शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

कर्जमाफीचा उतारा आता शेतकºयांच्या मानगुटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:42 IST

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाला तोंड देत आहे. असे असताना मागीलवर्षीच्या दुष्काळाची परतफेड करण्यासाठी शासनाने दहा पानाचा आॅनलाईन उतारा आता शेतकºयांच्या मानगुटीवर आणून बसविला आहे.

ठळक मुद्देप्रफुल पटेल यांचा आरोप : लाखांदूर येथे कार्यकर्त्यांची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाला तोंड देत आहे. असे असताना मागीलवर्षीच्या दुष्काळाची परतफेड करण्यासाठी शासनाने दहा पानाचा आॅनलाईन उतारा आता शेतकºयांच्या मानगुटीवर आणून बसविला आहे. कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला.लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित कार्यकर्ता सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, अविनाश ब्राम्हणकर, वासुदेव तोंडरे उपस्थित होते. यावेळी खा.पटेल म्हणाले, शासनाने कर्जमाफीचे धोरण हे शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरली आहे. आॅनलाईनमुळे ‘नको रे बाबा पीक कर्ज’ असे म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी चर्चा करून कर्जमाफीची आॅनलाईन प्रणाली बंद करण्याची मागणी केल्याचे सांगितले. शेतकºयांना मुबलक वीज पुरवठा झाला पाहिजे, पीक कर्ज तातडीने मिळाले पाहिजे. सध्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यात अपुºया पावसामुळे दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झालेली असताना राज्य शासनाने ठोस उपाययोजना करून, शेतकºयांना मदतीचा हात द्यावा. जेणेकरून शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. येत्या काळात सत्तेत येण्यासाठी आतापासुनच दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शेतकºयांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहुन न्याय मिळवुन देण्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बालु चुन्ने, सुभाष राऊत, देविदास राऊत, गोपीचंद राऊत, दीपक चिमनकर, धनराज ढोरे, प्रियंक बोरकर, कल्पना जाधव, विनोद ढोरे, देवेंद्र चौबे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.