शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

कालबाह्य पुलावरून जीवघेणा प्रवास

By admin | Updated: August 4, 2016 00:25 IST

राज्यात अनेक ठिकाणी ब्रिटीशकालीन पुलांनी शतकोत्तरी गाठली असून या पुलांची आयुमर्यादा संपली आहे.

महाडच्या पुनरावृत्तीची भीती : ब्रिटिशकालीन पुलाचे भयावह वास्तव, पुलावरून होते रेती तस्करीची वाहतूकप्रशांत देसाई भंडाराभंडारा : राज्यात अनेक ठिकाणी ब्रिटीशकालीन पुलांनी शतकोत्तरी गाठली असून या पुलांची आयुमर्यादा संपली आहे. असे असतानाही या पुलावरून आजही मोठ्या प्रमाणात जडवाहतूक सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील महाड येथे मंगळवारी मध्यरात्री ब्रिटीशकालीन पुल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला. दरम्यान या पुलावरून मार्गाक्रमण करणारे वाहन व त्यातील २२ प्रवाशांना जलसमाधी मिळाली. या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील कारधा पुल आणि तुमसर तालुक्यातील माडगी येथील पुलाची पाहणी केली असता, या पुलावरूनही वाहनचालकांचा दररोजचा ‘जीवघेणा’ प्रवास सुरू असल्याचे वास्तव दिसून आले आहे.ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रजांनी भारतात पायमुळ रोवली. त्यानंतर त्यांना येथे राज्य करताना, दळणवळाच्या सोयीअभावी त्रास होत असल्याने ब्रिटिशांनी रस्ते व नदींवर पुलांची निर्मिती केली. कालांतराने ब्रिटीशांनी भारत सोडले तरी, त्यांनी निर्माण केलेले पुल आजही त्यांच्या आठवणीत उभे आहेत. या पुलांच्या निर्मितीला आता शंभर वर्षांचा कालखंड झालेला आहे. तर काही पुल नव्वदीत आहेत. भंडारा जिल्ह्यातही ब्रिटिशकालीन पुल आता शेवटची घटका मोजत असल्या तरी या पुलांवरूनच वाहतूक सुरू असल्याची गंभीर बाब आहे.भंडारा व कारधा या गावांच्या मधोमध वैनगंगा नदी आहे. या दोन्ही गावांना जोडण्यासाठी ब्रिटीशांनी पुलाची निर्मिती केली आहे. हा पुल सन १९०० ला दळणवळणासाठी सुरू करण्यात आला होता. सध्या हा पुल ११६ वर्षांचा झाला आहे. पुलाची कालमर्यादा झाली असल्याने वाहतुकीसाठी योग्य नसल्याने यावरील वाहतूक बंद करावी, असे पत्र ब्रिटीश सरकारने भारत सरकारला दिले. त्यानंतर या पत्राची अनेक ठिकाणी अंमलबजावणी करण्यात आली. तर कुठे त्यांची दखल न घेतल्याने आजही वाहतूक सुरू आहे. या मार्गावरून वर्दळ करणे धोकादायक असल्याने हा प्रवास जीवघेणा प्रवास ठरू शकतो.कमकुवत पुलावरून होतेय वाहतूकहा पुल वाहतुकीसाठी सन १९०० ला पुल बांधकाम करण्यात आले. या पुलाला आता ११६ वर्षे पुर्ण झाली आहे. त्यामुळे पुलाचा आयुर्मान संपलेला आहे. अशा स्थितीतही या पुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे. या पुलावरील वाहतुकीला अडचण नसली तरी तो धोकादायक आहे. ब्रिटीश सरकारने पुलांचा आयुर्मान संपल्याचा पत्रव्यवहार केलेला आहे. या पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात आली असली तरी, दुचाकी व छोट्या वाहनांची वाहतूक सुरू आहे.नागपूर नाका ते कारधा येथील ढाबा असा १३ किमीचा रस्ता व कारधा वैनगंगा नदीवरील पुलाची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी अभिजीत अशोका इन्फ्रास्ट्रक्चर (टोलनाका) यांच्याकडे आहे. या पुलाची मागील वर्षी पाहणी करण्यात आली. पुलावर पथदिवे नसल्याने अंधार राहते. त्यामुळे सुरक्षिततेसाठी रिप्लेक्टर पट्टी व काही उपाययोजना केलेल्या आहेत. पुल कमकुवत झालेला असल्याने जड वाहतूक बंद करण्यात आली आहे.- नरेश लभाने, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग, भंडारा.