शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

महानगरातील मजुरांचे जत्थेच्या जत्थे रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. हजारो मजूर महानगरात अडकले आहेत. पहिला लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपणार होता. त्यामुळे अनेक मजूरांनी धीर धरत तोपर्यंत महानगरातच मुक्काम केला. मात्र लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आल्याने मजूरांचा धीर सुटला. महानगरात हाताला काम नाही उपाशीपोटी किती दिवस राहायचे, अशा विचार करित मजूरांचे जत्थे गावाकडे निघाले.

ठळक मुद्देचेकपोस्ट कुचकामी : दररोज शेकडो मजूर करतात सीमा पार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लॉकडाऊनने महानगरात अडकलेले मजुरांचे जत्थेच्या जत्थे राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील विविध मार्गावरुन दररोज जात आहे. कोरोना प्रभावित क्षेत्रातून प्रवास करणारे मजूर चेकपोस्टला चुकवून पायदळ जात असल्याचे चित्र रोजचे झाले आहे. या मजूरांची कुठेही तपासणी होत नसून बिनधास्तपणे सीमा पार करताना दिसत आहेत. मात्र त्यांना रोखताना कुणीही दिसत नाही.कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. हजारो मजूर महानगरात अडकले आहेत. पहिला लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपणार होता. त्यामुळे अनेक मजूरांनी धीर धरत तोपर्यंत महानगरातच मुक्काम केला. मात्र लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आल्याने मजूरांचा धीर सुटला. महानगरात हाताला काम नाही उपाशीपोटी किती दिवस राहायचे, अशा विचार करित मजूरांचे जत्थे गावाकडे निघाले.वाहनाची कोणतीही व्यवस्था नसल्याने महिला पुरूष आणि लहान मुले डोक्यावर ओझे घेवून आपल्या गावाकडे निघाले आहेत. भंडारा जिल्ह्यातून जाणारे मजूर छत्तीसगढ आणि मध्यप्रदेशातील आहेत. हैद्राबाद, नागपूरसह विविध शहरातून हे मजूर आपल्या गावाकडे जाताना दिसत आहे. गत पाच सहा दिवसांपासून गावाकडे जाणाऱ्या मजूरांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसत आहे.भंडारा शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावरुन पहाटे ५ वाजतापासून मजूरांचे जत्थे जाताना दिसून येतात. रात्रभर कुठेतरी मुक्काम करायचा सकाळच्यावेळी प्रवास करायचा आणि दुपारी पुन्हा आराम करुन पुढच्या प्रवाशाला निघायचे. असा त्यांचा दिनक्रम आहे. रस्त्यात या मजूरांना विविध सामाजिक संस्थांकडून भोजनासह विविध मदत केली जाते.कोरोना प्रभावित महानगरातून प्रवास करणारे मजूर भंडारा या ग्रीन झोनमधील जिल्ह्यातून प्रवास करतात. त्यामुळे त्यांचा प्रवास तसा धोकादायक आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात नऊ ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले असून त्याठिकाणी पोलिसांसह आरोग्य पथक तैनात असते. मात्र त्यांना चुकवून हे मंडळी आपल्या गावाचे दिशेने कुच करताना दिसून येते.शेल्टर होममध्ये मुक्काम अन् सकाळी पलायनरस्त्यावरुन जाणाºया मजूरांना पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यातील विविध शेल्टर होममध्ये आणले जाते. त्याठिकाणी भोजनासह निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अनेक मजूर याठिकाणी रात्रभर मुक्काम करतात आणि पहाटेच आपल्या गावाकडे निघतात. शेल्टरहोममधून सकाळी पलायन करणाºया मजूरांकडे कुणाचेही लक्ष नसते. भंडारा शहरातील तुमसर, साकोली मार्गासह जिल्ह्यातील पवनी, अड्याळ, लाखांदूर आदी भागातूनही मजूर जाताना दिसून येतात. या मजूरांना वेळीच आळा घालून त्यांना शेल्टर होममध्ये ठेवण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने या मजूरांच्या जत्थ्यांना आवर घालून त्यांची योग्य व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.पालांदूरमध्ये गुन्हाट्रकमधून मजूरांची वाहतूक केल्याप्रकरणी लाखनी तालुक्यातील पालांदूर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारधा ते पालांदूर असा २४ मजूरांना प्रवास करण्यात आला होता. चालकावर गुन्हा दाखल झाला. मात्र मजूर पायी आपल्या गावाकडे निघून गेले.

टॅग्स :Labourकामगार