शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी पाण्याचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:28 IST

यावर्षी बळीराजा मनसोक्त बरसला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. येरंडी हे गाव मालकी हक्क नवेगावबांध तलावाच्या अधिकार क्षेत्रात येते.

ठळक मुद्देयेरंडी गावाची व्यथा : मालकी हक्क असूनही पुरेसे पाणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : यावर्षी बळीराजा मनसोक्त बरसला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. येरंडी हे गाव मालकी हक्क नवेगावबांध तलावाच्या अधिकार क्षेत्रात येते. पण या येरंडी परिसरातील शेतीला कधीच पुरेसे पाणी मिळत नाही. अशी व्यथा या गावचे शेतकरी नेहमी मांडतात.येरंडी गावात दरवर्षी पावसाळी शेतजमिनीवर शंभर टक्के पेरणी केली केली जाते. मात्र शेतातील पीक टिकविण्यासाठी धान पिकाच्या शेवटपर्यंत पाणी आवश्यक असते. नवेगावबांध मालकी हक्क क्षेत्रात नरेगाव, देवलगाव, खोलीबोंडे, येरंडी व मुगली असे पाच गावे येतात. या मालकी हक्क क्षेत्रात फक्त नवेगावबांध, देवलगाव आणि लागून असलेला खोलीबोंडे हेच गावे पिकतात. पण येरंडी व मुंगली ही गावे पाण्याच्या अभावाने चांगली शेती पिकवत नाही. पुरेसे पाणी मिळत नाही, हे यामागील प्रमुख कारण आहे.नवेगावबांध तलावाचे पाणी या पाच गावांना मोफत मिळत आहे. पण कुणाला मायेचा तर कुणाला मावशीचा, असा प्रकार केला जातो. या तलावाचे पाण्याविषयीची पूर्ण अधिकार काय? हे समजत नाही. याकडे नवेगावबांध सार्वजनिक बांधकाम कार्यालय लक्ष देत नाही, असे शेतकरी सांगतात व चिंता व्यक्त करतात.या तलावाचे पाणी कधीच उंचीवर असलेल्या शेतकºयांच्या शेतात पोहोचत नाही. येरंडीला नवेगावबांध मार्गावरच्या शेतीला फक्त कसेतरी ओढूनताणून पाणी मिळते. पण कुंभीटोला या मार्गावरील कालव्याला पाणी बरोबर मिळत नाही. या क्षेत्राचे पाणी कमी करण्यात आले आहे. कालवा केरकचºयाने ग्रासला आहे. तर नवेगाव, देवलगाव इकडेच पाणी अडतो. या पाण्यावर नवेगावचेच शेतकरी आपली मालकी गाजवतात आणि येरंडी गावाला पुरेसे पाणी सोडत नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.हल्ली तलावात जवळपास सात फूट एवढे पाणी आहे. तरी पाण्यापासून शेतकरी वंचित आहेत. अशा प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तलावाच्या पाण्यावर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा कानाडोळा आहे. ते जबाबदारी घेत नाही. शासनाकडून कोट्यवधी रुपये तलावाच्या कामासाठी खर्च केले जातात. पण शेतकºयांच्या शेतीला पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. येरंडीच्या शेतकºयांना पुरेसे पाणी देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.येरंडी भागाकडील पाणी कमी करण्यात आले आहे. मी समितीला सांगितल्यावर ते करतील, पण पाण्यासाठी वरचे शेतकरी ओरडत आहेत. त्यांची मागणी पूर्ण करू आणि पाणी पुरेसे देवू.इंजि.बी.बी. बिसेनशाखा अभियंता, नवेगावबांध