शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

तालुक्यात पीक उत्पादकता वाढ मोहिमेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:37 IST

गोंदिया : शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन पीक उत्पादनात वाढ व्हावी यादृष्टीने येत्या खरीत हंगामात पीक उत्पादकता वाढ मोहीम ...

गोंदिया : शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन पीक उत्पादनात वाढ व्हावी यादृष्टीने येत्या खरीत हंगामात पीक उत्पादकता वाढ मोहीम कृषी विभागामार्फत हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेंतर्गत बियाणे उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, ॲझोला उत्पादन, तसेच १० टक्के रासायनिक खतांच्या वापरात बचत करणे या बाबींवर मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि. २१) तालुक्यातील ग्राम अदासी, खमारी, दतोरा, जगनटोला, दवनीवाडा, कासा, चुटिया, रापेवाडा, पिंडकेपार, मुंडीपार खु., सिरपूर, आंभोरा, दासगाव खु., गिरोला, आदी गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत बियाणे उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, ॲझोला उत्पादन, तसेच १० टक्के रासायनिक खतांच्या वापरात बचत करणे याबाबतचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कृषी विभागातील क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी यांच्याद्वारे दिले जात आहे. पीक उत्पादनात वाढ व्हावी म्हणून बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिकाने शेतकऱ्यांना बियाण्यांचा दर्जा कळणार आहे व त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट येणार नाही, तसेच बियाण्यास बीजप्रक्रिया केल्यास पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता कमी होणार आहे. रासायनिक खतांचा वाढत असलेला बेसुमार वापर यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे व उत्पादन खर्चही वाढत चालला आहे. हा सर्व खर्च कमी व्हावा या उद्देशाने रासायनिक खतांची १० टक्के बचत कशी करता येईल, याचेसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर नत्रयुक्त रासायनिक खतांचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना ॲझोलाचे उत्पादन वाढविण्याकरिता या मोहिमेतून मार्गदर्शन करण्यात येत आहे. या मोहिमेत जमीन आरोग्य पत्रिकेच्या आधारे शिफारस केलेली खते वापरण्यास प्रोत्साहन दिले जात असून, त्यामुळे गरज नसलेल्या खतांचा वापर होणार नाही, तसेच शेतकऱ्यांना अनावश्यक खतांवर खर्च कमी करता येईल.

या कार्यक्रमात उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, तसेच कृषी विभागातील इतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मोठ्या संख्येत शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.