शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

ग्रामीण पाणीपुरवठा योजनेला शेवटची घरघर

By admin | Updated: May 16, 2017 00:23 IST

स्थानिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद भंडाराची नळयोजना दीड वर्षांपासून बंद असल्याने....

दीड वर्षांपासून पाणीपुरवठा बंद : ३५ वर्षांपूर्वीची नळयोजना जीर्णलोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : स्थानिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद भंडाराची नळयोजना दीड वर्षांपासून बंद असल्याने लाखनी वासियांना नगरपंचायत व मुरमाडी व सावरी येथील लोकांना ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा स्त्रोतावर अवलंबून राहावे लागत आहे.कुचकामी ठरलेल्या नळयोजनेकडे जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केल्याने लाखनी येथील १२५०० व मुरमाडीतील ७५०० लोकांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. पाणीपुरवठा ठप्प असल्याने व दीड वर्षांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने स्थानिक शाखा अभियंता कार्यालय व नळयोजनेचे परिसर भकास व बकाल झाला आहे. १९८३ पासुन लाखनी व मुरमाडी व सावरी येथील लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी नळयोजना सुरु करण्यात आली होती. २.२५ लाख लिटर क्षमतेच्या टाकीद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. ३४ वर्षांपासूनच्या या नळयोजनेला शेवटची घरघर लागली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेद्वारे लाखनी व मुरमाडी येथील १ हजार १०० ग्राहकांना नियमितपणे पाणी पुरवठा केला जात होता. स्थानिक टाकीत जांभळी बंधारा येथील पंपहाऊसवरुन पाणी आणले जात होते. गेल्या पाच वर्षांपर्वुी अशोक बिल्डकॉनने राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण केले होते. त्यामुळे पाणीपुरवठा योजना ठप्प पडली होती. त्यानंतर ग्राहकांची संख्या कमी होत गेली करांचा भरणा होत नव्हता. ५० लक्ष रुपये ग्राहकांवर थकित आहे. नळयोजना खराब झाली. रस्त्याचे सिमेंटीकरण आदी अनेक कारणामुळे ग्रामीण पाणीपुरवठा योजना बंद पडली. सध्या शाखा अभियंता व दोन कर्मचारी कार्यरत आहेत. लाखनी नगरपंचायतची स्थापना झाल्यानंतर स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची गरज निर्माण झाली. जुनी टाकी ही मुरमाडी व सावरी गावांना पाणी पुरवण्यास सक्षम असतांनीही पाणीपुरवठा ठप्प पडला आहे. १५ वर्षांपासुन जीवन प्राधीकरणची ५ लक्ष लिटर क्षमतेची टाकी तयार आहे व गावात नळयोजना घातली आहे पंरतु जीवन प्राधीकरणची योजना लाखनी नगरपंचायतच्या हदृदीत येत असल्याने नगरपंचायत सदर योजना स्विकारण्यास तयार नाही व जीवन प्राधीकरणाची योजना निकृष्ठ असुन टाकी सुरु होण्यापूर्वीच गलीतपात्र झाल्याचे दिसून येत आहे. नवीन टाकी पडण्याची भिती परिसरातील लोकांना वाटत असते. जीवन प्राधीकरणच्या योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च झाले. सदर योजना जिल्हा परिषद स्विकारावयास तयार नाही. नगरपंचायतने नकार दिला आहे. त्यामुळे ५ लक्ष लिटर क्षमतेची टाकी पांढरी हत्ती ठरलेली आहे.लाखनी व मुरमाडी येथील जनतेची तृष्णा भागवणारी योजना इतिहास जमा होणार काय अशी भिती जनतेला वाटत आहे. लाखनी व मुरमाडी येथे पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नगरपंचायत व ग्रामपंचायत पाणीपुरवठा करण्यास अपयशी ठरत आहे. पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी नळयोजना सुरु करण्याची आवश्यकता आहे.महाराष्ट्र जीवन प्राधीकरणची योजना नगरपंचायतने स्विकारली तर ५ लक्ष लिटर क्षमतेच्या टाकीचा उपयोग होईल. मुरमाडी येथील पाणीपुरवठा योजना ३५ वर्षांपूर्वीची आहे. त्यावर खर्च करणे जिल्हा परिषदेला परवाडणारे नाही. सदर ग्रामीण पाणीपुरवठा योजना मुरमाडी ग्रामपंचायतने स्विकारलेली नाही. त्यामुळे पाणी पुरवठा ठप्प आहे.- एस. डी. मारबते, शाखा अभियंता, ग्रा.पा.पुरवठा, भंडारा