शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना धाकाऐवजी आपुलकीने बोलते करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 21:36 IST

कोणत्याही अधिकारशाहीचा धाक न दाखवता विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद करून विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी यांचे मैत्रीशिवाय प्रभावी शिक्षणाची आंतरक्रिया होत नसून विद्यार्थ्यांना धाक दाखवून अबोल करण्यापेक्षा आपुलकीने बोलके करा, असे प्रतिपादन भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी केले.

ठळक मुद्देशंकर राठोड : खाजगी शाळांची दरवर्षी होणार वार्षिक तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोणत्याही अधिकारशाहीचा धाक न दाखवता विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद करून विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी यांचे मैत्रीशिवाय प्रभावी शिक्षणाची आंतरक्रिया होत नसून विद्यार्थ्यांना धाक दाखवून अबोल करण्यापेक्षा आपुलकीने बोलके करा, असे प्रतिपादन भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी केले.बालकांचा मोफत व शिक्षणाचा सक्तीचा अधिकार अधिनियमानुसार राज्यातील खाजगी शाळांची दरवर्षी वार्षिक तपासणी अंतर्गत पार्वताबाई वाठोडकर नवीन मुलींच्या शाळा तपासणी दरम्यान शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शिक्षण विभागातील अधिकारी यांच्याकडे शाळा तपासणीचे अधिकार आहेत.जिल्ह्यातील सर्व खाजगी शाळा तपासणीची मोहिम सुरू असून भंडारा शहरातील शाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांच्याकडे आहेत.शहरातील शाळा तपासणीसाठी त्यांनी गटसाधन केंद्रातील राम वाडीभस्मे, सरादे, मानवटकर यांची चमू तयार करून १ फेब्रुवारी पासून अत्यंत साधेपणाने शाळा तपासणीला सुरूवत केली. बालकांचा मोफत व शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार राज्यातील खाजगी अनुदानित विनाअनुदानित व अंशत: अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वार्षिक तपासणी केल्याशिवाय शिक्षकांचे वेतन होत नाही.त्यामुळे शाळांची वार्षिक तपासणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यामार्फत करणे गरजचे असून तालुका निहाय शाळा तपासणीकरिता अधिकारी वर्गाकडे दिल्या जातात. भंडारा शहरातील खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा तपासणीचे अधिकार पंचायत समिती भंडाराचे गटशिक्षणाधिकारी राठोड यांचेकडे असून त्यांनी गटसाधन केंद्रातील राम वाडीभस्मे, सरादे, मानवटकर यांची चमू तयार करून कोणताही अधिकारशाहीचा आव न आणता अत्यंत साधेपणाने शाळा तपासणीला सुरूवात केली.वर्ग निरीक्षणानंतर त्यांनी शिक्षकांची सभा घेवून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठीच्या उपाय योजनाबाबद शिक्षकांशी चर्चा केली. शिक्षकांच्या उणिवांवर लक्ष न देता सकारात्मक बाबीवर चर्चा करून शिक्षकांना पे्ररणादायक मार्गदर्शन केले.शिक्षक, विद्यार्थी व अधिकारी यांचे मैत्रीशिवाय शिक्षणाची प्रभावी आंतरक्रिया होत नसून आपण तिन्ही घटक एकमेकांचे मित्र झाल्याशिवाय शिक्षणाचा पारदर्शक वसा पुढे जाणार नाही. केवळ शालेय रेकॉर्ड न तपासता विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, बौद्धिक व सर्वांगिण विकास तपासणे महत्वाचे आहे. कारण शालेय रेकॉर्ड अद्यावत करणे सोपे असून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता टिकवून अद्यावत ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांना अधिकाºयांची भिती न वाटता आदर करावा हीच आपल्या प्रामाणिक कामाची पावती होय, असे ही ते म्हणाले.