शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

पाणी सोडा अन्यथा होणार तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST

अडयाळ : अडयाळ आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे अधेमधे ...

अडयाळ : अडयाळ आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे अधेमधे येणाऱ्या पावसाने कमी-अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचे पर्हेही जगले. फार मोजक्या शेतकऱ्यांनी वेळ पाहून रोवणी केली, परंतु आजही जास्तीत जास्त प्रमाणात रोवणी पाण्याच्या अभावाने अद्याप झाली नाही. शेतकऱ्यांनी वेळेत जर रोवणी आटोपली नाही तरी शेतकरी बुडणार आणि पाऊस पडला नाही आणि नेरला उपसा सिंचनचे पाणीही जर आता सोडण्यात आले नाही तरी शेतकरीच फसणार. यामुळे आता नेरला उपसा सिंचन योजना सुरू होणे गरजेचे झाले आहे. यासाठी आता शेतकरी भाजप युवा मोर्चा पवणी तालुकातर्फे तीव्र आंदोलन करण्याच्या स्थितीत आहेत.

नेरला उपसा सिंचन सुरू झाल्यानंतर शेतकरी कदाचित पाणीपट्टी कर भरेल की नाही? यामुळेच हे उपसा सिंचन आतापर्यंत सुरू झाले नाही का, असे प्रश्न असले तरी आतापर्यंत एकूण रकमेच्या २५ टक्के पाणीपट्टी कर वसूल झालेला नाही हेही तितकेच सत्य आहे. आज शेतीसाठी पाण्याची गरज कुणाला नाही? तसेच त्यातही अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पाणीपट्टी करवसुलीला केव्हापासून सुरुवात करण्यात आली तेही महत्त्वाचे आहे. सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास उपविभागीय अभियंता पागोरा उपसा सिंचन उपविभाग क्रमांक १ कार्यालय आंबाडी येथे एक बैठक पार पडली. त्यात कोणते निर्णय घेण्यात आले हे अद्याप स्पष्टपणे कळू शकले नाही.

आज शेतकऱ्यांना नितांत गरज आहे. यासाठी दररोज शेतकरी नेरला उपसा सिंचन येथे जाऊन विचारणा करतात की, ‘साहेब कधी होणार नेरला उपसा सिंचन सुरू?’ हीच वसुली याआधीच एवढीच यंत्रणा कामावर लावून जर केली असती तर आज असे दिवस शेतकऱ्यांना पाहायला मिळाले असते का? यंदा गावात मुनादी देण्यात आली, तसेच शेतकऱ्यांच्या घरापर्यंत यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी तथा निर्माण झालेल्या पाणी वापर संस्थेतील पदाधिकारी पाणीपट्टी करवसुली करण्यासाठी जितकी धावपळ आता करताना दिसतात मग हीच कामे आधीच हळूहळू का होईना जर केली असती तर अशी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमीच असती, अशीही चर्चा सुरू आहे.