शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा अभाव, किडीचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 13, 2015 00:36 IST

पावसाअभावी पवनी तालुक्यातील धान व सोयाबीन पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.

आसगाव (चौ.) : पावसाअभावी पवनी तालुक्यातील धान व सोयाबीन पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीने व मेहनतीने १५० ते २०० रुपये मजुरी देवून मागेपुढे न पाहता मागील महिन्यात पाऊस कमी पडला असला तरी अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी इंजिन लावून जमेल त्या साधनाने शेतात पाणी सोडून मोठ्या मेहनतीने रोवणी केली.शेतकरी हिरवीगार स्वप्न उराशी बाळगून असतानाच गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे व वातावरणात उष्णता निर्माण झाल्यामुळे पिकाच्या वाढीचा जोर नाहीसा होत आहे. भातपिकावर व सोयाबीन पिकावर निरनिराळ्या प्रकारचे रोग येत आहेत.करपा, कडा करपा, बेड्डी, खोडकिडा, मावा, तुडतुडे या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीन या पिकांची वातावरण मोकळे असल्यामुळे जोमाने वाढ झाली होती. परंतु या पिकावर पाने खाणारी अळी व शेंगा पोखरणारी अळी तसेच या पिकावर मर रोग आल्यामुळे झाडे आपोआपच पिवळी पडलेली आहेत. अशातच रासायनिक खते व औषधींच्या किमती वाढतच आहेत. कृषी पिकावर औषधी उपयोगी फवारणाऱ्या औषधांच्या महागड्या औषधी बाजारामध्ये येत आहेत. त्यामुळे शेतकरी भांबावल्या स्थितीतही महागडी किटकनाशके फवारणीसाठी कर्ज काढून, दागीने गहान ठेवून फवारणी व खतासाठी व पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी वाट्टेल ते उपाय करत आहेत.ऐन तोंडात अन्नाचा घास निसर्ग हिसकावून घेण्याचा परिस्थितीत उभा आहे. पिकावर अनेक प्रकारचे रोग आले असताना मात्र तालुका कृषी कार्यालयात कीड रोगावर प्रतिबंध करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा औषध पुरवठा उपलब्ध नाही. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मदतही नाही. या अगोदरच्या सरकारच्या काळात मात्र शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनेक प्रकारच्या किटकनाशकाचा पुरवठा अनुदानावर मिळत होता. आता मात्र कृषी कार्यालय नावाचेच राहिलेले आहे. विद्युत मंडळ तारक की मारक या गंभीर परिस्थितीत विद्युत मंडळाचे पॉवर स्टेशन १३२ केव्ही पॉवरचे आहे. पवनी व लाखांदूर तालुक्यात विहिरीचे प्रमाण जास्त असल्यामुळे चौरास भाग म्हणून हमखास भातपिक देणारा पट्टा म्हणून ओळखला जातो. परंतु दररोज शेतीला फक्त २४ तासापैकी १० तासच विद्युत पुरवठा केला जातो. त्यामुळे शेतीला पाण्याचा पुरवठा होऊ शकत नाही.त्यामुळे शेतकरी पुर्णत: हताश झाला आहे. (वार्ताहर)