शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कावळ्यांच्या घरट्यांनी दिले कमी पावसाचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 22:16 IST

पशु-पक्षी निसर्गात होणारे बदल लवकर टिपतात. त्यानुसारच वर्तनही करतात. पूर्वी हवामानाचा अंदाज सांगणारे यंत्रणा नव्हती. त्यावेळी पशु-पक्षांच्या विशिष्ट हालचालीवरुन पावसाचा अंदाज बांधला जाता होता. कावळ्याच्या घरट्यावरुन पाऊस यंदा कशा पडणार याचे संकेत मिळत होते.

ठळक मुद्देघरटे वृक्षांच्या शेंड्यावर : पक्षी निरीक्षकांचा अंदाज

संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : पशु-पक्षी निसर्गात होणारे बदल लवकर टिपतात. त्यानुसारच वर्तनही करतात. पूर्वी हवामानाचा अंदाज सांगणारे यंत्रणा नव्हती. त्यावेळी पशु-पक्षांच्या विशिष्ट हालचालीवरुन पावसाचा अंदाज बांधला जाता होता. कावळ्याच्या घरट्यावरुन पाऊस यंदा कशा पडणार याचे संकेत मिळत होते. आजही पक्षी निरीक्षक कावळ्याने घरटे वृक्षाच्या कोणत्या भागात बांधले यावरुन पावसाचा अंदाज लावतात. यंदा कावळ्याने वृक्षाच्या अगदी शेंडावर घरटी बांधल्याने कमी पावसाचे संकेत पक्षी निरीक्षकांनी दिल्या.पुरातन काळापासून ग्रामीण भागात कावळ्याला पावसाचे संकेत देणारा पक्षी समजला जातो. मात्र दिवसेंदिवस कावळ्यांची संख्या कमी झाल्याने त्यांची घरटी शोधावी लागतात. पूर्वी हवामान खाते नसल्याने देशी उपाय योजना व अंदाजावर अवलंबून राहावे लागत होते. काळानुसार विज्ञानाने प्रगती केली असली तरी पावसाच्या बाबतीत अनेकदा हवामान खात्याचा अंदाज चुकतो. मात्र पक्षांचा अंदाज खरा निघतो. वराहमिहिर, पाराशर, गर्ग या विज्ञाननिष्ठ पूर्वसुरींनी कावळ्याच्या घरटी बांधण्याच्या निरीक्षणावरुन पावसाचा अंदाज बांधला. बोर, बाभूळ, हिवर, सावर यासारख्या काटेरी झाडावर कावळ्यांची घरटी आढळल्यास अवर्षणाची भीती असते. आंबा, निंब, अर्जुन, करंज, चिंच यासारख्या झाडावर घरटी केल्यास चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. शिवाय कावळ्याची घरटी झाडाच्या शेंड्यावर आढळल्यास अवर्षणाची नांदी असल्याचे सांगण्यात आले आहे. पक्षीनिरीक्षक विनोद भोवते यांनी साकोली परिसरातील झाडावर बांधलेल्या कावळ्याच्या घरट्यांचे निरीक्षण केले. त्यांना यावर्षी कावळ्याची घरटी झाडाच्या शेंड्यावर बांधलेले आढळली. कावळा सहसा झाडाच्या शेंड्यावर घरटी बांधत नाही, हे विशेष. शेंड्यावरील कावळ्याची घरटी म्हणजे अत्यल्प पावसाचे संकेत समजले जाते.मानवाचे संपूर्ण जीवनमान निसर्गावर अवलंबून असते. मात्र माणूस निसर्गाची छेडछाड करीत आहे. स्वार्थासाठी दिवसेंदिवस जंगलतोड वाढत चालली आहे. याचा परिणाम निसर्ग चक्रावर होत आहे. यंदा कमी पाऊस असल्याचे संकेत साकोली तालुक्यात कावळ्यांनी वृक्षांच्या शेंडावर बाधंलेल्या घरट्यांवरुन बांधता येतो.- विनोद भोवतेपक्षी निरीक्षक साकोली

टॅग्स :Rainपाऊस