शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

तलाव उपेक्षित; पाण्याची पातळी घटली

By admin | Updated: January 4, 2015 23:07 IST

भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तलावाच्या या जिल्ह्यात मुबलक पाणीसाठी असायला हवा होता. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गाळ आणि झाडे-झुडपे वाढले आहेत.

चुल्हाड (सिहोरा) : भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तलावाच्या या जिल्ह्यात मुबलक पाणीसाठी असायला हवा होता. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गाळ आणि झाडे-झुडपे वाढले आहेत. गाळ साचल्यामुळे या तलावांची साठवणूक क्षमता कमी झाली आहे. त्याचा परिणाम सिंचन आणि पाणीपुरवठ्यावर होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याची पातळी १३ टक्क्यांवरच आली आहे. या शिवाय शासनाचा महसूल बुडत आहे.भंडारा जिल्ह्यात तलावांची नोंद अधिक प्रमाणात आहे. परंतु शासन प्रशासन तथा लोकप्रतिनिधीची या गंभीर बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. तुमसर तालुका तथा सिहोरा परिसरातील गावागावात एक नव्हे तीन-चार तलाव आहेत. या तलावांची सिंचन क्षमता निम्यावर आली आहे. तलावात दरवर्षी गाळ तयार होत असल्याने पाण्याची साठवणूक अधिक प्रमाणात होत नाही. या तलावातील गाळ उपसा दरवर्षी होत नसल्यामुळे पाणी कमी जमा होत आहे. विस्तीर्ण चांदपूर जलाशय, माल गुजारी तलाव तथा शासकीय तलाव असे असताना यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. या तलावातून शेकडो हेक्टरवर सिंचन केले जाते. परंतु सलग्नीत शेतीला पाणी पुरवठा तलाव उपेक्षित ठरत आहे. तलाव, बोड्या, नाले आदीचे कायापालट करण्यासाठी रोहयो यंत्रणा असली तरी नियोजनाचा अभाव आहे. गावात पांदण रस्ते निर्मितीचा अनुशेष नाही. यामुळे मजुरांना कामे उपलब्ध करताना कसरत होत आहे. दरम्यान, या मजुरांना तलाव खोलीकरणाची कामे उपलब्ध करण्याची गरज आहे. याच तलावात महसूल प्राप्त करतांना यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. तलावात अनेक हेक्टर जागा कोरडी आहे. येत्या पावसाळा पर्यंत ही जागा कोरडीच राहणार आहे. यामुळे सदर जागा उत्पादकांना लीजवर देण्यात आली नाही. या जागेत फळे तथा भाजीपाला घेण्यात येत असताना लीजवर जागा उपलब्ध करणारी प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. चांदपूर जलाशयात अशी जागा लिजवर देण्यात येत आहे. परंतु अन्य तलावात ही प्रक्रिया सुरु करण्यात येत नाही. सध्या स्थित जानेवारी महिन्यात तलावात अल्प जलसाठा आहे. चांदपूर जलाशय रिकामा करण्यात आलेला आहे. जलाशय खोलीकरणाची संधी आहे. जलाशयात पाणी साठवणूक क्षमता वाढल्यास रब्बी हंगामात रोटेशन पद्धत बंद होणार आहे. या शिवाय जलाशयाची सिंचीत क्षमता १५ हजार हेक्टर आर जागेत वाढणार आहे. परंतु उद्दिष्ट गाठणारी क्षमता असताना तसे प्रयत्न होत नाही. निधीअभावी अनेक महत्वाकांक्षी उपक्रम रेंगाळत आहेत. जलाशय, तलाव यावर असले तरी नहरांची अवस्था वाईट झाली आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात शेती सिंिचत करण्यासाठी पाणी मिळत नाही. यामुळे या कालावधीत यंत्रणा आणि शेतकरी यांच्यात दोन दोन हात होत आहे. शेतकरी स्थानिक प्रशासनाला दोषी नसतानाही जबाबदार धरत आहेत. असे प्रकार सुरु असताना यंत्रणेत रिक्त पदांचा प्रभाव घेण्यास अधिकारीही नकार देत आहेत. असे चित्र दिसून येत आहेत. (वार्ताहर)