शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

शेतीसाठी पाण्याचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:28 IST

यावर्षी बळीराजा मनसोक्त बरसला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. येरंडी हे गाव मालकी हक्क नवेगावबांध तलावाच्या अधिकार क्षेत्रात येते.

ठळक मुद्देयेरंडी गावाची व्यथा : मालकी हक्क असूनही पुरेसे पाणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : यावर्षी बळीराजा मनसोक्त बरसला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. येरंडी हे गाव मालकी हक्क नवेगावबांध तलावाच्या अधिकार क्षेत्रात येते. पण या येरंडी परिसरातील शेतीला कधीच पुरेसे पाणी मिळत नाही. अशी व्यथा या गावचे शेतकरी नेहमी मांडतात.येरंडी गावात दरवर्षी पावसाळी शेतजमिनीवर शंभर टक्के पेरणी केली केली जाते. मात्र शेतातील पीक टिकविण्यासाठी धान पिकाच्या शेवटपर्यंत पाणी आवश्यक असते. नवेगावबांध मालकी हक्क क्षेत्रात नरेगाव, देवलगाव, खोलीबोंडे, येरंडी व मुगली असे पाच गावे येतात. या मालकी हक्क क्षेत्रात फक्त नवेगावबांध, देवलगाव आणि लागून असलेला खोलीबोंडे हेच गावे पिकतात. पण येरंडी व मुंगली ही गावे पाण्याच्या अभावाने चांगली शेती पिकवत नाही. पुरेसे पाणी मिळत नाही, हे यामागील प्रमुख कारण आहे.नवेगावबांध तलावाचे पाणी या पाच गावांना मोफत मिळत आहे. पण कुणाला मायेचा तर कुणाला मावशीचा, असा प्रकार केला जातो. या तलावाचे पाण्याविषयीची पूर्ण अधिकार काय? हे समजत नाही. याकडे नवेगावबांध सार्वजनिक बांधकाम कार्यालय लक्ष देत नाही, असे शेतकरी सांगतात व चिंता व्यक्त करतात.या तलावाचे पाणी कधीच उंचीवर असलेल्या शेतकºयांच्या शेतात पोहोचत नाही. येरंडीला नवेगावबांध मार्गावरच्या शेतीला फक्त कसेतरी ओढूनताणून पाणी मिळते. पण कुंभीटोला या मार्गावरील कालव्याला पाणी बरोबर मिळत नाही. या क्षेत्राचे पाणी कमी करण्यात आले आहे. कालवा केरकचºयाने ग्रासला आहे. तर नवेगाव, देवलगाव इकडेच पाणी अडतो. या पाण्यावर नवेगावचेच शेतकरी आपली मालकी गाजवतात आणि येरंडी गावाला पुरेसे पाणी सोडत नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.हल्ली तलावात जवळपास सात फूट एवढे पाणी आहे. तरी पाण्यापासून शेतकरी वंचित आहेत. अशा प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तलावाच्या पाण्यावर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा कानाडोळा आहे. ते जबाबदारी घेत नाही. शासनाकडून कोट्यवधी रुपये तलावाच्या कामासाठी खर्च केले जातात. पण शेतकºयांच्या शेतीला पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. येरंडीच्या शेतकºयांना पुरेसे पाणी देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.येरंडी भागाकडील पाणी कमी करण्यात आले आहे. मी समितीला सांगितल्यावर ते करतील, पण पाण्यासाठी वरचे शेतकरी ओरडत आहेत. त्यांची मागणी पूर्ण करू आणि पाणी पुरेसे देवू.इंजि.बी.बी. बिसेनशाखा अभियंता, नवेगावबांध