शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पावसाचा अभाव, किडीचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 13, 2015 00:36 IST

पावसाअभावी पवनी तालुक्यातील धान व सोयाबीन पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.

आसगाव (चौ.) : पावसाअभावी पवनी तालुक्यातील धान व सोयाबीन पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीने व मेहनतीने १५० ते २०० रुपये मजुरी देवून मागेपुढे न पाहता मागील महिन्यात पाऊस कमी पडला असला तरी अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी इंजिन लावून जमेल त्या साधनाने शेतात पाणी सोडून मोठ्या मेहनतीने रोवणी केली.शेतकरी हिरवीगार स्वप्न उराशी बाळगून असतानाच गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे व वातावरणात उष्णता निर्माण झाल्यामुळे पिकाच्या वाढीचा जोर नाहीसा होत आहे. भातपिकावर व सोयाबीन पिकावर निरनिराळ्या प्रकारचे रोग येत आहेत.करपा, कडा करपा, बेड्डी, खोडकिडा, मावा, तुडतुडे या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीन या पिकांची वातावरण मोकळे असल्यामुळे जोमाने वाढ झाली होती. परंतु या पिकावर पाने खाणारी अळी व शेंगा पोखरणारी अळी तसेच या पिकावर मर रोग आल्यामुळे झाडे आपोआपच पिवळी पडलेली आहेत. अशातच रासायनिक खते व औषधींच्या किमती वाढतच आहेत. कृषी पिकावर औषधी उपयोगी फवारणाऱ्या औषधांच्या महागड्या औषधी बाजारामध्ये येत आहेत. त्यामुळे शेतकरी भांबावल्या स्थितीतही महागडी किटकनाशके फवारणीसाठी कर्ज काढून, दागीने गहान ठेवून फवारणी व खतासाठी व पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी वाट्टेल ते उपाय करत आहेत.ऐन तोंडात अन्नाचा घास निसर्ग हिसकावून घेण्याचा परिस्थितीत उभा आहे. पिकावर अनेक प्रकारचे रोग आले असताना मात्र तालुका कृषी कार्यालयात कीड रोगावर प्रतिबंध करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा औषध पुरवठा उपलब्ध नाही. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मदतही नाही. या अगोदरच्या सरकारच्या काळात मात्र शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनेक प्रकारच्या किटकनाशकाचा पुरवठा अनुदानावर मिळत होता. आता मात्र कृषी कार्यालय नावाचेच राहिलेले आहे. विद्युत मंडळ तारक की मारक या गंभीर परिस्थितीत विद्युत मंडळाचे पॉवर स्टेशन १३२ केव्ही पॉवरचे आहे. पवनी व लाखांदूर तालुक्यात विहिरीचे प्रमाण जास्त असल्यामुळे चौरास भाग म्हणून हमखास भातपिक देणारा पट्टा म्हणून ओळखला जातो. परंतु दररोज शेतीला फक्त २४ तासापैकी १० तासच विद्युत पुरवठा केला जातो. त्यामुळे शेतीला पाण्याचा पुरवठा होऊ शकत नाही.त्यामुळे शेतकरी पुर्णत: हताश झाला आहे. (वार्ताहर)