कोंढा कोसरा : स्त्री वाद म्हणजे स्त्रियांच्या मुक्तीची चळवळ होय. स्त्रियांची मुक्ती म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून महिलांच्या अस्तित्वासाठी त्यांना मुख्य मार्गात आणण्यासाठी केलेला प्रयत्न होय. सध्या स्त्रियांची शक्ती आहे ती नष्ट झाली आहे. तिला उपयोगात आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. असे विचार प्रा.डॉ.रेखा वानखेडे यांनी सिद्धार्थ महाविद्यालय कोंढा येथे स्त्री वाद या विषयावर आयोजित चर्चासत्रात व्यक्त केले.भारत सेवक समाज सिद्धार्थ वसतिगृह पवनीदवारा संचालित भारत सेवक सिद्धार्थ महाविद्यालय कोंढा येथे स्त्री वाद विषयावर चर्चासत्र आयोजित केले. अध्यक्षस्थानी संस्थासचिव विकास राऊत होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.रेखा वानखेडे (बलखंडे महा.पवनी) तसेच प्रा.आशा काटेखाये (अशोक मोहरकर महा.अड्याळ) उपस्थित होते. यावेळी प्रभारी प्राचार्य प्रदीप मेश्राम, प्रा.जगजीवन खांदाडे उपस्थित होते. प्रा.आशा काटेखाये यांनी स्त्रीवाद हा मोठा विचारमंथनाचा विषय आहे. वाद म्हणजे विचार यावर आधारित प्रत्येकांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी महत्वाची जबाबदारी घेतली पाहिजे. समाजात चालत असलेल्या प्रथा परंपरांना देवून आज स्त्रियांनी मुख्य प्रवाहात आपले स्थान बळकट केले पाहिजे. या विषयावर सखोल उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले आहे.प्रा.प्रदीप मेश्राम यांनी देखील विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास राऊत यांनी स्त्रिवाद काय आहे हे माता जिजामाताचे उदाहरण जिजामातेने शिवाजी राजे घडविले. स्त्री वादाचे उदाहरण आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.नीलेश बुरडे यांनी तर आभार मयूरी उके हिने मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.कोरे, प्रा.सुखदेवे, प्रा.सेलोकर, प्रा.नंदपुरे, प्रा.मुंडले, प्रा.कुर्झेकर, प्रा.गजभिये, भूपेश रायपुरकर, संदीप रायपूरकर यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
रेखा वानखेडे : भारत सेवक सिद्धार्थ महाविद्यालयात चर्चासत्र
By admin | Updated: February 15, 2016 00:24 IST