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असून निव्वळ विकासाच्या दंतकथा रंगवून सांगितल्या जात असल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

ठळक मुद्देभाविकांचे श्रद्धास्थान : लोकप्रतिनिधींना पडला आश्वासनाचा विसर, भाविकांमध्ये नाराजी

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी / तुमसर तालुक्याच्या सीमेवर गोंदिया राज्य मार्गावरील वैनगंगेच्या पवित्र पात्रात वसलेल्या भगवान नृसिहांचे पावनधाम पर्यटनीय विकसापासून वंचित आहे. विकासाचा निधी खेचून आणण्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असून निव्वळ विकासाच्या दंतकथा रंगवून सांगितल्या जात असल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे.माडगी / देव्हाडा येथील भगवान नृसिहांचे तिर्थक्षेत्र मीनी पंढरी व विदर्भाची काशी म्हणूनही ओळखली जाते. वैनगंगा नदी टेकडी तीन भागात विभाजीत झाली आहे. मध्यभागी अखंड व उंच टोकावर मंदिर आहे. औदूंबर पारावर कडूलिंब, चिंच, पिंपळ आदी वृक्षांनी टेकडी वेढली आहे. प्राचीन काळी हे स्थळ योगी साधू सन्याशांचे साधनेचे स्थान होते. वाघासारख्या हिंस्त्र पशूंचेही येथे संचार होता. पांढऱ्या शुभ्र मंदिरातील लाल, भगवी, पताका सोनेरी सूर्यकिरणे पडताना शोभून दिसते. मंदिराची पायरी चढताच सपाट दगडाचा चबुतरा दृष्टीस पडतो. जिथे विश्रांती घेण्याची व्यवस्था आहे तिथे दगडांच्या प्रचंड शिळ्या उभ्या आहेत. निळसर पाणी सूर्याचे किरण पडताना चमकदार दिसते. वाळूतील शंख, शिंपले, चांदण्या भल्याभल्यांना मोहून टाकतात. मंदिर प्रवेशासाठी एक मुख्य द्वार आहे. एका रुंद चबुतºयाच्या दोन्ही बाजूला ‘गालचिरी’ नामक देवीची मूर्ती विराजमान आहे. त्या देवीला शेंदराची किंवा कुंकवाची पुडी वाहून भाविक दर्शन घेऊन पुढे जातात.राजयोगी अण्णाजी महाराज, सद्गुरु योगीराज स्वामी, स्वामी सीतारामदास महाराजांच्या आदेशावरून राजयोगी अण्णाजी महाराज नृसिंह टेकडी माडगीला सन १९२८ साली आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांशी त्यांची जवळीक होती. त्यांनी माडगी येथील नृसिंह टेकडीवरील तपश्चर्या, उपासना, योगाभ्यास साधना, ध्यान साधना, प्रवचन तसेच अनेक शास्त्रांचा अभ्यास केला.महाराष्ट्र शासनातर्फे माडगी येथील नृसिंह टेकडीला पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातून नृसिंह टेकडी परिसरात विकासासाठी भरीव पर्यटन विकास निधी खेचून आणण्याचे आश्वासन अनेकदा लोकप्रतिनिधींनी दिले आहेत. परंतु आश्वासनांच्या पूर्तता करण्यात अपयशी ठरले आहे. लोकप्रतिनिधींनी भाविकांना दिलेल्या शब्दाची आठवण करीत यावर्षी कार्तिक पौर्णिमेला भरणाºया यात्रेत दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी कटीबद्ध राहावे, अशी अपेक्षा आहे.कार्तिक पौर्णिमेनंतर १५ दिवसांची यात्राकार्तिक पौर्णिमेनंतर अमावस्यापासून दरवर्षी १५ दिवसांची मोठी यात्रा नदीच्या खुल्या पात्रात भरत असते. यात्रेला विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राज्यातील हजारो भाविकांची उपस्थिती लाभते. वैनगंगेच्या निर्मल, पवित्र पाण्यात स्नान करून पूजाअर्चना केली जाते. वैनगंगेच्या कुशीत मोठ्या दगडाच्या टेकडावर पांढरेशुभ्र नृसिहांचे मंदिर आहे. या ऐतिहासिक मंदिरात दोन मूर्ती आहेत. एक रौद्र रुप तर, दुसरी साधी भोळी प्रतिकृतीची आहे. येथील मंदिराविषयी एक आख्यायीका पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे.