शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘त्या’ बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:20 IST

तालुक्यातील बाम्पेवाडा येथील तलावात मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात पुढे आले. वन्यप्राण्यांपासून रक्षणासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहित तार कुंपनात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याचा संशय असून प्रकरण रफादफा करण्यासाठी मृतदेह तलावात फेकला असावा.

ठळक मुद्देबाम्पेवाडाची घटना : रफादफा करण्यासाठी मृतदेह फेकला तलावात

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यातील बाम्पेवाडा येथील तलावात मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याचामृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात पुढे आले. वन्यप्राण्यांपासून रक्षणासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहित तार कुंपनात अडकून बिबट्याचामृत्यू झाल्याचा संशय असून प्रकरण रफादफा करण्यासाठी मृतदेह तलावात फेकला असावा.साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा येथील खोंड्या तलावात बिबट्याचा मृतदेह बुधवारी आढळून आला. ३ ते ४ वर्षाचा बिबट मृतावस्थेत आढळल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदन केले असता, या बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे पुढे आले. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक शेतकºयांनी तार कुंपन केले आहे. त्या तार कुंपनात रात्रीच्यावेळी विज प्रवाह सोडला जातो. सदर बिबट शिकारीचा शोधात फिरत असतांना विद्युत भारीत ताराचा स्पर्श होऊन त्याचा मृत्यू झाला असावा. प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून संबंधिताने या बिबट्याचा मृतदेह खोंड्या तलावात फेकला असावा असा संशय आहे.शवविच्छेदन पशुवैद्यकिय अधिकारी हेडाऊ यांनी केले. तसेच गडेगाव डेपोत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी वाय. एस. तांडेकर, वनक्षेत्रअधिकारी व्ही. जी. कोई, सहायक वनरक्षक चोपकर, बीट रक्षक एम. यु. गिरीपुंजे, आर. बी. पडोळे, एन. एस. निखार, एन एन तपते उपस्थित होते.भंडारा वन विभागात मोठ्या प्रमाणात वन्य जीवांचा संचार आहे. मात्र त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या उपाययोजना अपुºया पडत आहेत. अलिकडे शेतकरी पीक वाचविण्यासाठी विविध उपाय करीत आहेत. वन्य प्राणी शेतात शिरू नये म्हणून कुंपणामध्ये विजेचा प्रवाह सोडतात. अशा प्रकारामुळे वन्य प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे.सहा दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा संशयखोंड्या तलावात आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू सहा दिवसांपूर्वीच झाला असावा असा संशय आहे. अद्यापपर्यंत शिकारापर्यंत पोहचण्यास वनविभागाला यश आले नाही. बाम्पेवाडा, उमरझरी परिसरात लागूनच न्यू नागझीरा व इतर जंगल आहे. उन्हाळ्यात उमरझरी येथे पाच सहा रानगव्यांचा मृत्यू झाला होता. आलेबेदर येथे एका रानगव्याची शिकार करण्यात आली होती. पंरतु अद्यापही शिकाराचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे या बिबट्याचे शिकारी कधी सापडतील हा प्रश्न आहे. वनविभागाचे फिरते पथक असतांना ही ते खरोखर सक्रिय आहे काय? याची शोध घेण्याची गरज आहे.

टॅग्स :leopardबिबट्याDeathमृत्यू