शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
4
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
5
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
6
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
7
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
8
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
9
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
10
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
11
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
12
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
13
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
14
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
15
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
16
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
17
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
18
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
19
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
20
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार

‘त्या’ मार्गावर प्रवासी निवाऱ्याचा अभाव

By admin | Updated: April 2, 2016 00:38 IST

वैनगंगा नदी पात्रात बांधकाम करण्यात आलेल्या धरणाने सिहोरा परिसर वाशियांचे तिरोडा शहराला जोडणारे अंतर कमी झाले असले तरी ...

प्रवाशांना झाडांचा आश्रय : अरूंद रस्त्यामुळे अपघाताची शक्यताचुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा नदी पात्रात बांधकाम करण्यात आलेल्या धरणाने सिहोरा परिसर वाशियांचे तिरोडा शहराला जोडणारे अंतर कमी झाले असले तरी या मार्गावर निवारे नसल्याने प्रवाशाचे हाल होत आहे.अदानी वीज प्रकल्प व धापेवाडा उपसा सिंचन योजनेला पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदीवर धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणाने वर्षभरात पूर्णत्वाची मागणी आहे. सिहोरा परिसरातील नागरिकांना तिरोडा शहर गाठण्यासाठी ६० कि़मी. चे अंतर गाठावे लागत असताना धरणाच्या बांधकामामुळे १३ कि.मी. अंतर पर्यत आले आहे. या धरणावरून वाहतुकीत वाढ झाली आहे. गोंदियाचे अंतर कमी झाले आहे. यामुळे नागरिकांना सोयीचे झाले आहे. दिवस आणि रात्र या मार्गावर वर्दळ सुरू झाली आहे. सिहोरा ते तिरोडा या मार्गावर असणाऱ्या गावात सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाही. तिरोडा आगारांच्या बस फेऱ्या चांदपुर देवस्थानपर्यंत दिवसभर धावत आहेत. या मार्गावर सिलेगाव, वाहनी, वांगी, मांडवी, पिपरी चुन्ही, कवलेवाडा, रेल्वे स्टेशन तिरोडा, पंचायत समिती तिरोडा तथा ४ गावांना जोडणारा चौक आहे, परंतु या गावात प्रवाशी निवारे नाहीत. यामुळे प्रवाशी निश्चित ठिकाणी थांबत नाही, असे करित असताना बस चालकाला हात दाखविल्यास बस थांबविण्यास प्रतिसाद देत नाही. प्रवाशांनी कुठे थांबावे हे आता कळेनासे झाले आहे.मांडवी चौकात प्रवासी निवारा नसल्याने झाडांचा आसरा प्रवाशांना होण्याची पाळी आली आहे. या चौकात पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी साधे हातपंप नसल्याने प्रवाशाची कसरत होत आहे. एकाही गावात प्रवासी निवाऱ्यांचे बांधकाम झाले नसल्याने पावसाळ्यात प्रवाशांचे हाल हाल होणार आहे. या मार्गावर तुमसर व तिरोडा विधानसभा अंतर्गत गावे आहे. एकाच पक्षाचे आमदार आहेत. प्रवासी निवाऱ्याची समस्या निकाली काढण्याची गरज आहे. याशिवाय सिहोरा ते तिरोडा या १३ कि़मी. मार्गाची दुरवस्था झाली आहे. अरूंद रस्त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. हा मार्ग एकेरी ठरतो आहे. या मार्गाचे नूतनीकरण व प्रवासी निवारे मंजुर करण्यासाठी या आधी जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा कटरे, पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र ढबाले यांनी पत्रव्यवहार केला आहे. परंतु समस्या निकाली काढण्यात आली नाही. यामुळे प्रवासी व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तिरोडापर्यंत जोडणाऱ्या या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही. नाही. पावसाळ्यात वाहन धारकांना कसरत करावी लागत आहे. डांबरीकरण व प्रवाशी निवारे बांधकाम करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)