शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कृषी संजिवनी योजना शेतकऱ्यांसाठी ‘दिवास्वप्न’!

By admin | Updated: August 4, 2014 23:34 IST

राज्य शासनाने नव्यानेच अंमलात आणलेली कृषी संजिवनी योजना कागदोपत्री असून यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ती दिवास्वप्न ठरल्याचा आरोप भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

शेतकरी वंचित : महावितरणची वीज कपात सुरूभंडारा : राज्य शासनाने नव्यानेच अंमलात आणलेली कृषी संजिवनी योजना कागदोपत्री असून यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ती दिवास्वप्न ठरल्याचा आरोप भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे. शासनाने पाच वर्षाच्या शेवटच्या कार्यकाळात योजनांचा पाऊस पाडून मतदारांना प्रलोभणे देणे सुरू केले आहे. यातील अनेक योजना सुरू झाल्या असून काहींना त्यांचा फायदा झाला तर अजूनही काही जण केवळ आशेवर आहेत. शेतकऱ्यांकडील कृषीपंपाच्या माध्यमातून शेती पिकविण्यात येते. अशा या शेतकऱ्यांकडे नापिकी किंवा कर्जबाजारीपणामुळे कृषीपंपाची विज बिले थकीत आहेत. अशा कृषी पंपधारकांना विज बिलाच्या थकीत रक्कमेचा बोझा कमी करण्याकरीता शासनाने कृषी संजीवनी योजना २०१४ राबविण्याचा निर्णय घेवून त्यात थकविलेल्या विज बिलांवर ५० टक्के माफी, कृषी पंप ग्राहकांना देण्याचा निर्णय मंत्रीमंडळात घेतला आहे. ३१ मार्च २०१४ पुर्वीच्या थकबाकीतील मुळ रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ५० टक्के मुळ रक्कम व पुर्ण थकबाकीच्या रक्कमेवरील पुर्ण व्याज व दंड माफ करण्यात येणार आहे. नियमित विज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना दोन त्रेमासिक बिलात ५० टक्के सुट देण्यात येणार आहे. कृषी संजीवनी योजनेसाठी शासनाने प्रसार व प्रचारावर लाखो रूपये खर्च केले असून शेतकऱ्यांना मात्र विज बिलात कुठलीही सुट मिळणार नसल्याचे आता उघडकीस येत आहे. वरठी येथील परसराम पतिराम कुथे यांचा कृषीपंपाचा ग्राहक क्रमांक ४३०६७१४००३९३ हा आहे. त्यांच्याकडे आजमितीस ४४ हजार ९९० रूपये थकबाकी आहे. राज्य शासनाने घोषित केलेल्या कृषी संजीवनी योजने अंतर्गत कुथे यांना मात्र लाभ मिळाला नाही. याबाबत त्यांनी महावितरण कार्यालयाकडे शासनाच्या योजनेसह विणवणी केली. मात्र त्यांना उडवाउडवीचे उत्तरे मिळाल्याच्या आरोप कुथे यांनी केला आहे.राज्य शासनाने घोषित केलेल्या योजने नुसार ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत २० टक्के, ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत २० टक्के व ३१ आॅक्टोंबर २०१४ पर्यंत कमीत कमी १० टक्के किंवा उरलेली रक्कम भरण्याची सुवीधा उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र शासनाने सदर शासन निर्णयात कोणते थकबाकीदार कृषीपंप विज ग्राहक हा उल्लेख केला नसल्याने अनेक थकबाकीदार कृषीपंपधारक संभ्रमात पडले आहेत. कृषीपंपाचे थकबाकी महावितरण कडे प्राप्त न झाल्याने त्यांनी अनेक कृषी पंपधारकांचा विज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे मोठा गाजावाजा करून राज्य शासनाने जाहिरातीवर करीत असलेल्या कृषी संजीवनीच्या खर्चाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाने या योजनेत कृषी पंपधारकांचा समावेश करावा, व त्यांना लाभ द्यावा, अशी मागणी कुथे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)