शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

तलाव मोजतोय शेवटची घटका

By admin | Updated: May 12, 2016 00:46 IST

गाव तलाव दोन एकर परिसरात विस्तीर्ण असल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे. मात्र गावात स्थायी होणाऱ्या अनेकांनी तलाव परिसरात

नागरिकांचे अतिक्रमण : जलस्रोतात घट, ग्रामपंचायत प्रशासनाची तकलादू भूमिकाभंडारा : गाव तलाव दोन एकर परिसरात विस्तीर्ण असल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे. मात्र गावात स्थायी होणाऱ्या अनेकांनी तलाव परिसरात अतिक्रमण करून वसाहत तर काहींनी शेतीच्या बांध्या बनविल्याने तलावाची स्थिती आता नाहिशी होण्याच्या मार्गावर आहे.तलाठी रेकॉर्डवर तलाव ८१ आर क्षेत्रफळात असल्याची नोंद आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून या तलावाची देखभाल दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे त्याचे खोलीकरण आता सपाट मैदानात परिवर्तित झाले आहे. सुमारे दोन एकराचा तलाव आता केवळ अर्ध्या एकरापेक्षाही कमी जागेत एखाद्या डबक्यासारख्या दिसून येत आहे. यामुळे गावातील जलस्रोत मोठी घट निर्माण झाली आहे. तलावाचे अस्तित्व टिकून रहावे यासाठी खोकरला ग्रामपंचायतीने सुमारे दीड वर्षापूर्वी मासिक सभेत तलावाचे मोजमाप करून अतिक्रमण हटविण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या तकलाघू भूमिकेमुळे त्यांनी भूमिअभिलेख कार्यालयात मोजणीचे पैसे भरलेले नाही. त्यामुळे भविष्यात हा तलाव पूर्णत: नामशेष होणार असून भविष्यातील पिडीला गावात तलाव होते हे केवळ आख्यायिकेसारखीच माहिती सांगतील, असे संकेत सध्या दिसून येत आहे. तलावाचे अस्तित्व अबाधीत ठेवल्यास गावातील पाणी समस्या नक्की सुटेल, असा विश्वास नागरिकांना आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहकार्याची गरज आहे.