शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अन्न सुरक्षा योजनेच्या यादीत घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 22:11 IST

गरजू व गरीब लोकासाठी सुरू करण्यात आलेली अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्याच्या नावावरून आता वाद सुरू झालेला असून दक्षता समितीद्वारे पाठविण्यात आलेल्या नावानांच मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी मोहाडी तालुका सरपंच संघर्ष संघटनातर्फे तहसीलदार मोहाडी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गरजू व गरीब लोकासाठी सुरू करण्यात आलेली अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्याच्या नावावरून आता वाद सुरू झालेला असून दक्षता समितीद्वारे पाठविण्यात आलेल्या नावानांच मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी मोहाडी तालुका सरपंच संघर्ष संघटनातर्फे तहसीलदार मोहाडी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.अन्न सुरक्षा योजनेसाठी पात्र गरीब व गरजु व्यक्तींच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तहसिल कार्यालयातर्फे गरजु व्यक्तीच्या नावाची यादी पाठविण्याबाबद प्रत्येक गावातील ग्राम दक्षता समितीला सांगण्यात आले होते. त्यानुसार दक्षता समितीने सभा घेवून गावातील अत्यंत गरीब व गरजु व्यक्तींच्या नावाची यादी तयार करून तहसिल कार्यालयात ती यादी पाठविली होती. मात्र तहसिल कार्यालयातर्फे त्या यादीत फेरफार करून वरिष्ठ नेत्यांच्या शिफारशी नुसार त्यांच्या मर्जीतील लोकांचे नावे समाविष्ठ करण्यात आल्याने गावात कलह निर्माण झाला आहे. दक्षता समितीच्या सभेत अन्न सुरक्षा लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. राजकीय नेत्यांच्या म्हणण्यानुसार चुकीची यादी तयार करण्यात आली. त्यामुळे नेत्यांनी दिलेल्या नावांची यादी मंजुर न करता ग्राम दक्षता समितीने पाठविलेल्या यादीलाच मान्यता द्यावी, या आशयाचे निवेदन तहसिलदार सुर्यकांत पाटील यांना सरपंच संघटनेचे अध्यक्ष सदाशिव ढेंगे, महेंद्र भेंडे, महेश पटले, श्वेता येळणे, भुपेंद्र पवनकर, रामसिंग बैस आदी सरपंचाच्या स्वाक्षरीनिशी देण्यात आले.