शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

सिल्लीच्या पतसंस्थेत ‘लक्ष्मी’ घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2016 01:33 IST

सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या व्याजाच्या भूलथापा देण्यात आल्या. गावातीलच पतसंस्था असल्याने ग्रामस्थांनी संस्थापक

ग्राहकांची न्यायासाठी धडपड : तारण सोने लांबविले, संस्थापक, व्यवस्थापकांचा मनमानी कारभारभंडारा : सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या व्याजाच्या भूलथापा देण्यात आल्या. गावातीलच पतसंस्था असल्याने ग्रामस्थांनी संस्थापक व व्यवस्थापकांच्या भूलथापांना बळी पडलेल्यांना कोट्यवधींचा चूना लावण्यात आला. तारण म्हणून ठेवलेले सोने असो वा फिक्स ठेवलेली रक्कम यांचा कोट्यवधींचा घोटाळा करून नागरिकांना लुबाळण्यात आले. हा प्रकार घडला सिल्ली येथील लक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत.भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील कृष्णकांत देशमुख यांनी लक्ष्मीबाई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था काही वर्षापूर्वी उघडली. या संस्थेने व्याप वाढविण्यासाठी प्रतिनिधी नेमले. सुरूवातीला या पतसंस्थेने पादरर्शक काम केल्याने ती अल्पावधीतच नागरिकांच्या जिव्हाळ्याची पतसंस्था बनली. यामुळे सिल्ली व परिसरातील नागरिकांनी विश्वास ठेवून दैनिक बचत, फिक्स डिपॉझिट, सुवर्णतारण कर्ज यात नागरिकांनी रक्कम व दागिणे गुंतविले. कालावधीनंतर काही नागरिकांनी त्यांनी सुवर्णतारणचे कर्ज फेडून त्यांचे दागिणे परत मागितले. यावेळी पतसंस्थेने त्यांना दागिणे परत करण्यासाठी दोन-तीन दिवसांचा अवधी मागितला. मात्र सध्या महिन्याभराचा कालावधी लोटला असतानाही ग्राहकांचे दागिणे परत करण्यास उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत आहे. याबाबत नागरिकांनी संस्थापक देशमुख यांची भेट घेतली. मात्र त्यांनीही हातवर केले. दरम्यान ते मागील महिनाभरापासून पसार असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. ग्राहकांनी तक्रारीत आरोप केला की, देशमुख यांनी ग्राहकांच्या पैशाची अफरातफर करून स्व:ताच्या नातेवाईकाला लाभ मिळवून दिला आहे. अशा देशमुख यांच्यासह त्यांच्या पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांवर अफरातफरीचा गुन्हा दाखल करून ग्राहकांच्या घामाचे पैसे परत मिळवून द्यावे, अशा मागणीचे निवेदन सहाय्यक निबंधक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. शिष्टमंडळात ईश्वर माकडे, हरिदास गभणे, खेमचंद कळंबे, दिलीप गभणे, राजेश बागडे, प्रभावती हटवार, प्रभा लांजेवार, आदींसह ग्रामस्थांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)