शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

धानोरी येथे तलाव स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 21:55 IST

महात्मा गांधीच्या १५० व्या जयंतीनिमित्याने स्वच्छता ही मोहीम सुरु केली. या मोहिमेंंतर्गत भारत सरकारच्या जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाकडून स्वच्छता पखवाडा १६ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत या मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे विविध संस्थाकडून त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या जलस्त्रोत आणि त्यांना जवळच्या क्षेत्राची श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात यावी तसेच यासोेबत स्वच्छता कार्यक्रम आयोजित करण्यात यावे.

ठळक मुद्दे३१ मार्चपर्यंत उपक्रम : जलसंवर्धनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : महात्मा गांधीच्या १५० व्या जयंतीनिमित्याने स्वच्छता ही मोहीम सुरु केली. या मोहिमेंंतर्गत भारत सरकारच्या जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाकडून स्वच्छता पखवाडा १६ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत या मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे विविध संस्थाकडून त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या जलस्त्रोत आणि त्यांना जवळच्या क्षेत्राची श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात यावी तसेच यासोेबत स्वच्छता कार्यक्रम आयोजित करण्यात यावे. या माध्यमातून केंद्रीय जल आयोग, प्रबोधन मध्य संगठण नागपूर यांच्यामार्फत १९ मार्च रोजी मंगळवारला सकाळी८.३० वाजता तलाव स्वच्छता आणि ग्राम स्वच्छा व रॅली आयोजन ग्राम धानोरी येथे करण्यात आले.सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, धानोरी आणि महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय, धानोरी यातील विद्यार्थी, शिक्षक, सत्यसाई सेवा संगठण पवनी आणि समस्त धानोरी ग्रामवासीयांनी श्रमदान करुन सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाला संबोधीत करताना प्रबोधन मध्य संगठन, नागपुरचे अधीक्षक अभियंता मिलिंद पानपाटील यांनी जल स्त्रोताच्या स्वच्छतेपासुन होणाऱ्या फायद्याच्या विषयी विस्तृत मार्गदर्शन केले.याच कार्यक्रमात कार्यकारी अभियंता कैलाश लाखे यांनी जलसंवर्धनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. एस. के. शुक्ला, अनुसंधान अधिकारी यांनी जलगुणवत्तेबाबद विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ अभियंता पी. आर. ब्रम्हे यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी केंद्रीय जल आयोग, प्रबोधन मध्य संगठन नागपुरच्या अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धानोरी मुख्याध्यापिका पी. ए. पारधी, एल एच. लांजेवार आणि धानोरी येथील महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय मुख्याध्यापक अशोक पारधी, ग्राम धानोरी सरपंच नामदेवराव वाघधरे, सत्यसाई सेवा संगठन पवनी व समस्त विद्यार्थी, शिक्षक, ग्रामवासी यांनी उपक्रमासाठी प्रयत्न केले. आभार सहायक अभियंता बी. एम. बोरकर यांनी मानले.