शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

विद्यार्थ्यांना धाकाऐवजी आपुलकीने बोलते करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 21:36 IST

कोणत्याही अधिकारशाहीचा धाक न दाखवता विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद करून विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी यांचे मैत्रीशिवाय प्रभावी शिक्षणाची आंतरक्रिया होत नसून विद्यार्थ्यांना धाक दाखवून अबोल करण्यापेक्षा आपुलकीने बोलके करा, असे प्रतिपादन भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी केले.

ठळक मुद्देशंकर राठोड : खाजगी शाळांची दरवर्षी होणार वार्षिक तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोणत्याही अधिकारशाहीचा धाक न दाखवता विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद करून विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी यांचे मैत्रीशिवाय प्रभावी शिक्षणाची आंतरक्रिया होत नसून विद्यार्थ्यांना धाक दाखवून अबोल करण्यापेक्षा आपुलकीने बोलके करा, असे प्रतिपादन भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी केले.बालकांचा मोफत व शिक्षणाचा सक्तीचा अधिकार अधिनियमानुसार राज्यातील खाजगी शाळांची दरवर्षी वार्षिक तपासणी अंतर्गत पार्वताबाई वाठोडकर नवीन मुलींच्या शाळा तपासणी दरम्यान शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शिक्षण विभागातील अधिकारी यांच्याकडे शाळा तपासणीचे अधिकार आहेत.जिल्ह्यातील सर्व खाजगी शाळा तपासणीची मोहिम सुरू असून भंडारा शहरातील शाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांच्याकडे आहेत.शहरातील शाळा तपासणीसाठी त्यांनी गटसाधन केंद्रातील राम वाडीभस्मे, सरादे, मानवटकर यांची चमू तयार करून १ फेब्रुवारी पासून अत्यंत साधेपणाने शाळा तपासणीला सुरूवत केली. बालकांचा मोफत व शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार राज्यातील खाजगी अनुदानित विनाअनुदानित व अंशत: अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वार्षिक तपासणी केल्याशिवाय शिक्षकांचे वेतन होत नाही.त्यामुळे शाळांची वार्षिक तपासणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यामार्फत करणे गरजचे असून तालुका निहाय शाळा तपासणीकरिता अधिकारी वर्गाकडे दिल्या जातात. भंडारा शहरातील खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा तपासणीचे अधिकार पंचायत समिती भंडाराचे गटशिक्षणाधिकारी राठोड यांचेकडे असून त्यांनी गटसाधन केंद्रातील राम वाडीभस्मे, सरादे, मानवटकर यांची चमू तयार करून कोणताही अधिकारशाहीचा आव न आणता अत्यंत साधेपणाने शाळा तपासणीला सुरूवात केली.वर्ग निरीक्षणानंतर त्यांनी शिक्षकांची सभा घेवून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठीच्या उपाय योजनाबाबद शिक्षकांशी चर्चा केली. शिक्षकांच्या उणिवांवर लक्ष न देता सकारात्मक बाबीवर चर्चा करून शिक्षकांना पे्ररणादायक मार्गदर्शन केले.शिक्षक, विद्यार्थी व अधिकारी यांचे मैत्रीशिवाय शिक्षणाची प्रभावी आंतरक्रिया होत नसून आपण तिन्ही घटक एकमेकांचे मित्र झाल्याशिवाय शिक्षणाचा पारदर्शक वसा पुढे जाणार नाही. केवळ शालेय रेकॉर्ड न तपासता विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, बौद्धिक व सर्वांगिण विकास तपासणे महत्वाचे आहे. कारण शालेय रेकॉर्ड अद्यावत करणे सोपे असून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता टिकवून अद्यावत ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांना अधिकाºयांची भिती न वाटता आदर करावा हीच आपल्या प्रामाणिक कामाची पावती होय, असे ही ते म्हणाले.