शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
3
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
4
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
5
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
6
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
7
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
8
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
9
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
10
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
11
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
12
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
13
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
14
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
15
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
16
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
17
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
18
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
19
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
20
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

पाणी सोडा अन्यथा होणार तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST

अडयाळ : अडयाळ आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे अधेमधे ...

अडयाळ : अडयाळ आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे अधेमधे येणाऱ्या पावसाने कमी-अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचे पर्हेही जगले. फार मोजक्या शेतकऱ्यांनी वेळ पाहून रोवणी केली, परंतु आजही जास्तीत जास्त प्रमाणात रोवणी पाण्याच्या अभावाने अद्याप झाली नाही. शेतकऱ्यांनी वेळेत जर रोवणी आटोपली नाही तरी शेतकरी बुडणार आणि पाऊस पडला नाही आणि नेरला उपसा सिंचनचे पाणीही जर आता सोडण्यात आले नाही तरी शेतकरीच फसणार. यामुळे आता नेरला उपसा सिंचन योजना सुरू होणे गरजेचे झाले आहे. यासाठी आता शेतकरी भाजप युवा मोर्चा पवणी तालुकातर्फे तीव्र आंदोलन करण्याच्या स्थितीत आहेत.

नेरला उपसा सिंचन सुरू झाल्यानंतर शेतकरी कदाचित पाणीपट्टी कर भरेल की नाही? यामुळेच हे उपसा सिंचन आतापर्यंत सुरू झाले नाही का, असे प्रश्न असले तरी आतापर्यंत एकूण रकमेच्या २५ टक्के पाणीपट्टी कर वसूल झालेला नाही हेही तितकेच सत्य आहे. आज शेतीसाठी पाण्याची गरज कुणाला नाही? तसेच त्यातही अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पाणीपट्टी करवसुलीला केव्हापासून सुरुवात करण्यात आली तेही महत्त्वाचे आहे. सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास उपविभागीय अभियंता पागोरा उपसा सिंचन उपविभाग क्रमांक १ कार्यालय आंबाडी येथे एक बैठक पार पडली. त्यात कोणते निर्णय घेण्यात आले हे अद्याप स्पष्टपणे कळू शकले नाही.

आज शेतकऱ्यांना नितांत गरज आहे. यासाठी दररोज शेतकरी नेरला उपसा सिंचन येथे जाऊन विचारणा करतात की, ‘साहेब कधी होणार नेरला उपसा सिंचन सुरू?’ हीच वसुली याआधीच एवढीच यंत्रणा कामावर लावून जर केली असती तर आज असे दिवस शेतकऱ्यांना पाहायला मिळाले असते का? यंदा गावात मुनादी देण्यात आली, तसेच शेतकऱ्यांच्या घरापर्यंत यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी तथा निर्माण झालेल्या पाणी वापर संस्थेतील पदाधिकारी पाणीपट्टी करवसुली करण्यासाठी जितकी धावपळ आता करताना दिसतात मग हीच कामे आधीच हळूहळू का होईना जर केली असती तर अशी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमीच असती, अशीही चर्चा सुरू आहे.