शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

उमेदवार ठरविताना नेत्यांचीच परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 05:00 IST

भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. बुधवार, १ डिसेंबरपासून नामांकनाला प्रारंभ झाला; मात्र अद्यापही कोणत्याही पक्षाने उमेदवारीचे पत्ते उघड केले नाहीत. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्ष नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसात उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचे चित्र आहे. सर्वच राजकीय पक्षात प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा अधिक इच्छुक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून, उमेदवार ठरविताना नेत्यांचा कस लागत असल्याचे चित्र आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाने उमेदवारी  घोषित केली नसली तरी संभाव्य उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात भेटीगाठी घेणे सुरू केले आहे.भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. बुधवार, १ डिसेंबरपासून नामांकनाला प्रारंभ झाला; मात्र अद्यापही कोणत्याही पक्षाने उमेदवारीचे पत्ते उघड केले नाहीत. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्ष नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसात उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचे चित्र आहे. सर्वच राजकीय पक्षात प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा अधिक इच्छुक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. अनेकांनी उमेदवारीवर दावा केला आहे. त्यामुळे नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची, यावर जिल्ह्यातील राजकीय नेतृत्व चर्चा करीत आहे; परंतु सध्या सर्वच पक्षांनी चाचपणी करून संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे.जिल्ह्यात युती आघाडी होणार नसल्याचे जवळजवळ निश्चित झाल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांना ५२ उमेदवार शोधणे जिकरीचे काम आहे, तसेच पंचायत समितीसाठी १०४ सक्षम उमेदवार शोधण्याचे दिव्य आहे. त्यातही आरक्षित आणि महिला उमेदवारांचा शोध घेताना पक्ष नेतृत्वाचा कस लागत असल्याचे चित्र आहे.राष्ट्रवादीने उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, तालुकानिहाय बैठकी घेतल्या आहेत. या बैठकीतून उमेदवारांचे मनोगत ऐकून घेतले आहे. राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत असून, त्यांनी त्या दृष्टीने मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी कंबर कसली असून, प्रत्येक मतदार संघात सक्षम उमेदवार देण्यावर त्यांचा भर आहे. शिवसेना या निवडणुकीत ताकदीने उतरण्याच्या तयारीत आहे. तर भाजपने कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्याचा चंग बांधला आहे. अशा स्थितीत सक्षम उमेदवार देताना सर्वच पक्षांचा कस लागत आहे. गत जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस २०, राष्ट्रवादी १५, भाजप १२, शिवसेना १ आणि अपक्ष ४ असे संख्याबळ होते. या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढत आहेत. स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असला तरी निवडणुकीनंतर युती-आघाडी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेवर आपली सत्ता राखायची आहे, तर शिवसेना व भाजप त्याच ताकदीने सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

गणेशपूरवर बाहेरील उमेदवारांचा डोळा- भंडारा शहरालगतचा गणेशपूर हा मतदारसंघ सर्वसाधारण आहे. त्यामुळे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. सुशिक्षित मतदारसंघ म्हणून गणेशपूरची ओळख असून, येथे निवडणुकीत उभे राहण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. स्थानिक उमेदवारांसोबतच बाहेरील उमेदवारही या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे. अनेकांनी यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक रंगतदार लढत गणेशपूर जिल्हा परिषद मतदारसंघात होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यासोबतच अनेक अपक्षही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. बाहेरील उमेदवाराला मतदार कितपत स्वीकारतात, हे मात्र काळच ठरवेल.

पहिल्या दिवशी  एकही नामांकन नाही- बुधवार १ डिसेंबरपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या नामांकनाला प्रारंभ झाला. परंतु पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकही नामांकन दाखल झाले नाही. प्रशासनाने निवडणुकीची संपूर्ण तयारी केली आहे. नामांकन दाखल करण्यासाठी शेवटच्या तीन दिवसात गर्दी होण्याची शक्यता आहे. अद्याप उमेदवारही पक्षांनी घोषीत केले नाही. 

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद