शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

पाणी सोडा अन्यथा होणार तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST

अडयाळ : अडयाळ आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे अधेमधे ...

अडयाळ : अडयाळ आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे अधेमधे येणाऱ्या पावसाने कमी-अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचे पर्हेही जगले. फार मोजक्या शेतकऱ्यांनी वेळ पाहून रोवणी केली, परंतु आजही जास्तीत जास्त प्रमाणात रोवणी पाण्याच्या अभावाने अद्याप झाली नाही. शेतकऱ्यांनी वेळेत जर रोवणी आटोपली नाही तरी शेतकरी बुडणार आणि पाऊस पडला नाही आणि नेरला उपसा सिंचनचे पाणीही जर आता सोडण्यात आले नाही तरी शेतकरीच फसणार. यामुळे आता नेरला उपसा सिंचन योजना सुरू होणे गरजेचे झाले आहे. यासाठी आता शेतकरी भाजप युवा मोर्चा पवणी तालुकातर्फे तीव्र आंदोलन करण्याच्या स्थितीत आहेत.

नेरला उपसा सिंचन सुरू झाल्यानंतर शेतकरी कदाचित पाणीपट्टी कर भरेल की नाही? यामुळेच हे उपसा सिंचन आतापर्यंत सुरू झाले नाही का, असे प्रश्न असले तरी आतापर्यंत एकूण रकमेच्या २५ टक्के पाणीपट्टी कर वसूल झालेला नाही हेही तितकेच सत्य आहे. आज शेतीसाठी पाण्याची गरज कुणाला नाही? तसेच त्यातही अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पाणीपट्टी करवसुलीला केव्हापासून सुरुवात करण्यात आली तेही महत्त्वाचे आहे. सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास उपविभागीय अभियंता पागोरा उपसा सिंचन उपविभाग क्रमांक १ कार्यालय आंबाडी येथे एक बैठक पार पडली. त्यात कोणते निर्णय घेण्यात आले हे अद्याप स्पष्टपणे कळू शकले नाही.

आज शेतकऱ्यांना नितांत गरज आहे. यासाठी दररोज शेतकरी नेरला उपसा सिंचन येथे जाऊन विचारणा करतात की, ‘साहेब कधी होणार नेरला उपसा सिंचन सुरू?’ हीच वसुली याआधीच एवढीच यंत्रणा कामावर लावून जर केली असती तर आज असे दिवस शेतकऱ्यांना पाहायला मिळाले असते का? यंदा गावात मुनादी देण्यात आली, तसेच शेतकऱ्यांच्या घरापर्यंत यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी तथा निर्माण झालेल्या पाणी वापर संस्थेतील पदाधिकारी पाणीपट्टी करवसुली करण्यासाठी जितकी धावपळ आता करताना दिसतात मग हीच कामे आधीच हळूहळू का होईना जर केली असती तर अशी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमीच असती, अशीही चर्चा सुरू आहे.