शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
4
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
5
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
6
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
7
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
8
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
9
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
10
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
11
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
12
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
13
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
14
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
15
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
16
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
17
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
18
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
19
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...

धान खरेदी केंद्रावर सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 05:00 IST

खरीप हंगामातील धानाची मळणी शेतकऱ्यांनी केली आहे. या धानाला शासनाचा योग्य हमीभाव मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी धानाची पोती शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आणले आहेत. परंतु एकाही गावात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. यामुळे धानाच्या पोत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न  ऐरणीवर आला आहे. धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना न्याय मिळत असल्याने धानाचे विक्री करीता पुढाकार घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देधानाची खरेदी झाली बंद : धानाची नासाडी, पोत्यांच्या सुरक्षिततेसाठी ताडपत्रीचे आच्छादन

  लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : आधारभूत धान खरेदी केंद्रावर बारदानासह अनेक सुविधांचा अभाव असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. धान खरेदी केंद्राचा  श्रीगणेशा अद्याप करण्यात आलेला नाही. केंद्र सुरू होण्याआधीच केंद्रावर विक्रीसाठी धानाची पोती पोहचली असल्याने अवकाळी पावसाचा फटका पोत्याना बसला आहे.  धान आणि पोत्यांना खुद्द शेतकऱ्यांनाच सुरक्षा कवच देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे.खरीप हंगामातील धानाची मळणी शेतकऱ्यांनी केली आहे. या धानाला शासनाचा योग्य हमीभाव मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी धानाची पोती शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आणले आहेत. परंतु एकाही गावात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. यामुळे धानाच्या पोत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न  ऐरणीवर आला आहे. धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना न्याय मिळत असल्याने धानाचे विक्री करीता पुढाकार घेण्यात येत आहे. या परिसरात बपेरा, देवसरा, बिनाखी, चुल्हाड, सिंदपुरी, टेमनी, सुकली नकुल, सिहोरा, वाहनी, हरदोली, करकापूर, पिपरी चुनही, गोंडीटोला, दावेझरी, गोंदेखारी गावात धानाची खरेदी केंद्रावर करण्यात येत आहे. धान साठवणूक करण्यासाठी खाजगी गोडाऊन घेण्यात येत आहेत. परिसरात असणारे गोडाऊनमधील गेल्या वर्षातील धानाचे पोती रिकामे करण्यात आली आहेत. धान खरेदी प्रक्रिया सुरु करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांची गोची होत आहे. दरम्यान धान खरेदी केंद्र सुरु होणार असल्याच्या  अपेक्षेने शेतकऱ्यांनी धानाचे पोती केंद्रावर आणले आहेत. धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्याचे आधी गोडाऊन रिकामे केल्याने एक चांगला संदेश शेतकऱ्यांत गेला आहे. धान खरेदी करताना गोडाऊनची समस्या निर्माण होणार नाही. धान खरेदी नंतर पोती गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवली  जातील. परंतु सध्या गोडाऊन बाहेर शेतकऱ्यांनी धानाचे पोती उघड्यावर ठेवली आहेत. या पोत्यांना सुरक्षित करण्यासाठी ताडपत्रीचे आच्छादन दिले आहेत.येथे सुरक्षा करण्यासाठी चौकीदार नाहीत. परिसरात खरेदी केंद्रावरून धान पोती चोरी होण्याचे घटना आजवर घडल्या नाहीत. यामुळे केंद्र संचालक बेफिकीर राहत आहेत. या पोत्यांना  जनावरांची भीती आहे. कीटक पोत्यातील धानाची नासाडी करीत आहेत. नुकसानग्रस्त धानाचा फटका शेतकऱ्यांनाच बसला आहे. याशिवाय धान खरेदी करताना घट काढली जात आहे. यातही शेतकऱ्यांची गोची केली जात आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी विलंब होत असल्याने व्यापाऱ्यांना फायदा होत   आहे.  सिहोरा परिसरातील भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. 

केंद्रावर मनुष्यबळाचा अभाव   धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लुटालूट होत असल्याचे वारंवार आरोप होत आहेत. अतिरिक्त २ ते ३ किलो धानाची घट म्हणून कापले जात आहेत. यात रिकामे पोत्याचा वजन जोडले जात आहे. यावरून शेतकऱ्यांनी धान आणायचे कसे ? केंद्रावर धानाचे पोती उचल करणाऱ्या हमालांना दरानुसार राशी दिली जात आहे. असे असताना पुन्हा शेतकऱ्यांकडून हमाली वसुल करण्याचे आरोप होत आहेत. धान खरेदी केंद्रावर पारदर्शकता ठेवली पाहिजे. यात शेतकऱ्यांची लूट होणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी होत आहे. यंदा शेतकरी चौफेर संकटात सापडला आहे. पूर, परतीचा पाऊस, मावा तुडतुडा, अवकाळी पाऊस, एकरी ३ पोते धानाचे उत्पादन झाल्याने शासनाने  शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्याची गरज आहे.

चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील गावात एकही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. वाहनी केंद्रावर धान पोती उघड्यावर ठेवण्यात आली आहेत. यामुळे तात्काळ धान खरेदी सुरु करण्यात यावी.- प्रल्हाद आगाशे, सरपंच, करकापूर

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड