शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

विद्यार्थ्यांना धाकाऐवजी आपुलकीने बोलते करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 21:36 IST

कोणत्याही अधिकारशाहीचा धाक न दाखवता विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद करून विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी यांचे मैत्रीशिवाय प्रभावी शिक्षणाची आंतरक्रिया होत नसून विद्यार्थ्यांना धाक दाखवून अबोल करण्यापेक्षा आपुलकीने बोलके करा, असे प्रतिपादन भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी केले.

ठळक मुद्देशंकर राठोड : खाजगी शाळांची दरवर्षी होणार वार्षिक तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोणत्याही अधिकारशाहीचा धाक न दाखवता विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद करून विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी यांचे मैत्रीशिवाय प्रभावी शिक्षणाची आंतरक्रिया होत नसून विद्यार्थ्यांना धाक दाखवून अबोल करण्यापेक्षा आपुलकीने बोलके करा, असे प्रतिपादन भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी केले.बालकांचा मोफत व शिक्षणाचा सक्तीचा अधिकार अधिनियमानुसार राज्यातील खाजगी शाळांची दरवर्षी वार्षिक तपासणी अंतर्गत पार्वताबाई वाठोडकर नवीन मुलींच्या शाळा तपासणी दरम्यान शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शिक्षण विभागातील अधिकारी यांच्याकडे शाळा तपासणीचे अधिकार आहेत.जिल्ह्यातील सर्व खाजगी शाळा तपासणीची मोहिम सुरू असून भंडारा शहरातील शाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांच्याकडे आहेत.शहरातील शाळा तपासणीसाठी त्यांनी गटसाधन केंद्रातील राम वाडीभस्मे, सरादे, मानवटकर यांची चमू तयार करून १ फेब्रुवारी पासून अत्यंत साधेपणाने शाळा तपासणीला सुरूवत केली. बालकांचा मोफत व शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार राज्यातील खाजगी अनुदानित विनाअनुदानित व अंशत: अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वार्षिक तपासणी केल्याशिवाय शिक्षकांचे वेतन होत नाही.त्यामुळे शाळांची वार्षिक तपासणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यामार्फत करणे गरजचे असून तालुका निहाय शाळा तपासणीकरिता अधिकारी वर्गाकडे दिल्या जातात. भंडारा शहरातील खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा तपासणीचे अधिकार पंचायत समिती भंडाराचे गटशिक्षणाधिकारी राठोड यांचेकडे असून त्यांनी गटसाधन केंद्रातील राम वाडीभस्मे, सरादे, मानवटकर यांची चमू तयार करून कोणताही अधिकारशाहीचा आव न आणता अत्यंत साधेपणाने शाळा तपासणीला सुरूवात केली.वर्ग निरीक्षणानंतर त्यांनी शिक्षकांची सभा घेवून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठीच्या उपाय योजनाबाबद शिक्षकांशी चर्चा केली. शिक्षकांच्या उणिवांवर लक्ष न देता सकारात्मक बाबीवर चर्चा करून शिक्षकांना पे्ररणादायक मार्गदर्शन केले.शिक्षक, विद्यार्थी व अधिकारी यांचे मैत्रीशिवाय शिक्षणाची प्रभावी आंतरक्रिया होत नसून आपण तिन्ही घटक एकमेकांचे मित्र झाल्याशिवाय शिक्षणाचा पारदर्शक वसा पुढे जाणार नाही. केवळ शालेय रेकॉर्ड न तपासता विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, बौद्धिक व सर्वांगिण विकास तपासणे महत्वाचे आहे. कारण शालेय रेकॉर्ड अद्यावत करणे सोपे असून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता टिकवून अद्यावत ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांना अधिकाºयांची भिती न वाटता आदर करावा हीच आपल्या प्रामाणिक कामाची पावती होय, असे ही ते म्हणाले.