शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

अर्ध्या तासात गेला तान्हुल्याचा जीव

By admin | Updated: February 5, 2016 00:28 IST

तीन महिन्यांपूर्वी प्रसूती होवून माहेरी आश्रयादाखल मातेने केवळ तीन महिन्याच्या तान्हुल्याला लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल केले.

मडेघाट येथील घटना : मृत्यूचे कारण अस्पष्ट, आरोग्य प्रशासनाचा हलगर्जीपणा, लसीकरण भोवलेलाखांदूर : तीन महिन्यांपूर्वी प्रसूती होवून माहेरी आश्रयादाखल मातेने केवळ तीन महिन्याच्या तान्हुल्याला लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल केले. मात्र लसीकरण होवून अर्धा तास लोटत नाही तोच या तान्हुल्याचा जीव गेला. विक्की मंगेश कसार (३ महिने) असे मृतक तान्हुल्याचे नाव आहे. ही घटना लाखांदूर तालुक्यातील मडेघाट येथे ३ फेब्रुवारीला रोजी दुपारी ४ वाजता दरम्यान घडली. या प्रकरणी आरोग्य कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचा आरोप पीडितांच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनी केला आहे. माहितीनुसार, मडेघाट येथील आरोग्य उपकेंद्रात त्रिगुणी लसीकरण कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी ३ महिन्याच्या तान्हुल्याला घेवून कसारे नामक महिला गेली होती. या उपकेंद्रात जवळपास २४ बालकांना लसीकरण व पोलीओ डोज दिल्याची माहिती आहे. दुसऱ्या टप्प्यातील ६ बालकांना सदरचा उपचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण व पोलीओ डोज घेणारा हा तान्हुला घरी पोहचून अर्धा तास लोटत नाही तोच अस्वस्थ झाला. धास्तावलेल्या मातेने घरच्या मंडळीसह तात्काळ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविले. मात्र रुग्णालयात संबंधित तान्हुल्याला दाखल करताच येथील डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. येथील ग्रामीण रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ नसल्याने या तान्हुल्याच्या शवविच्छेदनासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. भंडारा येथे देखील संबंधित तान्हुल्याचे शवविच्छेदन न करता तज्ज्ञांकडून या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल तपासणीसाठी नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आल्याची माहिती असून तब्बल एक दिवसानंतर शवविच्छेदन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. के.डी. रासेकर नामक आरोग्य सेविकेने लसीकरण करताना तसेच पोलीओ डोज दिल्यानंतर केवळ अर्ध्या तासातच या तान्हुल्याचा जीव गेल्याने त्रिगुणी लसीकरण योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बाळ कोणत्याही आजाराने बाधीत नसताना दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणानंतर या तान्हुल्याचा केवळ अर्ध्या तासातच जीव जाणे दु:खदायक ठरले आहे. डीपीटी, पोलीओ डोज, हिपॅटाईटीस बी व हब आदी पाच लसी अंतर्गत ‘पेंटाव्हायलंट’ नामक लस बालकाला देण्यात आल्याची माहिती आहे. बालक कुपोषित नसताना अथवा अन्य आजाराने बाधीत नसतानाही लसीकरणानंतर त्याचा जीव गेल्याने येथील आरोग्य सेविकेसह संबंध प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप केला जात आहे. मागील वर्षभरात लाखांदूर तालुक्यात २२ बालमृत्यू झाल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)