शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

धान खरेदी केंद्रावर सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 05:00 IST

खरीप हंगामातील धानाची मळणी शेतकऱ्यांनी केली आहे. या धानाला शासनाचा योग्य हमीभाव मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी धानाची पोती शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आणले आहेत. परंतु एकाही गावात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. यामुळे धानाच्या पोत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न  ऐरणीवर आला आहे. धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना न्याय मिळत असल्याने धानाचे विक्री करीता पुढाकार घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देधानाची खरेदी झाली बंद : धानाची नासाडी, पोत्यांच्या सुरक्षिततेसाठी ताडपत्रीचे आच्छादन

  लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : आधारभूत धान खरेदी केंद्रावर बारदानासह अनेक सुविधांचा अभाव असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. धान खरेदी केंद्राचा  श्रीगणेशा अद्याप करण्यात आलेला नाही. केंद्र सुरू होण्याआधीच केंद्रावर विक्रीसाठी धानाची पोती पोहचली असल्याने अवकाळी पावसाचा फटका पोत्याना बसला आहे.  धान आणि पोत्यांना खुद्द शेतकऱ्यांनाच सुरक्षा कवच देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे.खरीप हंगामातील धानाची मळणी शेतकऱ्यांनी केली आहे. या धानाला शासनाचा योग्य हमीभाव मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी धानाची पोती शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आणले आहेत. परंतु एकाही गावात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. यामुळे धानाच्या पोत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न  ऐरणीवर आला आहे. धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना न्याय मिळत असल्याने धानाचे विक्री करीता पुढाकार घेण्यात येत आहे. या परिसरात बपेरा, देवसरा, बिनाखी, चुल्हाड, सिंदपुरी, टेमनी, सुकली नकुल, सिहोरा, वाहनी, हरदोली, करकापूर, पिपरी चुनही, गोंडीटोला, दावेझरी, गोंदेखारी गावात धानाची खरेदी केंद्रावर करण्यात येत आहे. धान साठवणूक करण्यासाठी खाजगी गोडाऊन घेण्यात येत आहेत. परिसरात असणारे गोडाऊनमधील गेल्या वर्षातील धानाचे पोती रिकामे करण्यात आली आहेत. धान खरेदी प्रक्रिया सुरु करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांची गोची होत आहे. दरम्यान धान खरेदी केंद्र सुरु होणार असल्याच्या  अपेक्षेने शेतकऱ्यांनी धानाचे पोती केंद्रावर आणले आहेत. धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्याचे आधी गोडाऊन रिकामे केल्याने एक चांगला संदेश शेतकऱ्यांत गेला आहे. धान खरेदी करताना गोडाऊनची समस्या निर्माण होणार नाही. धान खरेदी नंतर पोती गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवली  जातील. परंतु सध्या गोडाऊन बाहेर शेतकऱ्यांनी धानाचे पोती उघड्यावर ठेवली आहेत. या पोत्यांना सुरक्षित करण्यासाठी ताडपत्रीचे आच्छादन दिले आहेत.येथे सुरक्षा करण्यासाठी चौकीदार नाहीत. परिसरात खरेदी केंद्रावरून धान पोती चोरी होण्याचे घटना आजवर घडल्या नाहीत. यामुळे केंद्र संचालक बेफिकीर राहत आहेत. या पोत्यांना  जनावरांची भीती आहे. कीटक पोत्यातील धानाची नासाडी करीत आहेत. नुकसानग्रस्त धानाचा फटका शेतकऱ्यांनाच बसला आहे. याशिवाय धान खरेदी करताना घट काढली जात आहे. यातही शेतकऱ्यांची गोची केली जात आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी विलंब होत असल्याने व्यापाऱ्यांना फायदा होत   आहे.  सिहोरा परिसरातील भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. 

केंद्रावर मनुष्यबळाचा अभाव   धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लुटालूट होत असल्याचे वारंवार आरोप होत आहेत. अतिरिक्त २ ते ३ किलो धानाची घट म्हणून कापले जात आहेत. यात रिकामे पोत्याचा वजन जोडले जात आहे. यावरून शेतकऱ्यांनी धान आणायचे कसे ? केंद्रावर धानाचे पोती उचल करणाऱ्या हमालांना दरानुसार राशी दिली जात आहे. असे असताना पुन्हा शेतकऱ्यांकडून हमाली वसुल करण्याचे आरोप होत आहेत. धान खरेदी केंद्रावर पारदर्शकता ठेवली पाहिजे. यात शेतकऱ्यांची लूट होणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी होत आहे. यंदा शेतकरी चौफेर संकटात सापडला आहे. पूर, परतीचा पाऊस, मावा तुडतुडा, अवकाळी पाऊस, एकरी ३ पोते धानाचे उत्पादन झाल्याने शासनाने  शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्याची गरज आहे.

चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील गावात एकही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. वाहनी केंद्रावर धान पोती उघड्यावर ठेवण्यात आली आहेत. यामुळे तात्काळ धान खरेदी सुरु करण्यात यावी.- प्रल्हाद आगाशे, सरपंच, करकापूर

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड