शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कावळ्यांच्या घरट्यांनी दिले कमी पावसाचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 22:16 IST

पशु-पक्षी निसर्गात होणारे बदल लवकर टिपतात. त्यानुसारच वर्तनही करतात. पूर्वी हवामानाचा अंदाज सांगणारे यंत्रणा नव्हती. त्यावेळी पशु-पक्षांच्या विशिष्ट हालचालीवरुन पावसाचा अंदाज बांधला जाता होता. कावळ्याच्या घरट्यावरुन पाऊस यंदा कशा पडणार याचे संकेत मिळत होते.

ठळक मुद्देघरटे वृक्षांच्या शेंड्यावर : पक्षी निरीक्षकांचा अंदाज

संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : पशु-पक्षी निसर्गात होणारे बदल लवकर टिपतात. त्यानुसारच वर्तनही करतात. पूर्वी हवामानाचा अंदाज सांगणारे यंत्रणा नव्हती. त्यावेळी पशु-पक्षांच्या विशिष्ट हालचालीवरुन पावसाचा अंदाज बांधला जाता होता. कावळ्याच्या घरट्यावरुन पाऊस यंदा कशा पडणार याचे संकेत मिळत होते. आजही पक्षी निरीक्षक कावळ्याने घरटे वृक्षाच्या कोणत्या भागात बांधले यावरुन पावसाचा अंदाज लावतात. यंदा कावळ्याने वृक्षाच्या अगदी शेंडावर घरटी बांधल्याने कमी पावसाचे संकेत पक्षी निरीक्षकांनी दिल्या.पुरातन काळापासून ग्रामीण भागात कावळ्याला पावसाचे संकेत देणारा पक्षी समजला जातो. मात्र दिवसेंदिवस कावळ्यांची संख्या कमी झाल्याने त्यांची घरटी शोधावी लागतात. पूर्वी हवामान खाते नसल्याने देशी उपाय योजना व अंदाजावर अवलंबून राहावे लागत होते. काळानुसार विज्ञानाने प्रगती केली असली तरी पावसाच्या बाबतीत अनेकदा हवामान खात्याचा अंदाज चुकतो. मात्र पक्षांचा अंदाज खरा निघतो. वराहमिहिर, पाराशर, गर्ग या विज्ञाननिष्ठ पूर्वसुरींनी कावळ्याच्या घरटी बांधण्याच्या निरीक्षणावरुन पावसाचा अंदाज बांधला. बोर, बाभूळ, हिवर, सावर यासारख्या काटेरी झाडावर कावळ्यांची घरटी आढळल्यास अवर्षणाची भीती असते. आंबा, निंब, अर्जुन, करंज, चिंच यासारख्या झाडावर घरटी केल्यास चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. शिवाय कावळ्याची घरटी झाडाच्या शेंड्यावर आढळल्यास अवर्षणाची नांदी असल्याचे सांगण्यात आले आहे. पक्षीनिरीक्षक विनोद भोवते यांनी साकोली परिसरातील झाडावर बांधलेल्या कावळ्याच्या घरट्यांचे निरीक्षण केले. त्यांना यावर्षी कावळ्याची घरटी झाडाच्या शेंड्यावर बांधलेले आढळली. कावळा सहसा झाडाच्या शेंड्यावर घरटी बांधत नाही, हे विशेष. शेंड्यावरील कावळ्याची घरटी म्हणजे अत्यल्प पावसाचे संकेत समजले जाते.मानवाचे संपूर्ण जीवनमान निसर्गावर अवलंबून असते. मात्र माणूस निसर्गाची छेडछाड करीत आहे. स्वार्थासाठी दिवसेंदिवस जंगलतोड वाढत चालली आहे. याचा परिणाम निसर्ग चक्रावर होत आहे. यंदा कमी पाऊस असल्याचे संकेत साकोली तालुक्यात कावळ्यांनी वृक्षांच्या शेंडावर बाधंलेल्या घरट्यांवरुन बांधता येतो.- विनोद भोवतेपक्षी निरीक्षक साकोली

टॅग्स :Rainपाऊस