शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

१७ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:01 IST

शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून चार जुलै ते सात जुलै दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यात कृषी विभागाने भरारी पथकांद्वारे कारवाईची मोहीम राबवली. विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, मिलींद लाड यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवण्यात आली. शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा पुरवठा करुन योग्य दरात विक्री करण्याचे आदेश कृषी निविष्ठा विक्रेत्यांना देण्यात आले होते.

ठळक मुद्देविक्री बंदचे दिले आदेश : तक्रारीवरून कृषी विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामात बळीराजाला जादा दराने खतांची विक्री करणाऱ्या तसेच तपासणी दरम्यान आढळलेल्या विविध त्रुटींच्या आधारे जिल्ह्यातील १७ कृषी केंद्रावर कृषी विभागाने निलंबनाची कारवाई केली. या कारवाईत रासायनिक खताचे १० परवाने , बियाण्याचे चार परवाने, कीटकनाशकांचे तीन परवाने निलंबित करण्यात आले आहेत.शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून चार जुलै ते सात जुलै दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यात कृषी विभागाने भरारी पथकांद्वारे कारवाईची मोहीम राबवली. विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, मिलींद लाड यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवण्यात आली. शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा पुरवठा करुन योग्य दरात विक्री करण्याचे आदेश कृषी निविष्ठा विक्रेत्यांना देण्यात आले होते. मात्र तरीदेखील अनेक विक्रेत्यांनी आपल्या दुकानांसमोर दर्शनी भागात कृषी निविष्ठांचा दर फलक लावलेला दिसून आला नाही , नोंदणी प्रमाणपत्र ठळकपणे दिसेल असे न लावले नाही, तसेच पीओएस मशीनद्वारे खताची विक्री न करणे, रासायनिक खताची विक्री करताना शेतकऱ्यांना एमफॉर्मध्ये बिले न देता, विक्री केलेल्या रासायनिक खतांची बिले न ठेवणे, साठा रजिस्टर व गोडाऊनमधील प्रत्यक्षात उपलब्ध असलेला साठा व पोस्ट मशीन मधील साठा जुळून आला नाही. बिल बुकावर कंपनीचे नाव व लॉट नंबर लिहिले जात नसल्याच्या कारणांवरुन ही कारवाई करण्यात आली.कारवाईत पवनी तालुक्यातील आठ कृषी केंद्रांवर, लाखनी तालुक्यातील दोन कृषी केंद्रावर, साकोली तालुक्यातील दोन, भंडारात एक, तर लाखांदूरात एक कारवाई करण्यात आली. कारवाईत रासायनिक खतांच्या बियाण्याचे कीटकनाशकाचे १७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर रासायनिक खते नियंत्रण आदेशांतर्गत कारवाई केली.कारवाईदरम्यान जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी विश्वजीत पाडवी, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, मोहिम अधिकारी विकास चौधरी, गुणनियंत्रण अधिकारी प्रदीप म्हसकर, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, आदित्य घोगरे, पद्माकर गिदमारे, सागर ढवळे, बालाजी शन्नेवाड, संजय लांजेवार सहभागी झाले होते. कृषी विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाची कारवाई सुरूच असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग दक्ष असून शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदी करताना पक्की बिले घ्यावी. अधिक किमतीने खतांची कुणी विक्री करीत असल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांशी संपर्क साधावा.- हिंदुराव चव्हाण,जिल्हा कृषी अधीक्षक, भंडारा.

टॅग्स :agricultureशेती