शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मुख्याध्यापकाच्या बदलीसाठी शाळेला ठोकले कुलूप

By admin | Updated: January 14, 2017 00:29 IST

स्नेहसंमेलनाच्या पत्रिकेत नाव नोंदविण्याच्या कारणावरुन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्यात झालेल्या ...

पिंडकेपार येथील घटना : गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारभंडारा : स्नेहसंमेलनाच्या पत्रिकेत नाव नोंदविण्याच्या कारणावरुन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्यात झालेल्या वादाच्या पर्यावसातून शाळेला कुलूप ठोकण्यात आले. ही घटना भंडारा तालुक्यातील पिंडकेपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. यावेळी संतप्त झालेल्या शाळा समितीच्या अध्यक्षासह काही ग्रामस्थांनी मुख्याध्यापक श्रावण हजारे यांची बदली करण्याची मागणी केली आहे. पिंडकेपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ४ या वर्गात एकुण ३२ विद्यार्थी आहेत. शाळेची इमारत जिर्ण झाली असल्याने विद्यार्थी झाडाखाली किंवा बांधण्यात आलेल्या एका खोलीत विद्यार्जन करतात. मुख्याध्यापक श्रावण हजारे हे शाळेत येतात, मात्र विद्यार्थ्यांना शिकवित नाहीत असा आरोपही त्यांच्यावर यावेळी लावण्यात आला. दरम्यान २२ जानेवारीला शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त निमंत्रण पत्रिका छपाईचे काम हाती घेण्यात येणार होते. त्यासाठी निमंत्रण पत्रिकेत कुणाची नावे घालायची या विषयावर चर्चा करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंदराव कावळे व मुख्याध्यापक श्रावण हजारे यांच्यामध्ये वाद झाला. वादात मुख्याध्यापक हजारे यांनी कावळे यांना माझी बदली करुन दाखवा, असे झाल्यास सप्रेम भेट म्हणून मी तुम्हाला ५० हजार रुपये देईन असे बोलले. याच कारणावरुन आज सकाळी संतप्त झालेल्या कावळे यांच्यासह अन्य गावकरी शाळेत आले. तसेच अध्यक्षांसोबत असभ्य बोलणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करुन त्यांची बदली करावी या कारणासाठी शाळेला कुलूप ठोकण्यात आले. यावेळी पं.स. सदस्य वर्षा साकुरे, सरपंच प्रशांत रामटेके, पोलीस पाटील साठवणे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष बबलु आतिलकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुख्याध्यापकांना पाठिंबाक्षुल्लक कारणावरुन मुख्याध्यापकांना नाहकच गोवले जात आहे. त्यांची मागील चार वर्षांची कामगिरी चांगली आहे. त्यांनी या शाळेत विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल अशी कामे केली आहेत. त्यांच्यावर लावण्यात आलेला आरोप योग्य नाही. चर्चा करुन विषय सोडविण्यात यावा, अशी प्रतिक्रिया येथील उपस्थित काही महिलांनी व्यक्त केली. मात्र या वादात शाळा बंद करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवु नये याची काळजी घेतली जावी असेही मत व्यक्त केले. यावरुन या महिलांचा मुख्याध्यापकांना पाठींबा असल्याचे जाणवले.मागील चार वर्षांपासून शाळेत विविध उपक्रमांसह शालेय वास्तु बांधकामासाठी पाठपुरावा करीत आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व्हावे असा हेतु माझा कधीही राहिलेला नाही. स्वखर्चाने मी काही कामे केली आहेत. याची कबुली स्वत: पालकांसह विद्यार्थीही देतात. माझ्या बोलण्याने कुणाचे मन दुखावले असेल तर मी जाहिरपणे माफी मागतो. - श्रावण हजारे, मुख्याध्यापक, जि.प. शाळा, पिंडकेपारशाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांसोबत असभ्य भाषा वापरणे अत्यंत चुकीची बाब आहे. असे वर्तण कदापी खपवून घेण्यात येणार नाही. मुख्याध्यापकांची बदली करण्यात यावी, हीच मुख्य मागणी आहे.- बबलू आतिलकर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, पिंडकेपार