शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

तीन दशकांपासून लेंडेझरी तलाव उपेक्षित

By admin | Updated: July 11, 2016 00:25 IST

भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा अशी ख्याती असली तरीही आजही कित्येक तलाव दुरूस्ती नियोजन, वितरिका व लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे विकासाच्या प्रतिक्षेत आहेत.

फटका वनकायद्यातील जाचक अटींचारामचंद्र करमकर आलेसूरभंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा अशी ख्याती असली तरीही आजही कित्येक तलाव दुरूस्ती नियोजन, वितरिका व लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे विकासाच्या प्रतिक्षेत आहेत.आंतर जिल्हा व महाराष्ट्रातील सेवटच्या टोकावरील ३५ कि़मी. अंतरावरील आदिवासी बहुल गाव लेंडेझरी येथील सार्वजनिक बांधकाम, लघु पाटबंधारे उपविभागा अंतर्गत लेंडेझरी तलावातील व नहराचे दुरूस्ती करणाचे काम ३३ वर्षापासून विकासाच्या प्रतिक्षेत आहे. परिणामी लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षित धोरणाअभावी तलाव भकास व्यवस्थेत पडला आहे. सदर तलावाचे बांधकाम जानेवारी १९७९ ला पुर्णत्वास झाले. परंतु ३३ वर्षाचा कालखंड लोटूनही या तलावाचे उपसाकरण व दुरूस्तीकरण न झाल्यामुळे जलस्त्रोताचा व्याप व प्रचंड पालापाचोळा व गाळ साचलेला आहे. १३ फेब्रुवारी १९८३ मध्ये एकदा या तलावातील खोली करणाचे कामे सुरू करण्यात आले. मात्र तलावातील २.४९ हे.आ. भुभाग आरक्षीत वन कक्षात मोडत असल्यामुळे या दुरूस्तीवर वन विभागाने प्रतिबंध घातला. परिणामी सिमांकित आदिवासी शेतकऱ्याची ९.३० हे.आर. शेतजमीन सिंचना अभावी प्रभावित झाली.कधी काळी पावसाने दडी मारली तर कोरडवाहू शेतकऱ्यांना हाच तलाव तारणहार ठरतो. स्थानिक नागरिकांनी ग्रामसभेत या तलावाच्या विकासा संदर्भात वारंवार ठराव पारित केला व संबंधित विभागाला सुद्धा निवेदन, अर्ज सादर केले परंतु यासंबंधी यश आले नाही. या संदर्भात आदिवासी नागरिक म्हणाले की वनकायद्याची बाब केंद्र शासनाशी संलग्नीत असून आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे जवाबी उत्तर अधिकारी वर्गाकडून मिळत आहेत. प्रतिवर्ष पावसाळ्यात या तलावात विविध वनकक्षातून पालापाचोळा, केरकचरा, गाळ येत असल्याने हा तलाव गिळंकृत होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. परिणामी भविष्यात वन्यपशु-पक्षी व गुरांना पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल, याची शक्यता नाकारता येत नाही.