शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

४८ गावांचा भार एकाच वीज वाहिणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST

लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील ४८ गावे एकाच ३१ केव्ही वीज वाहिणी आसगाववर अवलंबून आहेत. त्यामुळे एकाच वाहीनीवर वीजेचा भार वाढला असल्याने परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होतो. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देपालांदूर परिसरात दुय्यम वीज वाहणी आवश्यक : वारंवार होतोय वीज पुरवठा खंडीत

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : मे महिन्याला सुरुवात झाल्याने तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. नागरिकांना दिवसेंदिवस उकाडा असह्य होत आहे. मात्र अशा परिस्थितीत पालांदूर परिसरात वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक वीजेअभावी त्रस्त झाले आहेत.लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील ४८ गावे एकाच ३१ केव्ही वीज वाहिणी आसगाववर अवलंबून आहेत. त्यामुळे एकाच वाहीनीवर वीजेचा भार वाढला असल्याने परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होतो. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वीज वितरण कर्मचाऱ्यांनी याकडे त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे.गत वर्षभरापासून पालांदूर ग्रामपंचायततर्फे वीज वितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. तत्कालीन उर्जामंत्री बावनकुळे यांना देखील निवेदन देऊन समस्या मांडण्यात आली होती. मात्र आजही त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही.पालांदूर येथे महावितरणचे कार्यालय आहे. आसगाव येथून १३२ केव्ही वरुन पालांदूरात ३३ केव्हीची वीज वाहिणी जोडलेली आहे. हे अंतर २८ किमी असून या वाहीणीवर असलेले सगळे साहित्य जुनाट आहे. त्यामुळे वादळी वारा, पाऊस आल्यावर वारंवार वीज खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे.शुक्रवारी रात्री आसगाव परिसरात आलेल्या सोसाट्याच्या वाºयासह वादळाने दोन ठिकाणी वीज पडून इन्स्यूलेटर फुटले. त्यामुळे संपूर्ण रात्र पालांदूर परिसरातील नागरिकांना अंधारात काढावी लागली.पालांदूर वीज कार्यालयाचे अभियंता मयंक सिंग व हिरामण बारई यांच्या प्रयत्नाने अखेर सकाळी वीज जोडणी करण्यात आली. भरमसाठ येणारी वीज बिले पाहता. विज वितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी येथील साहित्य बदलून नागरिकांची वीजेची समस्या कायमस्वरुपी सोडविण्याची गरज आहे.वीज ग्राहकांचे लोकप्रतिनिधींकडे साकडेपालांदूर परिसरात पाण्याची सोय असल्याने अनेक शेतकरी बागायती शेती करतात. बारव्हा, लाखांदूर, सानगडी आदी सबस्टेशनला दुय्यम पुरवठ्याची जोडणी केलेली आहे. याचप्रकारे पालांदूरची देखील कायमची वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले आहे. याकडे अधिकाºयांनीही लक्ष देण्याची गरज आहे.पालांदूर येथे असणारी वीजेची समस्या वरिष्ठांना कळवली आहे. त्याअनुषंगाने कार्यवाही सुरु आहे. पालांदूर ते दिघोरी ३३ केव्ही दुय्यम वीज वाहिणीचे काम भविष्यात होऊ शकते.- मयंक सिंग,सहायक अभियंता पालांदूर

टॅग्स :electricityवीज