शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मार्गावर प्रवासी निवाऱ्याचा अभाव

By admin | Updated: April 2, 2016 00:38 IST

वैनगंगा नदी पात्रात बांधकाम करण्यात आलेल्या धरणाने सिहोरा परिसर वाशियांचे तिरोडा शहराला जोडणारे अंतर कमी झाले असले तरी ...

प्रवाशांना झाडांचा आश्रय : अरूंद रस्त्यामुळे अपघाताची शक्यताचुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा नदी पात्रात बांधकाम करण्यात आलेल्या धरणाने सिहोरा परिसर वाशियांचे तिरोडा शहराला जोडणारे अंतर कमी झाले असले तरी या मार्गावर निवारे नसल्याने प्रवाशाचे हाल होत आहे.अदानी वीज प्रकल्प व धापेवाडा उपसा सिंचन योजनेला पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदीवर धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणाने वर्षभरात पूर्णत्वाची मागणी आहे. सिहोरा परिसरातील नागरिकांना तिरोडा शहर गाठण्यासाठी ६० कि़मी. चे अंतर गाठावे लागत असताना धरणाच्या बांधकामामुळे १३ कि.मी. अंतर पर्यत आले आहे. या धरणावरून वाहतुकीत वाढ झाली आहे. गोंदियाचे अंतर कमी झाले आहे. यामुळे नागरिकांना सोयीचे झाले आहे. दिवस आणि रात्र या मार्गावर वर्दळ सुरू झाली आहे. सिहोरा ते तिरोडा या मार्गावर असणाऱ्या गावात सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाही. तिरोडा आगारांच्या बस फेऱ्या चांदपुर देवस्थानपर्यंत दिवसभर धावत आहेत. या मार्गावर सिलेगाव, वाहनी, वांगी, मांडवी, पिपरी चुन्ही, कवलेवाडा, रेल्वे स्टेशन तिरोडा, पंचायत समिती तिरोडा तथा ४ गावांना जोडणारा चौक आहे, परंतु या गावात प्रवाशी निवारे नाहीत. यामुळे प्रवाशी निश्चित ठिकाणी थांबत नाही, असे करित असताना बस चालकाला हात दाखविल्यास बस थांबविण्यास प्रतिसाद देत नाही. प्रवाशांनी कुठे थांबावे हे आता कळेनासे झाले आहे.मांडवी चौकात प्रवासी निवारा नसल्याने झाडांचा आसरा प्रवाशांना होण्याची पाळी आली आहे. या चौकात पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी साधे हातपंप नसल्याने प्रवाशाची कसरत होत आहे. एकाही गावात प्रवासी निवाऱ्यांचे बांधकाम झाले नसल्याने पावसाळ्यात प्रवाशांचे हाल हाल होणार आहे. या मार्गावर तुमसर व तिरोडा विधानसभा अंतर्गत गावे आहे. एकाच पक्षाचे आमदार आहेत. प्रवासी निवाऱ्याची समस्या निकाली काढण्याची गरज आहे. याशिवाय सिहोरा ते तिरोडा या १३ कि़मी. मार्गाची दुरवस्था झाली आहे. अरूंद रस्त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. हा मार्ग एकेरी ठरतो आहे. या मार्गाचे नूतनीकरण व प्रवासी निवारे मंजुर करण्यासाठी या आधी जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा कटरे, पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र ढबाले यांनी पत्रव्यवहार केला आहे. परंतु समस्या निकाली काढण्यात आली नाही. यामुळे प्रवासी व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तिरोडापर्यंत जोडणाऱ्या या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही. नाही. पावसाळ्यात वाहन धारकांना कसरत करावी लागत आहे. डांबरीकरण व प्रवाशी निवारे बांधकाम करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)