शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

डीएडकडे विद्यार्थ्यांची पाठ

By admin | Updated: July 18, 2015 00:40 IST

एकेकाळी डीएडला मोठी मागणी होती. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करावी लागायची. मोठा लग्गा लावावा लागत होता.

भंडारा : एकेकाळी डीएडला मोठी मागणी होती. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करावी लागायची. मोठा लग्गा लावावा लागत होता. अन् भरमसाट डोनेशन देऊन देखील डीएडला प्रवेश मिळत नव्हता. आता चित्र बदललेले आहे. या क्षेत्रात मंदीचे वारे वाहत असल्याने आता संस्थाचालकांना ‘कुणी प्रवेश घेता का प्रवेश’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. डीएडची जिल्ह्याची प्रवेशक्षमता मोठी असली तरी देखील विद्यार्थ्यांकडून अल्पसा प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी थाटलेली काही खाजगी महाविद्यालये आज बंद करून, तिथे व्यवसाय सुरू करण्यात आल्याचे विदारक चित्र आहे.यापूर्वी या अभ्यासक्रमासाठी हजारो अर्ज येत होते. त्यामुळे जिल्ह्यातील महाविद्यालयांचा हा आकडा मोठा होता; परंतु विद्यार्थी मिळत नसल्याने अनेकांनी थाटलेली दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे आजघडीला मोजके महाविद्यालये शिल्लक आहेत. काही संस्थाचालकांनी त्या इमारतीत अन्य व्यवसाय सुरू केले आहेत. विद्यार्थी शोधण्यासाठी त्यांनी शिक्षकांना सांगून वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत. तरीही विद्यार्थी येण्यासाठी तयार नसल्याचे एका शिक्षकाने सांगितले. पूर्वी अन्य अभ्यासक्रमापेक्षा डीएडला मोठी मागणी होती. कमी खर्चात व कमी वयात नोकरी मिळत होती. त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागात तर बारावी उत्तीर्ण झाले की, प्रत्येक जण डीएडचाच विचार करीत होता. पैसे नसले तर शेती विकूनही प्रवेश घेतला जात होता. सरकारी नोकरी असल्याने, लग्नात हुंडाही मिळत असे. त्यामुळे गेलेला पैसा वसूल होत होता. त्यामुळे सर्वांचाच ओढा याकडे वाढत गेला. विद्यार्थ्यांचा मोठा ओढा व त्यातून भरमसाट शुल्क मिळत असल्याने, संस्थाचालकांनी ठिकठिकाणी ही महाविद्यालये सुरू केली. त्यामुळे दरवर्षी हा अभ्यासक्रम करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली. भरती नसल्यामुळे मागील पाच ते सहा वर्षांपासून हा अभ्यासक्रम केलेले हजारो तरुण बेरोजगारीचे जीवन जगत आहेत. काही जणांनी संस्थेत पैसे भरले आहेत; परंतु अनुदान नसल्याने पगार मिळत नाही. त्यामुळे आजघडीला पोट भरण्याचाही त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे. त्यामुळे यातील काही जण दिवसा शाळेत नोकरी करून, रात्रीला अन्य ठिकाणी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. काहींचे नोकरी नसल्याने लग्न जुळण्यासाठी अडचणी येत आहेत. या बेरोजगारांनी आपल्या भावना शासनाला वेळोवेळी कळविल्या. मात्र, त्याची कोणतीही दखल घेतली जात नाही. या अभ्यासक्रमासाठी दोन वर्षे वाया गेली. त्यामुळे अनेकांना आपले पदवी शिक्षणही पूर्ण करता आले नाही. पदवी पूर्ण करून तरी अन्य परीक्षा देता येतात. अशा दुहेरी कचाट्यात हे बेरोजगार सापडलेले आहेत. (नगर प्रतिनिधी)पूर्वी अन्य अभ्यासक्रमापेक्षा डीएडला मोठी मागणी होती. डीएड केले की हमखास नोकरीची हमी होती. त्यामुळे प्रवेश मिळविण्यासाठी पूर्वी मोठी स्पर्धा असायची; परंतु शासनाने अलिकडे ही भरतीच थांबविली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमाला अल्पसा प्रतिसाद मिळत आहे. - अभय परिहार, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडारा.डीएडकडे विद्यार्थी यायला तयार नाहीत. शासनाच्या विविध शाळांत आजही अनेक जागा रिक्त आहेत; परंतु आपल्यावर आर्थिक बोजा येऊ नये. त्याकरिता जागा भरण्यात येत नाही. इंजिनिअरिंगसह अन्य अभ्यासक्रमांना ३५ टक्क्यांवरही प्रवेश दिला जातो. मात्र, डीएडसाठी आजही ५० टक्क्यांची अट आहे. त्यामुळे हेही विद्यार्थी न मिळण्याचे एक कारण आहे. - प्रा नरेश आंबिलकर, भंडारा.