शहरं
Join us  
Trending Stories
1
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
4
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
5
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
6
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
7
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
8
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
9
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
10
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
11
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
12
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
13
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
14
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
15
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
16
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
17
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
18
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
19
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
20
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

भंडारा येथे जनआरोग्य योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 22:31 IST

केंद्र सरकारने सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना घोषित केली असून या योजनेचा शुभारंभ रांची झारखंड येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला त्याचे थेट प्रक्षेपण जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे दाखविण्यात आले. तसेच या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते भगवान धन्वतरी यांच्या प्रतिमेलव माल्यार्पण करुन करण्यात आला.

ठळक मुद्देलाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप : जिल्ह्यातील एक लाख ३४ हजार कुटुंबांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारने सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना घोषित केली असून या योजनेचा शुभारंभ रांची झारखंड येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला त्याचे थेट प्रक्षेपण जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे दाखविण्यात आले. तसेच या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते भगवान धन्वतरी यांच्या प्रतिमेलव माल्यार्पण करुन करण्यात आला.यावेळी आमदार परिणय फुके, राजेश काशिवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, आरोग्य सभापती प्रेमदास वनवे, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी कमलेश भंडारी, जिल्हा शल्यचिकित्सक माधूरी थोरात, सामाजिक कार्यकर्ते सत्तार खान, मिरा भट आदी उपस्थित होते. आजचा दिवस गोरगरीब जनतेसाठी भाग्याचा दिवस आहे.भारतात तरुणांची लोकसंख्या ३५ ते ४० टक्के आहे म्हणून जगात सर्वात युवा देश म्हणून भारताची गणना आहे. या सर्व व्यक्तींना ५ लाखापर्यंत मदत आरोग्याच्या माध्यमातून होणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाने जोमाने कार्य करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. देशाचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी आयुष्मान भारत योजना आहे. योजनेची नोंदणी सामान्य रुग्णालयात करावी. रुग्णालयात ई-कार्ड देण्यात येईल, असे ते म्हणाले.प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधूरी थोरात यांनी सांगितले की, केंद्र शासनाने आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानांतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेस २१ मार्च २०१८ रोजी मान्यता दिली आहे. या योजनेतर्गत सामाजिक आर्थिक सर्वेक्षण २०११ मधील कुटूंबांना प्रती कुटूंब ५ लाख रुपयांपर्यंत देशभरातील मान्यता प्राप्त रुग्णालयामधून शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे.देशभरातील १०.७४ कोटी, महाराष्ट्र राज्यात ८३ लाख ८३ हजार ६६४ तर भंडारा जिल्हयात १ लाख ३४ हजार ४४८ कुटूंब आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी पात्र आहेत. लाभार्थी कुटूंबाला प्रतीवर्षी प्रतीकुटूंब ५ लक्ष रुपयांचे मोफत आरोग्य विमा कवच मिळणार आहे. योजनेच्या लाभासाठी कुटूंबातील सदस्य संख्या, वय व लिंग यावर कोणतेही बंधन असणार नाही. देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त शासकीय किंवा खाजगी रुग्णालयामधून लाभ घेता येईल. रुग्णालयामध्ये नि:शुल्क भरती प्रक्रिया असेल. योजनेचा लाभ घेण्याकरीता योजनेचे ई-कार्ड किंवा शासनमान्य ओळखपत्र असणे गरजेचे आहे. यावेळी सुशिला खंडारे, दिनेश बोरकर, गंगा गिरी, शाहिद अंसारी, ज्ञानेश्वर बोरकर, लिलाधर, गोन्नाडे, चंद्रकांत इडपाते, राम गोटेकर, गजानन गौतम यांना योजनेचे ई-कार्ड प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. संचालन डॉ. शांतीदास लुंगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. संजय गटकुल यांनी मानले. जिल्हयातील विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर व आरोग्य सेवक उपस्थित होते.