शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

शहरातील पथदिव्यांवर आता एलईडी बल्ब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 23:33 IST

शहरात पथदिवे लावताना आता केवळ एलईडी पथदिवेच लावावे असे आदेश नगर विकास विभागाने काढले आहे.

ठळक मुद्देशासन आदेश धडकला : कोणत्याही योजनेतून खर्च करण्यास मनाई

आॅनलाईन लोकमतभंडारा : शहरात पथदिवे लावताना आता केवळ एलईडी पथदिवेच लावावे असे आदेश नगर विकास विभागाने काढले आहे. ईईएसएलच्या माध्यमातून एस्को तत्वावर एलईडी पथदिवे बसविण्यासाठी करारनामा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे वैशिष्टपूर्ण योजना किंवा अन्य योजनेतून खर्च करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. परिणामी, येथील नगर परिषदेसाठी जिव्हाळ््याची असलेली ही योजना हातून गेली आहे. यावरुन मागील दीड वर्षांपासून ज्या योजनेसाठी नगर परिषदेत वाद सुरू होता तो देखील संपुष्टात आला आहे.शहरातील पथदिवे बदलून तेथे एलईडी पथदिवे लावण्याची योजना सुमारे दीड वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आली होती. वैशिष्टपूर्ण, दलितोत्तर व नगरोत्थान अशा तीन योजनांतून सुमारे तीन कोटींची ही योजना शहरात राबविली जाणार होती. यांतर्गत शहरात सुमारे साडेपाच हजार एलईडी पथदिवे लावण्यात येणार होते. यासाठी सन २०१६ मध्ये निविदा काढली जाणार होती. मात्र नगर परिषद पोटनिवडणुकीमुळे त्याला वेळ लागला. त्यानंतर निविदा काढली असता विधान परिषद व नगर परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचा खोडा आला. यातून सुटका झाल्यानंतर निविदा काढली असता जीएसटीचा फटका बसला व निविदा रद्द करावी लागल्याची माहिती आहे. परिणामी आता पुन्हा एलईडी पथदिव्यांच्या या योजनेसाठी निविदा काढली जाणार होती. मात्र ऐनवेळी नगर विकास विभागाने आदेश काढल्याने ही योजनाच नगर परिषदेच्या हातून गेली आहे.नगर विकास विभागाचे आदेशउर्जा संवर्धन करण्यासाठी ईईएसएल या केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमाशी करारनामा करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व नागरी स्वराज्य संस्थांना पथदिव्यांसाठी एलईडी दिवे बसविणे बंधनकारक आहे. त्यामुळे ज्या नागरी स्वराज्य संस्थांनी या कामासाठी १२ जानेवारी २०१८ पर्यंत कार्यादेश दिले नसतील त्यांना वैशिष्टपूर्ण योजना किंवा अन्य योजनेतून राज्य शासनाने मंजूर केलेला निधी खर्च करता येणार नाही असे आदेशात नमूद आहे. यामुळे आता एलईडी पथदिव्यांसाठी शासनाने नगर परिषदेला मंजूरी दिली असतानाही नगर परिषद कोणत्याच योजनेतून या योजनेसाठी खर्च येणार नाही.आदेशाने अनेकांचा मोहभंगसुमारे तीन कोटींची ही योजना कित्येकांच्या पर्सनल इंटरेस्टची झाली होती. यामुळेच या योजनेसाठी नगर परिषदेत साम, दाम, दंड व भेद या चारही तत्वांचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. मागील सुमारे दीड वर्षांपासून या योजनेसाठी नगर परिषदेची धडपड सुरू होती.मात्र शासनाच्या नव्या आदेशामुळे कित्येकांचा मोहभंग झाल्याचे नगर परिषद वर्तुळात बोलले जात आहे.