शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

पावसाने हलके धान भुईसपाट

By admin | Updated: October 10, 2016 00:27 IST

मागील काही दिवसांपासून दररोज दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने कापणीयोग्य हलके धान भुईसपाट झाले आहेत.

भारी धानालाही फटका : कडपांमध्ये शिरले पाणीविरली (बु.) : मागील काही दिवसांपासून दररोज दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने कापणीयोग्य हलके धान भुईसपाट झाले आहेत. सततच्या पावसामुळे भारी धानही शेतात लोटल्यामुळे या धानालाही फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी लाखांदूर तालुक्यात ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे.यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली, शेतकऱ्यांचे रोवणे आटोपले. त्यानंतर पावसाने दिर्घकाळ दडी मारुन डोळे वटारले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले धानपिक वाचविण्यासाठी जीवाचा आटापीटा करुन जमेल त्या पध्दतीने आपल्या धानशेतीला पाणीपुरवठा केला. आता गरज नसतांना बरसणाऱ्या पावसाने डोळ्यात पाणी आणले आहे.या परिसरात मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची लागवड असून सद्यास्थितीत हे धान परिपक्व झाले आहेत. मात्र गेल्या १५ ते २० दिवसांपासून दररोज हजेरी लावणाऱ्या पावसाने परिपक्व झालेले धान शेतात भुईसपाट झाले असून शेतात साचलेल्या पाण्यामुळे हे धान अंकुरण्याच्या मार्गावर आहेत. काही शेतकऱ्यांनी कडपा पाण्यावर कापणी केली त्याच्या तरंगु लागल्या असून हे धान मातीमोल होत आहेत. दररोजच्या पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले असून शेतशिवारात चोहिकडे पाणीच पाणी असल्यामुळे हलक्या धान शेतीतील पाणी काढणे दुरापास्त झाले आहेत. परिणामी आता धान वाचविण्यासाठी शेतातील पाणी कसे काढावे या विंवचनेत शेतकरी सापडला आहे.सततच्या पावसामुळे सध्या गर्भावस्थेत असलेले भारी धानही शेतात झोपले असून या धानालाही फटका बसण्याची शक्यता आहे. सद्यास्थितीत दररोज हजेरी लावणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे तोंडचा घास हिरावून घेतला असून लाखांदूर तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)