शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
5
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
6
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
7
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
8
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
9
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
10
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
11
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
12
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
13
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
14
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
15
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
16
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
17
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
18
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

परतीच्या पावसाने हलक्या धानाची नासाडी

By admin | Updated: October 3, 2016 00:28 IST

परतीच्या पावसाचा तडाखा सुरु असल्याने हलक्या प्रतीच्या धानाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे.

उत्पादनावर परिणाम : २० टक्के क्षेत्र पडीत, पाऊस तारणार की मारणार?भंडारा : परतीच्या पावसाचा तडाखा सुरु असल्याने हलक्या प्रतीच्या धानाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. याचा उत्पन्नावर परिणाम होत असून शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामात निसर्गाच्या कोपामुळे २० टक्के क्षेत्र पडीत असून जिल्हा प्रशासनाने नुकतीच घोषित केलेल्या खरीपाची नजरअंदाज पैसेवारी ७२ पैसे काढली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता त्रस्त झाला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला. सिंचनाच्या सहाय्याने कसेबसे पिक लागवड केले. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. या हजेरीमुळे उत्पन्नात वाढ होईल अशी आशा होती. मात्र आॅगस्ट महिन्यात उन्हाळ्यासारखा तापल्याने पिके करपली. त्यानंतर परतीच्या पावसाने सुरुवात केली. मात्र हा पाऊस हलक्या प्रतीच्या धानासाठी कर्दनकाळ ठरत आहे. शासनाने नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी आहे.पालांदूर : धानाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्याला मागील १५ दिवसापासून अस्मानी संकटाने घेरले आहे. हलके व मध्यम धान कापणीला आले असून काही ठिकाणी धान सडत आहे. काही ठिकाणी हवा व पाऊसाचा जोरदार झोतामुळे धानपिक भुईसपाट झाले आहे. सततच्या पावसाने बांध्यातील पाणी निघत नसल्याने पडलेल्या धानाला सडका वास येत आहे. शेतकरी पडलेला धान उभा करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. मागील ३ वर्षाचा ओला आणि कोरडा दुष्काळ डोक्यावर घेत हिमतीने नव्या हंगामाला शेतकरी नव्या उर्जेने तयार होतो. मात्र निसर्ग लहरी झाल्याने अनियमितपणा वाढला आहे. जुन महिन्यात पावसाची अत्यल्प हजेरीने पेरणी अर्धी व लांबली. जुलै महिन्यात समाधानकारक पण ‘कही खुशी कही गम’ करीत हजेरी लावली. धान कमी पण निंदण जास्त अशी स्थिती संप्टेंबर महिन्याच्या पहिला व दुसऱ्या हप्त्यात पाहायला मिळाली. महिन्याअखेरपर्यंत पावसाची जोरदार हजेरी लावली. दिवसभर ढगाळ हवामानामुळे किडीचा उपद्रव वाढला. कापणीच्या धानाला तुळतुळा, अळी कसा जेमतेम एखादेवेळेस अनुदानावर औषधी पुरवितात. ही नियमित करुन खर्च कमी करण्याची आवश्यक आहे. करपा रोगात नविन प्रश्न तयार झाला असून निसवलेली लोंबी अक्षरश: पांढरी होतात. दाणे भरतच नाही बऱ्याच शेतात गळ्याजवळील दाणे पोचटच असतात, असे रोग नविन असल्याने सामान्य शेतकऱ्याला कळणारे नसल्याने नुकसान होत आहे.तालुक्यातील चुलबंधच्या खोऱ्यातील धान शेती पावसाने प्रभावित झाली असून लोहारा, नरव्हा, मऱ्हेगाव, वाकल, खराशी, पाथरी शिवारात धान कापले असून सततच्या पावसाने सडत आहेत. पाणी बांध्यातून पूर्णपणे निघत नसल्याने मोठी अडचण शेतकऱ्यासमोर उभी झालेली आहे. पंजाबराव कृषी विद्यापिठअंर्गत साकोली कार्यालयातून माहिती दिली जात आहे. (वार्ताहर)यंदाही उत्पन्न बुडण्याची भीतीपालोरा (चौ.) : सध्याला हलके धानाचे पिक कापणीवर आले आहेत. मात्र पावसामुळे चौरास भागातील हलक्या धान पिकाची मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. येणाऱ्या पावसाने उच्च धान पिकाला फायदा होत असला तरी हलक्या प्रतीचे धान मातीमोल होत आहेत. शेतकऱ्यांचा तोंडातील घास हिरावल्यामुळे पीक वाचविण्याकरिता शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. पवनी तालुक्यातील पालोरा हा परिसर चौरास भाग म्हणून प्रसिद्ध आहे. धान पिक हा शेतकऱ्यांचा मुख्य पीक आहे. सतत शेतकरी दुष्काळाच्या छायेत जीवन कंठीत होता. यावर्षी वरूण राजाच्या कृपेने वेळोवेळी पावसाचे आगमन झाल्यामुळे सर्वत्र धान पिक चांगल्या प्रमाणात असून यावर्षी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात दररोज कमी जास्त पाऊस येत असल्यामुळे हलके धान पिक धोक्यात आले आहे. अनेक शेतातील धान पडल्यामुळे मातीमोल झाले आहेत. (वार्ताहर)